शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

डिझेल दरवाढीने धानाचे सिंचन महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:09 IST

तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

ठळक मुद्देपावसाची दडी : भारनियमनाचा बसतो फटका

युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.सुरुवातीला निसर्गाने चांगली साथ दिल्याने पूर्व विदर्भातील भात पीक जोमाने वाढू लागले. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे भात पीक संकटात आले आहे. अशीच अवस्था पश्चिम विदर्भातील कपाशी आणि सोयाबीनची आहे. अशा परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील कृषी फिडरवर १४ तासाचे भारनियमन आहे. त्यातच कृषी फिडरला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जातो. रात्री मजूर मिळत नसल्याने ओलीत करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक शेतकºयांनी आता डिझेल इंजिनचा आधार घेतला आहे. डिझेल इंजिन भाड्याने घेऊन शेतात सिंचन केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून इंधनाच्या किमती वाढत आहेत. याचा फटका सिंचनाला बसत आहे. भंडारा शहरात डिझेल ७८ रुपयांच्यावर पोहचले आहे. त्यामुळे डिझेल इंजिन भाड्याने घेताना शेतकºयाची दमछाक होत आहे. बैलगाडीवरील डिझेल इंजिनसाठी प्रतीतास ३०० रुपये तर ट्रॅक्टरवरील इंजिनसाठी प्रतीतास ५०० रुपये मोजावे लागते. एका तासात अर्धा एकरही ओलीत होत नाही. परंतु पीक वाचविण्याच्या धडपडीत शेतकरी ओलीत करीत आहेत. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.