शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

बेरोजगार अभियंत्यांवर अन्याय

By admin | Updated: March 19, 2016 00:29 IST

तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर होणारा राजकीय अन्याय थांबवून जनतेच्या पैशाची होणारी लुट थांबवावी..

पत्रपरिषदेत आरोप : चौकशीची केली मागणीसाकोली : तालुक्यात सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर होणारा राजकीय अन्याय थांबवून जनतेच्या पैशाची होणारी लुट थांबवावी व सदर प्रकरणातील तालुक्यातील कामाची चौकशी करून दोषी विरूद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी उमेश कठाणे, विनायक देशमुख व ओम गायकवाड यांनी साकोली येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.शासनाने विकास कामासाठी तीन लाख रूपयापेक्षा जास्त रकमेच्या कामाची ई निविदा काढून काम देण्याचे धोरण जाहीर केले. ही कामे मजुर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना ई निविदा अंतर्गत देण्याचेही नियम आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याला कामे वाटप करताना सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद (राज्य) मध्ये नोंदणीकृत अभियंता ही एक अट घालून कामे वाटप करतात. शासनाचे विविध विभागातर्फे विकास कामाचे वाटप सुशिक्षित बेरोजगारांना केले जाते. तालुक्यातील काही ग्रामपंचायत अंतर्गत सुशिक्षित बेरोजगार यांना वाटप करण्यासाठी आरक्षीत विकास कामासाठी अट ब, क, ई हेतु पुरस्पर टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे तीन वर्षे आतमध्ये त्यांना पदविका व पदवी सुबे अ हे पात्र ठरवत नाही. शासन धोरणाप्रमाणे सुबे अ ला विकास कामे भेटलीच पाहिजे आणि त्यांची बेरोजगारी दुर होऊन त्यांना अधीक बळ भेटलाच पाहिजे. परंतु विशीष्ठ राजकीय ठेकेदारांना लाभ पुरविण्यासाठी तीन वर्षाच्या आतील सुबे अ ला जवळून त्यांच्यावर अन्याय होत आहे. निविदा, शर्ती व अटी ब, क, ई या घालुन सुबे अ मध्ये नाममात्र स्पर्धा कागदोपत्री दाखवून विशीष्ठ मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्याचे धोरण राबविले जात आहे. सुशिक्षित बेरोजगार अ च्या नावाखाली दुसऱ्यांना काम वाटप केले जात आहे. निविदामध्ये स्पर्धा नसल्यामुळे जनतेच्या लाखो रूपयाची लुट केली जात आहे. त्यांना अ ला तीन वर्षापेक्षा जास्त अनुभवाची अट टाकल्यामुळे संपूर्ण भंडारा जिल्ह्यात सहा ते सात पात्र अभियंता शिल्लक राहिलेले आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त अभियंता सुबे ज्या अटी व शर्ती मध्ये बसत नाही मात्र जनतेच्या पैशाची उधळपट्टी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सुशिक्षित बेरोजगार यांना नियमाप्रमाणे जाचक अटी वगळून स्पर्धात्मक निविदा मागविल्या असत्या तर हिच कामे १५ ते २० टक्के कमी दराने मंजुर होवून लाखो रूपयाची बचत झाली असती आणि उरलेल्या पैशातून आणखी कामे करता आली असती. जिल्ह्यात केवळ पाच ते सहाच अभियंत्याची कामे होत आहेत. यातील बरेचशे अभियंते हे दहा वर्षाच्या अटीमध्ये अपात्र आहेत. त्या अपात्र सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामे कशी काय दिली जातात याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी या पत्रपरिषदेतून करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी )