शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

जलकुंभ नऊ योजनांना जोडणार

By admin | Updated: June 14, 2016 00:19 IST

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असली....

सुकळी प्रादेशिक पाणी पुरवठा : शासकीय निधीची नासाडी थांबविण्याचा निर्णयचुल्हाड (सिहोरा) : बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली असली तरी वांझोटी ठरली आहे. ज्या योजनेची अभिनव जलकुंभ स्थानिक नळ योजनांना जोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.वैनगंगा व बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावे आहेत. परंतु या गावातील नागरिकांना नियोजनशुन्यता व राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने शुध्द पिण्याचे पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. या क्षेत्रातील नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन बपेरा गावाच्या हद्दीत सुकळी (नकुल) प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजुर करण्यात आली आहे. याच योजनेलगत जलशुध्दीकरण केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. पिण्याचे पाणी अती गरजू असतांना योजना जिवंत ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केले आहे. यामुळे ही योजना आजघडीला भंगारात गेली आहे. या योजनेने नागरिकांना कधी महिनाभर तहान भागविण्यासाठी पाणी दिले नाही, असे चित्र असताना लोकप्रतिनिधींनी कधी नागरिकांची महत्वाची समस्या डोक्यावर घेतली नाही. यामुळे केवळ योजनेचा सांगाडा शिल्लक ठेवण्यात आलेला आहे. याशिवाय ही योजना परिसरात इतिहासजमा झाली आहे. महत्वाकांक्षी या योजनेचे गावात अभिनव जलकुंभ उभे आहेत. या जलकुंभांचा उपयोग होत नाही. यामुळे शासकीय निधीची नासाडी होत आहे. उपयोगाविना टाकी उभ्या असल्याने अनेक शेतकरी व गावकरी, जनावरे बांधण्यासाठी वापर करीत आहे असे असले तरी गावात पाणी टंचाईचे चित्र नाही.गावात स्थानिक स्तरावर नळयोजना असून नागरिकांची तहान भागवित आहेत. पंपगृहातून थेट पाणी वाटप केले जात आहे. तर काही गावात अल्प लिटर पाणी साठवणुक करणाऱ्या टाकी आहे. पंरतु मुबलक पाणी नागरिकांना उपलब्ध करणारे साधन गावात असतांना नियोजन शून्यतेमुळे गावकरी वंचित आहेत. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अभिनव टाकी स्थानिक नळयोजनांना हस्तांतरीत करण्याची ओरड गावात सुरु झाली आहे. नागरिकांच्या सोईसाठी या अभिनव टाकी ताब्यात घेण्यास ग्रामपंचायती उत्सुक असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु जीवन प्राधीकरण योजना स्वतंत्र असल्याने पंगा घेण्याचे स्थितीत स्थानिक प्रशासन नाही. या अभिनव टाकी उपयोगाविना ठेवल्याने गावकऱ्यांचे चांगभल होत नाही. अभिनव टाकी उपयोगात आणणारा निर्णय योग्य असल्याने जिल्हा परिषदेच्या सभेत हा विषय ठेवण्यात येणार आहे. या टाकीचे नळ योजनांना हस्तांतरण दिल्यास गावात एकाच वेळी ५० हजार लिटर पाण्याची साठवणूक होणार असल्याने लोकप्रतिनिधींनी या दिशेने पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. (वार्ताहर)जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारांची गरजशासनस्तरावर जनतेच्या हितार्थ अनेक योजना राबविल्या जात आहे. परंतु प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे या योजनाचा फायदा जनतेला होत नाही. गावात लाखो रुपये खर्चून अभिनव टाकी उभ्या असतांना उपयोगात आणले जात नाही. जलयुक्त शिवार अभियानाला डोक्यावर घेतले जात आहे. पंरतु पिण्याचे पाणी साठवणूक करणारे रेडीमेट टाकी उभ्या असतांना स्थानिक नळयोजनांना हस्तांतरण केले जात नाही. मुबलक पाणी व शुध्द पाणी जनतेला पुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. येरली योजना अंधातरी जाणारयेरली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना विजेची थकबाकी वाढल्याने बंद झाली आहे. थकबाकीचे देयक करण्यासाठी ग्रामपंचायतीनी कानावर हात ठेवले आहे. सत्ताधारी व विरोधक आरोप प्रत्यारोपाचे तुणतुणे हलवित आहेत. नागरिकांनी उपाययोजना शोधण्यास सुरुवात केली आहे. या योजनेची भंगारात जाणेकडे वाटचाल सुरु झाली असून जिल्हा परिषदेने मायबापाची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा आहे.