शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पडक्या घरात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:33 IST

सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देकुणी घर देता का घर ? म्हणण्याची वेळ : गरजू लोकांना घरकुलाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे. २०२० पर्यंत देशात कुणीही बेघर राहणार नाही, असे सरकारचे धोरण आहे. पण वरठी येथील घराची विदारक परिस्थिती पाहून नटसम्राट या पात्रातील ‘कुणी घर देता का घर’ अशी वाक्य आठवतात. पडक्या घरात जीव धोक्यात घेऊन मुलबाळ सोबत संसार करणाºया गरजू कुटुंबीयांना अजून घरकुल मिळाले नसल्याने सरकारचे धोरण आणि घोषणा यात तफावत असल्याचे दिसते. सरकारचे धोरण कितीही चांगले असले तरी त्याला राबवणारी सरकारी यंत्रणा आणि गावातील राजकारण हेच याला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.वरठी हे गाव झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढलेल्या गावात नवीन नवीन वस्त्या तयार झाल्या. त्याप्रमाणे शेकडो घरकुल ही तयार झालेत. अनेक वर्षात वाटप झालेले घरकुल गरजू लोकांपर्यंत पोहचले नाही तर एकाच घरातील सदस्यांनी अनेक नावांनी लाटल्याचे दिसते. यात मात्र गरजू लोकांना यातना सोसाव्या लागताना दिसते. घरकुल मिळाल्याचा विरोध नाही पण निदान गरजू लोकांना मिळावे आणि नंतर सर्वांना असे म्हणणे आहे. पण वरठी येथे २० वर्षात असे कधीच झाले नाही. एकाच घरी अनेकांच्या नावाने घरकुल मिळाले तर काही लोकांना दोनदा घरकुल मिळाले. यामुळे अनेक कुटुंबियांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे.नेहरू वाडार्तील माधव ढोक व नलिनी साठवणे यांच्या घराची विदारक तेवढीच भयंकर स्तिथी आहे. माधव ढोक आॅटोरिक्शा चालक असून आई वडील गेल्यापासून ते आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. जुन्या घराचे अध्यार्पेक्षा अधिक भाग पडलेला असून धोकादायक आहे. कवेलूच्या घराला असंख्य भगदाड पडले असून राहण्यासाठी एक खोली व स्वयंपाकघर आहे. घराजवळून नहर वाहतो. वडिलोपार्जित घराची अवस्था जनावरांच्य गोठ्यापेक्षा वाईट आहे. पावसाचे पाणी ठिकठिणाहून घरात पडते. अशा पडक्या घरात ते पत्नी व दोन मुलासह राहतात. एक दशकापासून घरकुल करीता अर्ज केला पण आजपर्यंत घरकुल मिळाले नाही. याच वार्डातील नलिनी साठवणे ही वरठी बायपास रस्त्यावर राहतात. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. यांच्या राहत्या घरातील एक भाग पडला आहे. सध्या पडक्या घराच्या शेजारी असलेल्या एका खोलीत मुला सोबत राहतात. अनेक ग्रामसभेत ते घरकुल मिळण्यासाठी भांडतात पण अजूनही त्यांना घरकुल मिळाले नाही.गांधी वॉर्डातील पुष्पां पटले कंपनीच्या मुख्य प्रवेश दाराच्या समोरासमोर त्यांचे घर आहे. त्यांची चंद्रमौळी झोपडी म्हणजे या घरात मानस राहतात म्हणायलाही लाज वाटेल असे घर आहे. अनेक वर्षांपासून या पडक्या घरात पती आणि दोन मुलासह त्यांचे वास्तव्य आहे. घर म्हणून असलेल्या आतील भागात ठिकठिकाणी उभे खांब लावले असून छतावर प्लास्टिक कागद ठेवून दगड व निरुपयोगी टायर टाकले आहेत. चार जण घरात बसतील एवढी जागा ही नाही. पती आजारी असल्यामुळे पुष्पांबाई स्वत: मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं असून शिक्षणाबरोबर ते मिळेल ते काम करून आईला पैशाची मदत करतात. माधव ढोक, नलिनी साठवणे व पुष्पा पटले मात्र उदाहरण आहेत. त्यांनी यासाठी अर्ज केला नाही किंवा ते नियमात बसत नाही असे ही नाही. या तिघांनी आतापर्यंत अनेक अर्ज केले ग्रामसभेत भांडले पण अजून पर्यंत त्यांना घरकुल मिळाले नाही. पण जे कधी आलेच नाही व नियमात बसत नाही अश्यांची गर्दीत त्यांचा आवाज दाबला गेला.घरकुलासाठी घर पाडलेनेहरू वॉर्डात तुळसाबाई लेंडे आपल्या तीन मुलासह झोपडीत राहत होत्या. चार वर्षांपूर्वी आलेल्या जोरदार पावसाने झोपडीच्या काही भाग कोसळला. तरी त्या एका भागात मुलासह राहत होत्या. दरम्यान एक नेत्याने १५ दिवसात घरकुल मंजूर करून देतो म्हणून उरलेले घर पाडायला सांगितले. घरकूलासाठी रिकामा प्लाट पाहिजे म्हणून तुळसाबाई ने घर पाडले. पण अद्याप त्यांना घरकूल मिळाले नाही. ते सध्या भाड्याच्या घरात राहतात.राजकीय इच्छाशक्तीचा अभावगरजू लोकांना घर देणे खूप कठीण नाही. एका गावात बोटावर मोजण्या पलिकडे लोक नाहीत. पण घरकुल वाटपात राजकीय स्वार्थ आणि मतदार एवढेच पाहण्याची पद्धत रूढ झालेली आहे. त्यातल्या त्यात बोलणाºयाची खार खाणे हे राजकारण्यांची परंपरा आहे. दरवर्षी शेकडो घरकुल वाटप होतात. पण ते वाटप करताना किंवा यादी बनवताना कधीच गरजू लोकांचा विचार होत नाही. एकंदरीत या सर्व समस्यांचे मूळ राजकीय इच्छाशक्ती वर अवलंबून आहे.