राजू बांते मोहाडीया तालुक्यात मुला-मुलींचे प्रमाण तेवढे समाधानकारक नाही. मात्र मुलींचा जन्मदर घसरतो आहे. पाच वर्षातील तफावत धक्कादायक नसती तरी चिंतनीय आहे हे आरोग्य विभागाच्या अहवालावरून दिसून आले आहे.मुलगाच वंशाचा दिवा म्हणून होणाऱ्या स्त्रीभृण हत्या थांबाव्यात, मुला-मुलींमधील मतभेद नष्ट व्हावेत यासाठी शासन, सामाजिक संस्था, विविध संघटनाच्या माध्यमातून अनेक प्रयत्न सुरू आहेत. तरी मुलींचे जन्म प्रमाण वाढता वाढेनासे झाले आहे.स्त्रीभृण हत्येचे प्रमाण वाढले आहे.गेल्या पाच वर्षात मोहाडी तालुक्यात ७३३४ एकूण मुले-मुली जन्माला आली आहेत. त्यात पाच वर्षात २०१४ अखेर ३८५० मुले व ३४९४ मुली जन्माला आल्या आहेत. २००९ ते २०१४ या काळात मुलीचे वर्षाला ८८,१३, १२०, १०२ व ४३ असा फरक दिसून आला आहे. हे प्रमाण धोकादायक नसल्याचे बोलले जाते. गेल्या पाच वर्षात मुलांच्या प्रमाणात ३६६ मुली कमी जन्माला आलेल्या आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक आवाहने आहेत. मुलांच्या तुलनेत मुलींची घटत असलेली संख्या चिंतेची बाब बनली आहे. ० ते ६ वयोगटातील मुला-मुलींमधील गुणोत्तर महत्वाचे माणण्यात येते. मुलींना कमी दर्जा दिला जातो. ही बाब २०११ सालच्या लिंग गुणोत्तर प्रमाणावरून प्रकर्षाने जाणवते. सोनोग्राफिचा गैरफायदा घेत भृण हत्येचे प्रमाण होतात. दरवर्षी होणारी मुलींची संख्या भयावह परिस्थिती निर्माण करणारी आहे. राज्यात २००१ साली दर दहाव्या मुलामागे संख्या ९१३ होती आता ती संख्या ८८३ एवढी झाली आहे. पूर्वीच्या काळात मुलगाच वंशाचा दिवा अशी भावना सर्वसामान्य बाब होती. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अवघ्या अडीच तीन महिन्यात मातेच्या पोटातील बाळ मुलगा, मुलगी आहे हे समजू लागले आहे.
मुलांचे जन्मप्रमाण वाढता वाढेना
By admin | Updated: January 22, 2015 00:36 IST