शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
5
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
6
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
7
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
8
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
9
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
10
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
11
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
12
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
13
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
14
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
15
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
16
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
17
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
18
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
19
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
20
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’

लस घेतली की अर्धा तास केंद्रावरच थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:23 IST

गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे, एवढी काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्वांसाठी कोरोनाची ...

गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी कोरोनाची लस घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांशी बोलून घ्यावे, एवढी काळजी घेण्याची गरज आहे. याशिवाय सर्वांसाठी कोरोनाची लस सुरक्षित आहे व तसे आतापर्यंतच्या अभ्यासातून निष्पन्नही झाले आहे. काही व्यक्तींना लसीची ॲलर्जी असते किंवा काही व्यक्तींना लस घेतल्याने रिॲक्शन होते असे प्रकार घडतात. यात कोरोना लसीमुळेच त्यांच्यासोबत असे होणे शक्य नसून अन्य औषध किंवा लसींमुळेही तसे होते. यामुळेच नागरिकांना लस घेतल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने केंद्रातच अर्धा तास थांबून राहण्यास सांगितले जात आहे. यासाठी केंद्रात बसण्याची व बेडचीही व्यवस्था केली जात आहे.

मात्र काही व्यक्ती आम्हाला काहीच होत नाही असा आव आणून लस घेतल्यानंतर लगेच निघून जातात. कित्येकदा काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर भोवळ येणे, डोकेदुखी, मळमळ, अंगावर खाज, श्वास घेण्यास त्रास होणे असे रिॲक्शन होत असते.

लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी ?

कोरोना लस ही अत्यंत सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर केंद्रातून बाहेर पडल्यावर असले प्रकार घडून संबंधितांची धावपळ होऊ नये किंवा काही धोका होऊ नये यासाठीच केंद्रात अर्धा तास बसणे गरजेचे आहे. आतापर्यंत कुणालाही काही त्रास झाल्याची तक्रार आलेली नाही. काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, अंगावर खाज, मळमळ, भोवळ येणे यासारखे परिणाम दिसून येतात. मात्र हे परिणाम काही वेळापुरतेच असतात. एखाद्या व्यक्तीला काही जुना त्रास असल्यास किंवा लसींची रिॲक्शन असल्यास ते बेशुध्द होऊ शकतात किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. म्हणून लसीकरणानंतर अर्धा तास थांबावे.

लस ही रामबाण औषध

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसी अत्यंत सुरक्षित असून, त्यांच्या संपूर्ण चाचण्या करूनच वापराला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र काही व्यक्तींना लस घेतल्यानंतर डोकेदुखी, मळमळ, भोवळ व अंगदुखी तसेच ताप येण्यासारखे त्रास होतात. मात्र हे काही वेळापुरतेच राहत असून यापासून घाबरण्याचे कारण नाही.

लसीकरणात ज्या गावांचा प्रतिसाद कमी होता अशा ठिकाणी सोमवार व मंगळवारी विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात आली. १८ वर्षावरील नागरिकांनी जिल्हाभरात १६७ केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. ग्रामीण, उपजिल्हा व सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश लसीकरणासाठी केला आहे. लाभार्थ्यांनी गर्दी न करता व कोविड नियमांचे पालन करून लस घ्यावी.

- डॉ. प्रशांत उईके