शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
4
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
5
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
6
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
7
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
8
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
9
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
10
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
11
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
12
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
13
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
14
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
15
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
16
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
17
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
18
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन
19
चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही...
20
एक्सपायर झाल्यानंतर 'ही' १७ औषथे कचऱ्यात टाकण्याऐवजी टॉयलेटमध्ये फ्लश करा, कारण काय?

अर्थसहाय्य योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित

By admin | Updated: September 29, 2016 00:40 IST

कृषि व पदुम विभागाच्या १६ जुलै व ३० जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत ...

भंडारा : कृषि व पदुम विभागाच्या १६ जुलै व ३० जुलै २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत अर्थसहाय्य योजना राबविण्यासाठी शासनाने मान्यता प्रदान केली आहे. दारिद्रय रेषेखाली असणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांना कृषि विषयक योजनांचा लाभ देण्यासाठी अर्थसहाय्य योजना कृषि विभाग जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी ५ आॅक्टोंबर २०१६ पर्यंत प्रस्ताव पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करावा.सदर योजनेत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांना नवीन सिंचन विहिरीकरीता १ लाख रुपयांपर्यत तसेच विहिरी ऐवजी पंपसंच, पाईप लाईन, बैलजोडी, बैलगाडी, सुधारीत शेती औजारे, निविष्ठा इत्यादी बाबी घ्यायच्या असल्यास ५० हजार रुपयांपर्यत अनुदान देय आहे. यापेक्षा जास्त खर्च आल्यास शेतकऱ्यांचा लाभार्थी हिस्सा म्हणून राहील. पंचायत समितीकडून प्राप्त प्रस्तावाच्या छाननी नंतर जिल्हा निवड समितीकडून लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल.पात्रतेच्या अटी या प्रमाणे आहे. शेतकऱ्यांजवळ त्यांच्या स्वत:चे नावे ६ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतजमीन असावी. जमीन धारणेचा दाखला सात-बारा व ८-अ मध्ये घेण्यात यावा. सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला जोडण्यात यावा. अनुसूचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यांच्या बाबतीत ५० हजारचे आत असलेल्या वार्षिक उत्पन्नाचा दाखला जोडावा. शेतकऱ्यांने त्याच योजनेत या आधी लाभ घेतलेला नसावा. शेतकऱ्याने विहित नमुन्यात प्रस्ताव सर्व दाखल्यासह पंचायत समितीच्या कृषि विभागास सादर करावा. योजनेंतर्गत ५ आॅक्टोंबरपर्यंत प्रस्ताव पंचायत समिती मार्फत स्विकारण्यात येतील. अधिक माहितीकरीता पंचायत समितीच्या कृषि विभागाशी संपर्क साधावा. (नगर प्रतिनिधी)