शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन

By admin | Updated: November 19, 2016 00:39 IST

आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे.

कृषी अधिकारी तुमडाम: महिलांनी प्रक्रिया उद्योग करावेबोंडगावदेवी : आपला दैनंदिन जीवनमान बदलवून सुसंस्कृत वातावरणाशी समरस होवून गुण्यागोविंदाने कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी परंपरागत धानाच्या शेतीला बगल देणे गरजेचे आहे. उत्पादित शेती मालावर प्रक्रिया करण्यासाठी आदिवासी महिला शेतकऱ्यांनी नि:संकोचपणे पुढे येवून व्यवसाय करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.तालुक्यातील ईळदा या आदिवासी गावातील आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करून नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. प्रकल्प संचालक आत्मा तसेच तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने ईळदा येथे आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, आत्मा गोंदियाचे उपप्रकल्प संचालक के.आर. सराफ, कृषी पणन तज्ज्ञ कुंभार, तालुका तंत्रज्ञ व्यवस्थापक व्ही.एच. कोहाडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी तुमडाम म्हणाले, आदिवासी महिलांनी व्यवसाय क्षेत्रात पुढे यावे. आपल्या कुटुंबाचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी पारंपरिक शेतीला बगल देवून निर्माण करण्यात आलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या मार्फत बियाणे विक्री करणे, खत विक्री करणे, धानापासून तांदूळ बनविणे यासारखे प्रक्रिया उद्योग करणे, मिरची पावडर, हळद ईत्यादी व्यवसाय करण्यासाठी धडाडीने पुढे आल्यास निश्चितपणे आर्थिक सुबत्ता नांदेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यानंतर के.आर. सराफ यांनी मानव विकास अंतर्गत प्रात्यक्षिक, यांत्रिकीकरण, बिजोत्पादन कार्यक्रम, जैविक/सेंद्रीय शेती, बाजारामध्ये ज्या वस्तूंची मागणी आहे त्या वस्तूंचे उत्पादन घेणे, कंपनीमार्फत बँक उभारणे, कंपनीला थेट पणन परवाना, कीटकनाशके, खते विक्री परवाना उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. ईळदा येथे एकत्र येवून महिलांनी तयार केलेल्या आदिवासी महिला शेतकरी उत्पादक संघाचे नोंदणी प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांच्या हस्ते महिला प्रवर्तकांना देण्यात आले. संचालन संगीता कोवे यांनी केले. आभार अलका मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला गावातील महिला शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)