शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मानवी हस्तक्षेपामुळे ‘करकोच’ धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST

अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून ...

अर्जुनी मोरगाव : नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान परिसरात बहुसंख्येने दिसणाऱ्या उघड्या चोचीचा करकोचांची संख्या हल्ली रोडावलेली दिसून येत आहे. करकोचा व इतर पक्ष्यांच्या खाद्यांना मानवाने आपले खाद्यान्न बनविल्याने पक्षी पाठ फिरवत आहेत. प्रकृती नेचर फाउंडेशनने यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.

नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान वसाहत संकुल परिसरात निसर्गरम्य तलाव आहे. हा तलाव विस्तीर्ण आहे. तलावाच्या काठावर अनेक गावे वसली आहेत. तलावात विविध प्रकारच्या वनस्पती व जैवविविधतेच्या आकर्षणामुळे देशी व विदेशी पक्षी येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळेच या तलावाची ‘पक्ष्यांचे माहेरघर’ म्हणून सर्वदूर ओळख आहे. हिवाळ्यात येथे दरवर्षी सुमारे चार महिने विदेशी पक्षी मोठ्या संख्येने हमखास दिसून येतात. तलाव व लगतच्या अधिवासात करकोचा पक्ष्यांचे कवचयुक्त गोगलगाय (ग्रामीण भाषेत घोगोला) हे खाद्य मुबलक प्रमाणात आहेत. हे या पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे. त्यामुळे या पक्ष्याला घोघोलेफोड या नावाने स्थानिक परिसरात ओळखले जाते. या खाद्याच्या आकर्षणामुळे करकोचा पक्ष्यांची संख्या या तलावावर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे नवेगाव बांध परिसरातील लोक भाजी बनविण्याकरिता घोघोले जमा करतात. यामुळे दिवसेंदिवस खाद्य अपुरे पडल्यामुळे उघड्या चोचीचा करकोचा हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान हे जैवविविधतेने नटलेला निसर्गरम्य परिसर आहे.

या ठिकाणी मोठ्या संख्येने स्थलांतरित पक्षी दरवर्षी येतात. या विविध प्रजातींच्या पक्ष्यांना बघण्याकरिता आणि त्यांचा अभ्यास करण्याकरिता अनेक पर्यटक आणि अभ्यासक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात करकोचा पक्ष्यांची घरटी मानवी हस्तक्षेपामुळे दिसेनाशी झाली आहेत. येथील स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येतसुद्धा अलीकडे घट झाल्याचे दिसून आले आहे.

जैवविविधता आणि नवेगाव बांधच्या समृद्धीमध्ये या पक्ष्याचे मोलाचे योगदान आहे. या पक्ष्यांच्या संख्येत होणारी घट बघता या पक्ष्याचे अस्तित्व नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

संवर्धनासाठी एक पाऊल.....

उघड्या चोचीचा करकोचा हे पक्षी नवेगाव बांधच्या तलावावर मोठ्या संख्येत दिसून येत होते. हल्ली त्यांची संख्या रोडावली आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्यांच्या खाद्यावर आक्रमण होत असल्याने काळाच्या ओघात हा पक्षी नामशेष होण्याची भीती आहे. या पक्ष्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने घोघोले जमा करणाऱ्या लोकांवर वेळीच बंधने घालणे आवश्यक आहे. यासंदर्भात वन विभागाचे अधिकारी विजय धांडे, वाघ, दादा राऊत यांना प्रकृती नेचर फाउंडेशनने निवेदन दिले आहे. फाउंडेशनतर्फे नवेगाव बांध, धाबेपवनी, कोहलगाव ग्रामपंचायत तसेच मत्स्य व्यवसाय संस्थांना निवेदन देण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे डॉ. गोपाल पालिवाल, डॉ. शरद मेश्राम, प्रा. अजय राऊत व बाळकृष्ण कुंभरे उपस्थित होते. फाउंडेशनने करकोचा संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.