शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या अवैध वाहतुकीने रस्त्याची ‘ऐशीतैशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

२० लोक १० के भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की ...

२० लोक १० के

भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हेच समजेनासे झाले आहे. एवढी विदारक व दयनीय अवस्था ढिवरवाडा ते डोंगरगाव या तीन किलोमीटर रस्त्याची झालेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.

शासन नेहमी रस्त्याच्या मजबुतीकरिता व नियमित सुरळीततेकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी बांधकाम विभागामार्फत पुरवितो. मात्र, बरेचदा शासनाचा निधी रस्त्यावर न पडता कागदावरच आलबेल दाखविला जातो. असाच काही प्रकार ढिवरवाडा ते डोंगरगाव या रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे. या रस्त्याला बांधकाम विभागाने अभ्यासात घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हितार्थ बांधकाम करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकऱ्याला साधे पायीसुद्धा चालणे कठीण झाले आहे. या परिसरात शासन पुरस्कृत व स्वतंत्र शेती पुरस्कृत शेतकरी बागायत शेती करीत आहेत. त्यांना भाजीपाल्याची ने आण करण्याकरिता हा एकच मार्ग आहे. अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे अपेक्षित वेळेत बाजारपेठेत पोहोचता येत नसल्याने शेतकऱ्यांची सुमार नुकसान होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा डोळेझाक केल्याने शेतकऱ्यासह सामान्य माणूससुद्धा संकटात आलेला आहे.

वैनगंगा नदीच्या पात्रात शुभ्र रेती सहजतेने उपलब्ध आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीत रेती अत्यंत महत्त्वाची खनिज आहे. जिल्हा खनिकर्म, पोलीस विभाग अपेक्षित लक्ष देत नसल्याने या घाटावरून रेतीची वाहतूक अवैधपणे सुमार सुरू आहे. चोरटी वाहतूक असल्याने बिनबोभाट दिवस-रात्र सुरू आहे. अशा जड वाहतुकीने रस्ता संपूर्णत: खचला असून, मातीमोल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याविना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

डोंगरगाव, ढिवरवाडा हे दोन्ही गाव वैनगंगातीरी वसलेले आहेत. येथील बऱ्याच कुटुंबात रेती तस्करीचा धंदा जोमात आहे. गावातील पदाधिकारीसुद्धा रेती तस्करीत पुढे आहेत. पदाधिकाऱ्यांचे तीन किलोमीटर रस्त्यावर लक्ष न उरल्याने रस्त्याला खाच खड्ड्यांसह चिखल पसरला आहे. यापूर्वी या रस्त्यावर पडलेली गिट्टीसुद्धा परिसरातील नागरिकांनी चोरली. त्यामुळे हा रस्ता फक्त कागदावरच दिसत आहे. बांधकाम विभाग भंडारा यांनी या रस्त्याची चौकशी करून शक्य तितक्या लवकर शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.