शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

नोकरीही गेली अन् जीवही

By admin | Updated: May 10, 2017 00:27 IST

विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द धरणासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपले घरदार, शेती दिली त्या शेतकऱ्यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. पाथरी येथील प्रकल्पग्रस्त जयेंद्र जानबा तागडे (४७) हा व्यक्ती मागील १० वर्षापासून गोसीखुर्द धरणावर कंत्राटी पद्धतीवर सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. दरम्यान, सोमवारला धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी धरणावरील सुरक्षा रक्षकाचे काम माथाडी बोर्डाला देऊन १५ लोकांना कामावरून कमी केले. यामध्ये जयेंद्र तागडे यांचा समावेश होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असणाऱ्या जयेंद्रला याचा मानसिक धक्का बसून कालच हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे प्रकल्पग्रस्त युवकाची नोकरी व जाण्याला व मृत्यूला जबाबदार असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.जयेंद्र तागडे हे धरणाच्या कामाकरिता सर्व शेती, घर गेले आता काहीही शिल्लक राहिले नाही. घरी पत्नी, दोन मुले, दोन मुली असा मोठा परिवार आहे. सर्व मुले शिक्षणाचे. त्यामुळे प्रपंच चालवायला मोठी अडचण येत होती. अशातच १० वर्षापासूनगोसीखुर्द धरणावर कंत्राटदाराकडे सुरक्षा रक्षकाचे काम मिळाले. त्यामुळे संसार चालवायला थोडीफार मदत झाली. धरण विभागाचे अधिकारी या सुरक्षा रक्षकांना नेहमी खोटे आश्वासने देवून त्यांची दिशाभूल करीत आले आहेत. तुम्हाला कामावरून कोणत्याही परिस्थितीत कामावरून कमी केले जाणार नसल्याचे सांगितले गेले. शेवटच्या क्षणापर्यंत अधिकाऱ्यांची हीच भाषा होती. या जुन्या सुरक्षा रक्षकांना कालपर्यंत माथाडी बोर्डाचे कामगार घेणार असल्याचा थांगपत्ता लागू दिला नाही.काल या सर्व जुन्या सुरक्षा रक्षकांना ही माहिती कळताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही बाब खातरजमा केली. जयेंद्र तागडे यांना ही माहिती कळताच त्यांच्या डोळ्यासमोर मोठ्या समस्या निर्माण झाल्या. संपूर्ण शेती धरणात गेल्यामुळे कुटुंबाचे गाडे कसे चालवायचे? उदरनिर्वाहाचे दुसरे कोणतेही साधन जवळ नव्हते. संपूर्ण कुटुंबच जयेंद्रवर अवलंबून होते. त्यामुळे कामावर कमी केल्याचा मोठा मानसिक धक्का बसून त्यांना हृदयविकाराचा झटका आला. दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांसमोर फार बिकट समस्या आली आहे. जयेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या धरण विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.