शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जीव धोक्यात घालून पडक्या घरात वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 00:33 IST

सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देकुणी घर देता का घर ? म्हणण्याची वेळ : गरजू लोकांना घरकुलाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : सबका साथ सबका विकास असे ब्रीदवाक्य घेऊन केंद्रात व राज्यात भाजप सरकारचे काम सुरू आहे. २०२० पर्यंत देशात कुणीही बेघर राहणार नाही, असे सरकारचे धोरण आहे. पण वरठी येथील घराची विदारक परिस्थिती पाहून नटसम्राट या पात्रातील ‘कुणी घर देता का घर’ अशी वाक्य आठवतात. पडक्या घरात जीव धोक्यात घेऊन मुलबाळ सोबत संसार करणाºया गरजू कुटुंबीयांना अजून घरकुल मिळाले नसल्याने सरकारचे धोरण आणि घोषणा यात तफावत असल्याचे दिसते. सरकारचे धोरण कितीही चांगले असले तरी त्याला राबवणारी सरकारी यंत्रणा आणि गावातील राजकारण हेच याला कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.वरठी हे गाव झपाट्याने वाढत आहे. झपाट्याने वाढलेल्या गावात नवीन नवीन वस्त्या तयार झाल्या. त्याप्रमाणे शेकडो घरकुल ही तयार झालेत. अनेक वर्षात वाटप झालेले घरकुल गरजू लोकांपर्यंत पोहचले नाही तर एकाच घरातील सदस्यांनी अनेक नावांनी लाटल्याचे दिसते. यात मात्र गरजू लोकांना यातना सोसाव्या लागताना दिसते. घरकुल मिळाल्याचा विरोध नाही पण निदान गरजू लोकांना मिळावे आणि नंतर सर्वांना असे म्हणणे आहे. पण वरठी येथे २० वर्षात असे कधीच झाले नाही. एकाच घरी अनेकांच्या नावाने घरकुल मिळाले तर काही लोकांना दोनदा घरकुल मिळाले. यामुळे अनेक कुटुंबियांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे.नेहरू वाडार्तील माधव ढोक व नलिनी साठवणे यांच्या घराची विदारक तेवढीच भयंकर स्तिथी आहे. माधव ढोक आॅटोरिक्शा चालक असून आई वडील गेल्यापासून ते आपल्या वडिलोपार्जित घरात राहतात. जुन्या घराचे अध्यार्पेक्षा अधिक भाग पडलेला असून धोकादायक आहे. कवेलूच्या घराला असंख्य भगदाड पडले असून राहण्यासाठी एक खोली व स्वयंपाकघर आहे. घराजवळून नहर वाहतो. वडिलोपार्जित घराची अवस्था जनावरांच्य गोठ्यापेक्षा वाईट आहे. पावसाचे पाणी ठिकठिणाहून घरात पडते. अशा पडक्या घरात ते पत्नी व दोन मुलासह राहतात. एक दशकापासून घरकुल करीता अर्ज केला पण आजपर्यंत घरकुल मिळाले नाही. याच वार्डातील नलिनी साठवणे ही वरठी बायपास रस्त्यावर राहतात. मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. यांच्या राहत्या घरातील एक भाग पडला आहे. सध्या पडक्या घराच्या शेजारी असलेल्या एका खोलीत मुला सोबत राहतात. अनेक ग्रामसभेत ते घरकुल मिळण्यासाठी भांडतात पण अजूनही त्यांना घरकुल मिळाले नाही.गांधी वॉर्डातील पुष्पां पटले कंपनीच्या मुख्य प्रवेश दाराच्या समोरासमोर त्यांचे घर आहे. त्यांची चंद्रमौळी झोपडी म्हणजे या घरात मानस राहतात म्हणायलाही लाज वाटेल असे घर आहे. अनेक वर्षांपासून या पडक्या घरात पती आणि दोन मुलासह त्यांचे वास्तव्य आहे. घर म्हणून असलेल्या आतील भागात ठिकठिकाणी उभे खांब लावले असून छतावर प्लास्टिक कागद ठेवून दगड व निरुपयोगी टायर टाकले आहेत. चार जण घरात बसतील एवढी जागा ही नाही. पती आजारी असल्यामुळे पुष्पांबाई स्वत: मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुलं असून शिक्षणाबरोबर ते मिळेल ते काम करून आईला पैशाची मदत करतात. माधव ढोक, नलिनी साठवणे व पुष्पा पटले मात्र उदाहरण आहेत. त्यांनी यासाठी अर्ज केला नाही किंवा ते नियमात बसत नाही असे ही नाही. या तिघांनी आतापर्यंत अनेक अर्ज केले ग्रामसभेत भांडले पण अजून पर्यंत त्यांना घरकुल मिळाले नाही. पण जे कधी आलेच नाही व नियमात बसत नाही अश्यांची गर्दीत त्यांचा आवाज दाबला गेला.घरकुलासाठी घर पाडलेनेहरू वॉर्डात तुळसाबाई लेंडे आपल्या तीन मुलासह झोपडीत राहत होत्या. चार वर्षांपूर्वी आलेल्या जोरदार पावसाने झोपडीच्या काही भाग कोसळला. तरी त्या एका भागात मुलासह राहत होत्या. दरम्यान एक नेत्याने १५ दिवसात घरकुल मंजूर करून देतो म्हणून उरलेले घर पाडायला सांगितले. घरकूलासाठी रिकामा प्लाट पाहिजे म्हणून तुळसाबाई ने घर पाडले. पण अद्याप त्यांना घरकूल मिळाले नाही. ते सध्या भाड्याच्या घरात राहतात.राजकीय इच्छाशक्तीचा अभावगरजू लोकांना घर देणे खूप कठीण नाही. एका गावात बोटावर मोजण्या पलिकडे लोक नाहीत. पण घरकुल वाटपात राजकीय स्वार्थ आणि मतदार एवढेच पाहण्याची पद्धत रूढ झालेली आहे. त्यातल्या त्यात बोलणाºयाची खार खाणे हे राजकारण्यांची परंपरा आहे. दरवर्षी शेकडो घरकुल वाटप होतात. पण ते वाटप करताना किंवा यादी बनवताना कधीच गरजू लोकांचा विचार होत नाही. एकंदरीत या सर्व समस्यांचे मूळ राजकीय इच्छाशक्ती वर अवलंबून आहे.