शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

रेतीच्या अवैध वाहतुकीने रस्त्याची ‘ऐशीतैशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

२० लोक १० के भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की ...

२० लोक १० के

भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हेच समजेनासे झाले आहे. एवढी विदारक व दयनीय अवस्था ढिवरवाडा ते डोंगरगाव या तीन किलोमीटर रस्त्याची झालेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.

शासन नेहमी रस्त्याच्या मजबुतीकरिता व नियमित सुरळीततेकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी बांधकाम विभागामार्फत पुरवितो. मात्र, बरेचदा शासनाचा निधी रस्त्यावर न पडता कागदावरच आलबेल दाखविला जातो. असाच काही प्रकार ढिवरवाडा ते डोंगरगाव या रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे. या रस्त्याला बांधकाम विभागाने अभ्यासात घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हितार्थ बांधकाम करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकऱ्याला साधे पायीसुद्धा चालणे कठीण झाले आहे. या परिसरात शासन पुरस्कृत व स्वतंत्र शेती पुरस्कृत शेतकरी बागायत शेती करीत आहेत. त्यांना भाजीपाल्याची ने आण करण्याकरिता हा एकच मार्ग आहे. अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे अपेक्षित वेळेत बाजारपेठेत पोहोचता येत नसल्याने शेतकऱ्यांची सुमार नुकसान होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा डोळेझाक केल्याने शेतकऱ्यासह सामान्य माणूससुद्धा संकटात आलेला आहे.

वैनगंगा नदीच्या पात्रात शुभ्र रेती सहजतेने उपलब्ध आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीत रेती अत्यंत महत्त्वाची खनिज आहे. जिल्हा खनिकर्म, पोलीस विभाग अपेक्षित लक्ष देत नसल्याने या घाटावरून रेतीची वाहतूक अवैधपणे सुमार सुरू आहे. चोरटी वाहतूक असल्याने बिनबोभाट दिवस-रात्र सुरू आहे. अशा जड वाहतुकीने रस्ता संपूर्णत: खचला असून, मातीमोल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याविना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

डोंगरगाव, ढिवरवाडा हे दोन्ही गाव वैनगंगातीरी वसलेले आहेत. येथील बऱ्याच कुटुंबात रेती तस्करीचा धंदा जोमात आहे. गावातील पदाधिकारीसुद्धा रेती तस्करीत पुढे आहेत. पदाधिकाऱ्यांचे तीन किलोमीटर रस्त्यावर लक्ष न उरल्याने रस्त्याला खाच खड्ड्यांसह चिखल पसरला आहे. यापूर्वी या रस्त्यावर पडलेली गिट्टीसुद्धा परिसरातील नागरिकांनी चोरली. त्यामुळे हा रस्ता फक्त कागदावरच दिसत आहे. बांधकाम विभाग भंडारा यांनी या रस्त्याची चौकशी करून शक्य तितक्या लवकर शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.