शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

‘जलयुक्त शिवार’ने शेतकरी होऊ लागला समृद्ध

By admin | Updated: April 13, 2017 00:24 IST

निसर्गाच्या भरवशावर एक-दोन पाण्याने भात शेती जायची. रबी पीक घेणे दुरापास्त होते.

लोकमत शुभ वर्तमान : बंधाऱ्यांनी फुलविले हास्य, मोहाडी तालुक्यात सहा कोटींची कामेराजू बांते मोहाडीनिसर्गाच्या भरवशावर एक-दोन पाण्याने भात शेती जायची. रबी पीक घेणे दुरापास्त होते. पाणी टंचाई असलेल्या शिवारात जलयुक्त शिवार योजना राबविली गेली. पाणी साठवण होऊ लागले. संरक्षित सिंचन क्षेत्र वाढले. भात पिक होऊ लागले. पिकाची हमी आल्याने शेतकऱ्यांमध्ये सुखद चित्र निर्माण झाल्याचे बघावयास मिळत आहे.सिंचन क्षेत्रात वाढवून शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, सर्वांना पुरेसे पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती निर्माण करण्याच्या हेतूने डिसेंबर २०१४ मध्ये ‘जलयुक्त शिवार’ योजना सुरू झाली. सन २०१५-२०१६ पासून जलयुक्त शिवार अभियान प्रत्यक्षात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत शेततळे, सिमेंट बंधारा दुरूस्ती, नाला खोलीकरण, मजगी पुनर्जिवन, बोडी नुतनीकरण, वृक्ष लागवड, साठवण बंधारा, साठवण बंधारा दुरुस्ती, मामा तलाव दुरुस्ती, साठवण तलाव, नाला सरळीकरण व खोलीकरण, कालवा दुरुस्ती आदी कामे केली जात आहेत. पहिल्या टप्प्यात करडी, मोहगाव, बोरी, बच्छेरा, उसर्रा, टांगा, देव्हाडा, नरसिंहटोला, फुटाळा, भिकारखेडा, पारडी, पिंपळगाव, कांद्री, शिवनी खैरलांजी अशा १५ गावांची या योजनेअंतर्गत विविध कामे घेण्यात आली. २८७ कामे पूर्ण झाली. या कामामुळे ४८५.३५ हेक्टर क्षेत्रात कामे करण्यात आली. त्यामुळे २४०६ एवढ्या क्षेत्रात दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करता आला. २०१६-१७ यावर्षी महालगाव, डोंगरगाव, चिचोली, पाडोंगरी, आंधळगाव, नवेगाव, धोप, ताडगाव, जांब, हिवरा अशी १० गाव निवडण्यात आली. ९८.०७ हेक्टर क्षेत्रामध्ये १४२ कामे पूर्ण करण्यात आली. यामुळे ४४५.१६ हेक्टरमध्ये दोन संरक्षित सिंचन पाण्याचा साठा निर्माण करण्यात आला आहे. कृषी विभागाने व अन्य यंत्रनेने शेततळे, नालाखोली करण्याची कामे केली. त्यामुळे प्रखर उन्हाळ्यात ही कांद्री, खैरलांजी, बच्छेरा आदी गावाच्या नाल्यात व शेततळ्यात पाणी दिसू लागले आहे. दुरवर पाण्याचा शोध नसताना अशा स्थितीत पक्षी, जनावरे, माकडे या साठवलेल्या पाण्याने तृष्णा भागवत असल्याचे दिसून आले. दोन वर्षापुर्वी कांद्री सुखदेव मांढरे यांनी जलशिवारातून शेततळे तयार केले. पाऊण एकरात भात, गहू, वांगा ही पिके घेतात. सोबतच मत्स्य पालन सुरू केले. शेततळ्यात सिंचित जलसाठ्यावर उदर निर्वाह करीत आहे. बच्छेरा येथील भरत शहरे यांची पडीक जमीन होती. नाला खोलीकरण व बंधारा दुरूस्तीनंतर पाणी साठवण होत गेल्यामुळे लगतची शेतजमीन सुपीक झाली. आता एक वर्षापासून धान, गहू, वांग्याचा पीक घेत आहे. पडीक जागेला समृध्द करण्याची किमया पाणी साठवणीमुळे झाली. बच्छेऱ्यात तर आधी नाला खोलीकरण होवू दयायच नाही अशी काही लोकांची भुमिका होती. ज्यांना या नाला खोलीकरणाचा त्रास होणार होता अशांनी अधिकाऱ्यांचा बोलण्यावर विश्वास ठेवला. आज विरोध करणारेच म्हणतात, साहेबांमुळे आम्ही समृध्द होवू लागलोय, ही प्रतिक्रीया नीळकंठ झंझाड देताना चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.करडी क्षेत्रात मागीलवर्षी पाऊस कमी झाला होता. नाल्यात साठवण झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेवर रोवणी केली. दोनशे मीटर अंतरपर्यंत शेतकऱ्यांनी नाल्यातील पाणी नेले. धानपिक हाती आणता आले. एवढेच नाही, करडीक्षेत्र व मोहाडी क्षेत्रात मजगीच्या कामामुळे ४४ हेक्टर पडीक जमीन लागवडीखाली जलशिवार योजनेमुळे आणता आली. दोन वर्षात २ हजार ८५१ हेक्टर क्षेत्रासाठी जलयुक्त शिवारमुळे टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. दोन वर्षापुर्वी जलयुक्त शिवार योजनेतून झालेल्या कामाचा फायदा आज दिसून येत आहे. पुढेही जलयुक्त शिवाराच्या कामाचे फायदे चांगले परिणामकारक होतील, असे तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर यांनी सांगितले.