शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
5
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
6
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
7
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
8
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
10
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
11
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
12
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
13
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
14
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
15
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
16
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
17
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
18
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
19
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
20
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीही गेली अन् जीवही

By admin | Updated: May 10, 2017 00:27 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पाथरी येथील प्रकल्पग्रस्त जयेंद्र जानबा तागडे (४७) हा व्यक्ती मागील १० वर्षापासून गोसीखुर्द धरणावर कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. दरम्यान, सोमवारला धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणावरील सुरक्षा रक्षकाचे काम माथाडी बोर्डाला देऊन १५ लोकांना कामावरून कमी केले. यामध्ये जयेंद्र तागडे यांचा समावेश होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या जयेंद्रला याचा मानसिक धक्का बसून कालच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त युवकाची नोकरी व जाण्याला व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.जयेंद्र तागडे हे धरणाच्या कामाकरिता सर्व शेती, घर गेले आता काहीही शिल्लक राहिले नाही. घरी पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. सर्व मुले शिक्षणाचे. त्यामुळे प्रपंच चालवायला मोठी अडचण येत होती. अशातच १० वर्षापासूनगोसीखुर्द धरणावर कंत्राटदाराकडे सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे संसार चालवायला थोडीफार मदत झाली. धरण विभागाचे अधिकारी या सुरक्षा रक्षकांना नेहमी खोटे आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करीत आले आहेत. तुम्हाला कामावरून कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी केले जाणार नसल्याचे सांगितले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाऱ्यांची हीच भाषा होती. या जुन्या सुरक्षा रक्षकांना कालपर्यंत माथाडी बोर्डाचे कामगार घेणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नाही.काल या सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब खातरजमा केली. जयेंद्र तागडे यांना ही माहिती कळताच त्यांच्या डोळ्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या. संपूर्ण शेती धरणात गेल्यामुळे कुटुंबाचे गाडे कसे चालवायचे? उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन जवळ नव्हते. संपूर्ण कुटुंबच जयेंद्रवर अवलंबून होते. त्यामुळे कामावर कमी केल्याचा मोठा मानसिक धक्का बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर फार बिकट समस्या आली आहे. जयेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.