शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

गावात वाटली दारू तर उमेदवाराला नक्की पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:55 IST

इंद्रपाल कटकवार भंडारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाच्या अस्मितेचा प्रश्न. कोणत्याही परिस्थितीत आपल्या गटाला निवडून आणून गावावर वर्चस्व निर्माण ...

इंद्रपाल कटकवार

भंडारा : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाच्या अस्मितेचा प्रश्न. कोणत्याही परिस्थितीत आपल्या गटाला निवडून आणून गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी धडपड. यासाठी साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर केला जातो. त्यातच निवडणूक म्हटली की ग्रामीण भागात दारूचा महापूर वाहतो. मात्र आता सोशल मीडियावर या निवडणुकीत गावात वाटली दारू तर उमेदवाराला नक्की पाडू, असा संदेश व्हायरल होत आहे. सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी तयार केलेला हा संदेश आता जिल्हाभर व्हायरल होत आहे.

जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारी रोजी होत आहे. १,२३६ जागांसाठी २,७४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मंगळवारपासून या निवडणुकीची रणधुमाळी गावागावांत सुरू झाली आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक या निवडणुकीची जय्यत तयारी करीत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. निवडणूक गावाची असली तरी रंगत मात्र लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही मोठी आहे. या निवडणुकीत ग्रामीण भागात दारूचा महापूर वाहतो. उमेदवार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दारूचे वाटप करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

अलीकडे सोशल मीडिया सर्वत्र सक्रिय आहे. ग्रामीण भागही त्याला अपवाद नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. सोशल मीडिया आणि ग्रामपंचायत निवडणूक यामुळे वेगळी राहणार तरी कशी. प्रचारासोबतच विविध गमतीजमतीही सोशल मीडियावरून निवडणुकीसंदर्भात व्हायरल होत आहेत. गावाची निवडणूक असली तरी अनेक गटांनी व्हाॅटसॲपवर आपले ग्रुप तयार केलेले आहेत. या माध्यमातून प्रचाराची रणनीती आखली जात आहे. प्रचारासोबतच काही समाजप्रबोधनात्मक संदेशही व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणूक सुदृढ वातावरणात व्हावी, अशी प्रशासनासोबतच गावातील अनेकांची इच्छा असते. परंतु दारूमुळे निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता असते. त्यामुळेच जर गावात वाटली दारू तर उमेदवाराला नक्की पाडू, हा संदेश व्हायरल होत आहे. गावागावांत सोशल मीडियावरून हा संदेश पाठवून दारूबंदीसोबतच समाज प्रबोधनात्मक संदेशही दिला जात आहे.