शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
3
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
4
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
5
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
6
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
7
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
8
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
9
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
10
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
11
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
12
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
13
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
14
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार
15
"माझ्यासाठीच नाही, तर १४० कोटी भारतीयांसाठीही..."; ब्राझीलचा सर्वोच्च सन्मान मिळाल्यावर काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
16
अरे देवा! ज्या सावत्र आईचा आशीर्वाद घ्यायचा, तिच्यासोबत पळाला अल्पवयीन मुलगा; केलं लग्न
17
Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल
18
पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश
19
Video - संतापजनक! राजस्थानमध्ये उद्घाटनापूर्वीच वाहून गेला नवा रस्ता; पावसाने केली पोलखोल
20
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात

नापासांसाठी पास होण्याची प्रोत्साहन योजना

By admin | Updated: June 29, 2014 23:46 IST

मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिकवणी वर्गातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे.

राजू बांते - मोहाडी मानव विकास कार्यक्रमांतर्गत शिकवणी वर्गातून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याचा निर्णय शासनाच्या नियोजन विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातील अतिमागास जिल्ह्यांचा निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने १२५ तालुक्यात मानव विकासाचा कार्यक्रम जुलै २०११ पासून सुरु करण्यात आला आहे. शासन निर्णयान्वये राबविण्यात येत असलेल्या शिक्षणविषयक योजनांमध्ये दहावी व बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्ग सुरु करण्याची योजना आहे. या योजनेत अनुतीर्ण विद्यार्थी लगतच्या परीक्षेला बसत असेल त्यांच्यासाठी मोफत शिकवणी वर्ग चालविले जात होते. यात वर्गात विद्यार्थी न येताही बरेच शिकवणी घेणारे शिक्षकांकडून शिकवणी घेत असल्याची माहिती शिक्षक विभागाला देत होती. यामुळे तीन वर्षात शिकवणी वर्गाचा सकारात्मक बदल दिसून आला नाही. त्यामुळे ४ जानेवारी २०१४ रोजी मानव विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्यात मानव विकास योजनेअंतर्गतच्या शिक्षण विषयक योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. त्यानंतर नियोजन विभागाने इयत्ता दहावी व बारावीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या ुविद्यार्थ्यांसाठी विशेष शिकवणी वर्ग सुरु करणे या योजनेच्या अनुषंगाने खर्चास मान्यता देण्यात आली.मानव विकास अंतर्गत जिल्ह्यात मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर या तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता विशेष शिकवणी वर्गासाठी १० विद्यार्थी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. एका वर्गामध्ये विद्यार्थी संख्या २२ झाल्यास त्याची विभागणी करून प्रतिवर्ग ११ विद्यार्थ्यांमागे एकुण दोन वर्ग करण्यात यावे असा निर्णय आहे. आता पुढील मोफत शिकवणी वर्गासाठी जिल्हाधिकारी यांच्या अधिनिस्त जिल्हा निवड समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती शिकवणी वर्गासाठी १० वी गणित विषयासाठी ८० व इंग्रजी विषयासाठी १० विषयतज्ज्ञ शिक्षकांची नियुक्ती करणार आहे. तसेच १२ वी इंग्रजी विषयासाठी १० हंगामी शिक्षकांची तीन महिन्यासाठी निवड करण्यात आली आहे. निवड होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रत्येक विषयाच्या शिक्षकास तीन महिन्यासाठी एकत्रित मानधन दिला जाणार आहे. एवढेच नाही तर प्रत्येक उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमागे विषय शिकविणाऱ्या शिक्षकास एक हजार रुपये मानधन दिला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे ऊतीर्ण होण्यासाठी विद्यार्थी शिकवणी वर्गात येतो. अभ्यास करतो, तो अभ्यास करणारा पास होण्यासाठी प्रोत्साहीत व्हावा व तो पुढे शिकवणी वर्गातून पास झाला तर त्या विद्यार्थ्यांस प्रत्येक विषयासाठी दोन हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम दोन वर्षाच्या कालावधीसाठी बँकेत एफ.डी.आर. च्या स्वरुपात ठेवली जाणार आहे. आता शिवणी वर्ग भरभरून चालणार आहेत. शिकवणी वर्गासाठी च्छिुक गणित, इंग्रजी विषयात शैक्षणिक व व्यवसायीक पात्रता पूर्ण करणाऱ्यांसाठी शासनाने संधी उपलब्ध करून दिली आहे. ५ जुलै पर्यंत इच्छूक शैक्षणिक पात्रताधारकांना शिक्षणाधिकारी (माध्य.) जिल्हा परिषद भंडारा येथे अर्ज करावयाचे आहेत. शासनाच्या या योजनेमुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी प्रोत्साहन तर मिळणार आहे शिवाय बेरोजगारांना हंगामी काम मिळवून देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.