वरठी : प्राण्याची निर्दयीपणे वाहतुक करणारे पाच वाहन वाहतूक विभाग भंडारा यांनी वरठीजवळील बोथली शिवारात पकडले. यात १११ जनावरांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची गौशाला लाखनी येथे रवानगी करण्यात आली. ट्रक चालकावर प्राण्यांची निदर्यपणे वाहतुक करणे अंतर्गत ११ (ड)(ई) व महाराष्ट्र प्राणी स्वंरक्षण कायदा १९५४, ९ प्रमाणे मोटार वाहन कायदा ६६/१९२ व ८३/१७७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.गोंदिया येथून प्राण्यांना निदर्यपणे वाहनात कोंबुन नेत असल्याची गुप्त सुचना वाहतुक शाखेचे रविंद्र दुबे यांना प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी भंडारा-तुमसर राज्य महामार्गावर पाळत ठेवून गोंदियाच्या दिशेकडून येणाऱ्या वाहनाना अडवले असता त्यात जनावर कोंबुन अवैध वाहतुक होत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन वाहतुक शाखेचे रविंद्र दुबे यांनी ट्रक चालक प्रमोद वंजारी (३१) रा. राजेगाव ट्रक क्रमांक एम एच ३५-१६२१, अजय मारवाडे (४०) रा. मौदा जि. बालाघाट ट्रक क्रमांक एमएच ३१ एपी १०७७, संदीप तेलासे (४०) रा. राजेगाव ट्रक क्रमांक एमएच ३५-५१०१, विजय चांदेवार (३५) रा. परसवाडा ट्रक क्रमांक एमएच ३५ के ५११३ व अब्दुल अजीज रा. नागपूर वाहन क्रमांक एमएच ४० वाय ११८६ ताब्यात घेण्यात आले. तपास पोलीस हवालदार रामरतन खेकले वरठी करीत आहेत. (वार्ताहर)
जनावरांची अवैध वाहतूक
By admin | Updated: April 26, 2016 00:26 IST