शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
2
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
3
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
4
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
6
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
7
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
8
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
9
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
10
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
11
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
12
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
13
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
14
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
15
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
16
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
17
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
18
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
19
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
20
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?

वन्यजीव-मानव संघर्षाच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : समृद्ध वनात भयमुक्त वातावरण असल्याने जिल्ह्यात वन्यजीवांची संख्या वेगाने वाढत आहे. यातूनच आता वन्यजीव आणि मानवी संघर्षाच्या घटनेतही वाढ झाली आहे. अवघ्या दहा दिवसांत वाघाने तीन गुराख्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. रानडुक्कर आणि अस्वलाच्या हल्ल्याच्याही घटना ताज्या आहेत. जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये या घटना सातत्याने घडत आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.भंडारा जिल्ह्याच्या चहूबाजूला समृद्ध जंगल आहे. तीन अभयारण्यांची सीमा भंडारा जिल्ह्यात आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानडुक्कर, निलगाय आदींसह विविध हिंस्त्र व तृणभक्षी प्राणी आहेत. मात्र अलीकडे जंगलाशेजारी असलेल्या गावांमध्ये वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत आहे. सर्वाधिक घटना तुमसर तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेतील जंगलात घडल्याचे दिसून येत आहे. १७ ऑगस्ट रोजी तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील पुनाराम कुसराम या गुराख्यावर वाघाने हल्ला केला. त्यानंतर तुमसर तालुक्यातीलच साखळी येथील भीमराज बिसने या गुराख्यावर २३ ऑगस्ट रोजी, तर आष्टी येथील गुराखी रूपचंद सोनवाने यांच्यावर २७ ऑगस्ट रोजी वाघाने हल्ला केला. तुमसर तालुक्यातील जंगलात वाघांची संख्या वाढल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे तीनही घटनास्थळ एकमेकांपासून दूर आहेत. तीनही ठिकाणी वाघानेच हल्ले केले. सुदैवाने यात कुणाचा प्राण गेला नाही. यासोबतच रानडुकराच्या हल्ल्यात लाखांदूर तालुक्यातील चिकना येथील रखमा बापू वलथरे ही महिला गंभीर जखमी झाली. पवनी तालुक्यातील गोसेखुर्द प्रकल्प परिसरात बिबट्याचा संचार असल्याचे दिसून आले. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

आमगाव परिसरात अस्वलाचा धुमाकूळ- आमगाव (दिघोरी) : कोका अभयारण्यालगत असलेल्या आमगाव शिवारात गत पंधरा दिवसांपासून एका अस्वलाने धुमाकूळ घातला असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आमगाव परिसराला लागून कोका वन्यजीव अभयारण्य आहे. अभयारण्यातील वन्यप्राणी गावाकडे धाव घेत आहेत. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. पंधरा दिवसांपासून एक अस्वल शेतात दिसून येत आहे. तसेच गावाशेजारी दिसून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे .  आठ दिवसांपूर्वी दिघोरी परिसरामध्ये एका पडीक घरात या अस्वलाने  ठाण मांडले होते. या अस्वलाला पकडण्यासाठी  प्रादेशिक वनविभागातील कर्मचाऱ्यांनी पिंजरा लावला होता. चकमा देऊन त्याने तेथून पळ काढला. तेव्हापासून ते या परिसरात फिरत आहे. अस्वलाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे.हल्ल्याची वेळ सायंकाळची- तुमसर तालुक्यात वाघाच्या तीनही घटना साधारणत: सायंकाळी ४ ते ५ या वेळातच घडल्या आहेत. ही वेळ वाघाची भ्रमण वेळ असते. त्यातही कोणत्याही वाघाने जंगलाबाहेर गावात शिरून कुणावर हल्ला केला नाही. गुराखी जंगलात असताना त्यांच्यावर हल्ला केला आहे.

वनविभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना - वन्यजीव आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जंगलव्याप्त परिसरात असलेल्या गावात दवंडी देण्यात आली. कुणीही एकटे जंगलात जाऊ नये, अशी सूचना देण्यात आल्या. वनविभागानेही या परिसरात गस्त वाढविली आहे. शेतात जाताना समूहाने जावे, तसेच सायंकाळच्या आत घराकडे परत यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्यात त्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.

 

टॅग्स :Tigerवाघ