शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसाओ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

लाखांदूर : यंदा पावसाळ्यात अद्यापही अतिवृष्टी न झाल्याने, शेतकरी व नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामात लागवडीखालील ...

लाखांदूर : यंदा पावसाळ्यात अद्यापही अतिवृष्टी न झाल्याने, शेतकरी व नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. खरीप हंगामात लागवडीखालील पिकांना आवश्यक पाणी उपलब्ध न झाल्याने शेतपिके करपण्याच्या मार्गावर आहेत, तर पावसाच्या अभावाने वाढलेल्या उष्णतेने विविध आजारांनी नागरिक त्रस्त दिसून येत आहेत. या स्थितीत लाखांदूर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या नजरा पावसाकडे लागल्या असून, सर्वत्रच काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसाओ, असा आवाज दिला जात आहे.

यंदाच्या पावसाळ्यात खरीप हंगामादरम्यान शेतकऱ्यांद्वारे शेतात विविध पिकांची लागवड तर काही क्षेत्रात धानाची लागवड करण्यात आली आहे. धानाची ही लागवड कृषी वीज पंप व गोसेखुर्द धरणाच्या नहरांद्वारे पाणी उपलब्ध असल्याने करण्यात आली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून पावसानेे दडी मारल्याने धरणातील जलस्तर खालावले. परिणामस्वरूप भूगर्भातील जलस्तर कमी झाल्याच्या भीतीने शेतकरी व नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे.

ईटियाडोह बांधअंतर्गत भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील ४ तालुक्यांतील एकूण १७ हजार ६०८ हेक्टर क्षेत्रात सिंचन सुविधा उपलब्ध केली जात आहे. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात बांध क्षेत्रात आत्तापर्यंत केवळ ६३५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये किमान जलसाठा झाला नसल्याने गत दीड महिन्यापासून सिंचनासाठी नहरांना पाणी सोडण्यात आले नाही. परिणामी, ईटियाडोह बांध लाभक्षेत्रात शेतकऱ्यांद्वारा आत्तापर्यंत खरीप हंगामाअंतर्गत धान पिकांच्या लागवडीला प्रारंभ करण्यात आला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही अतिवृष्टी झाली नाही. गतवर्षी जुलै ते ऑगस्ट दरम्यान तीनदा पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच आत्तापर्यंत हलक्या स्वरूपाचे पाऊस पडला आहे, तर उर्वरित दिवसांत ऊन व पावसाची स्थिती राहत असल्याने सर्वत्रच उष्णतेत वाढ होत आहे. त्यामुळे शेतीकाम करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर व नागरिकांत आजार वाढले आहे. ग्रामीण भागातील शासकीय व खासगी दवाखान्यांत रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत असेच वातावरण राहिल्यास व पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या शेतपिकांसह नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे.

बॉक्स

विविध संकटांपासून वाचण्यासाठी पावसाला हाक

पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांचे शेतपीक करपण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे पावसाच्या अभावाने उष्णतेत वाढ होऊन नागरिकांसह शेतमजूर व बालकांत विविध आजार दिसून येत आहेत. कोरोना संकटामुळे गत काही महिन्यांपासून विविध संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांत पावसाळ्यामध्ये आरोग्य व पिकांच्या समृद्धीची अपेक्षा केली जात होती. मात्र, मागील दीड महिन्यापासून अपर्याप्त स्वरूपात पाऊस न पडल्याने, नागरिकांचे आरोग्य व पिकांवर निर्माण विविध संकटांपासून बचावासाठी नागरिक व शेतकऱ्यांद्वारे काले मेघा, काले मेघा पाणी तो बरसाओ, अशी हाक लावली जात आहे.