शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

रेतीच्या अवैध वाहतुकीने रस्त्याची ‘ऐशीतैशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:39 IST

२० लोक १० के भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की ...

२० लोक १० के

भंडारा : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंतचा रस्ता रेतीच्या अवैध वाहतुकीने चिखलमय झालेला आहे. चिखलात रस्ता की रस्त्यात चिखल हेच समजेनासे झाले आहे. एवढी विदारक व दयनीय अवस्था ढिवरवाडा ते डोंगरगाव या तीन किलोमीटर रस्त्याची झालेली आहे. स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणाने परिसरातील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे दिसत आहे.

शासन नेहमी रस्त्याच्या मजबुतीकरिता व नियमित सुरळीततेकरिता कोट्यवधी रुपयांचा निधी बांधकाम विभागामार्फत पुरवितो. मात्र, बरेचदा शासनाचा निधी रस्त्यावर न पडता कागदावरच आलबेल दाखविला जातो. असाच काही प्रकार ढिवरवाडा ते डोंगरगाव या रस्त्यावर अनुभवायला मिळत आहे. या रस्त्याला बांधकाम विभागाने अभ्यासात घेऊन वास्तव परिस्थिती लक्षात घेता शेतकरी हितार्थ बांधकाम करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

या तीन किलोमीटरच्या रस्त्यावर शेतकऱ्याला साधे पायीसुद्धा चालणे कठीण झाले आहे. या परिसरात शासन पुरस्कृत व स्वतंत्र शेती पुरस्कृत शेतकरी बागायत शेती करीत आहेत. त्यांना भाजीपाल्याची ने आण करण्याकरिता हा एकच मार्ग आहे. अत्यंत चिखलमय रस्त्यामुळे अपेक्षित वेळेत बाजारपेठेत पोहोचता येत नसल्याने शेतकऱ्यांची सुमार नुकसान होत आहे. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा डोळेझाक केल्याने शेतकऱ्यासह सामान्य माणूससुद्धा संकटात आलेला आहे.

वैनगंगा नदीच्या पात्रात शुभ्र रेती सहजतेने उपलब्ध आहे. नैसर्गिक खनिज संपत्तीत रेती अत्यंत महत्त्वाची खनिज आहे. जिल्हा खनिकर्म, पोलीस विभाग अपेक्षित लक्ष देत नसल्याने या घाटावरून रेतीची वाहतूक अवैधपणे सुमार सुरू आहे. चोरटी वाहतूक असल्याने बिनबोभाट दिवस-रात्र सुरू आहे. अशा जड वाहतुकीने रस्ता संपूर्णत: खचला असून, मातीमोल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रस्त्याविना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

डोंगरगाव, ढिवरवाडा हे दोन्ही गाव वैनगंगातीरी वसलेले आहेत. येथील बऱ्याच कुटुंबात रेती तस्करीचा धंदा जोमात आहे. गावातील पदाधिकारीसुद्धा रेती तस्करीत पुढे आहेत. पदाधिकाऱ्यांचे तीन किलोमीटर रस्त्यावर लक्ष न उरल्याने रस्त्याला खाच खड्ड्यांसह चिखल पसरला आहे. यापूर्वी या रस्त्यावर पडलेली गिट्टीसुद्धा परिसरातील नागरिकांनी चोरली. त्यामुळे हा रस्ता फक्त कागदावरच दिसत आहे. बांधकाम विभाग भंडारा यांनी या रस्त्याची चौकशी करून शक्य तितक्या लवकर शेतकरी वर्गाला न्याय द्यावा, अशी आमची मागणी आहे.

-बंडू बारापात्रे, अध्यक्ष बीटीबी सब्जी मंडी भंडारा.