शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

चार दिवसात पाऊस झाला नाही तर हाती तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा स्थितीत आठ दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणस राहण्याची भीती आहे.भंडारा ...

ठळक मुद्दे२० दिवसांपासून दडी : भात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचा नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा स्थितीत आठ दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणस राहण्याची भीती आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळले जाते. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ७४ हजार हेक्टरवर धान पीकाची रोवणी झाली. ६ जूनपासून पऱ्हे फेकण्यात आले. त्यानंतर १४ ते ३० जूनपर्यंत ७५ टक्के रोवणीची कामे आटोपली. यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने रोवणी रखडली होती. परंतु आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. शेतशिवार हिरवेकंच झाले. पीक शेतात डौलाने वाढू लागले. सध्या उच्च प्रतिचे पीक गर्भार अवस्थेत आणि निम्न जातीचे पीक निसवले आहे. या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. परंतु गत २६ आॅगस्टपासून म्हणजेच तब्बल २० दिवसांपासून पाऊस बरसला नाही.दररोज कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून धानपीक कोमोजून जात आहे. येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर निसवलेला धान भरणार नाही. आणि गर्भार अवस्थेतील धान लोंब्या फेकणार नाही. पावसाने असाच ताण दिल्यास शेतकºयांच्या हाती केवळ तणीस येण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भात पिकावर रसशोसक किडींचा प्रादूर्भाव वाढत आहे. यातूनही उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे ओलीत करणे शक्य होत नाही.भंडारा येथील रहिवासी रोशन उरकुडे यांची भिलेवाडा आणि लाखनी तालुक्याच्या परसोडी येथे शेती आहे. या शेतात भात पीक जोमदार आहे. उरकुडे म्हणाले, येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर पीक हातचे जाऊ शकते. आमच्याकडे सिंचनाची सोय आहे परंतु रात्री वीज पुरवठा होत असल्याने ओलीत करणे कठीण जात आहे. अशा स्थितीत दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.वाढत्या इंधनाचा सिंचनावर परिणामभारनियमनामुळे अनेक शेतकरी डिझेल इंजिन लावून ओलीत करीत आहे. मात्र गत काही दिवसांपासून डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे डिझेल इंजिनचे भावही वाढले आहे.सध्या एका तासाला ३०० रूपये मोजावे लागतात. यातून केवळ १० गुंठे सिंचन होते. एकीकडे उत्पन्नाची हमी नाही आणि दुसरीकडे सिंचनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.उत्तरा नक्षत्राकडून आशाउत्तरा नक्षत्रात आलेला पाऊस भात पिकासाठी लाभदायक मानला जातो. ज्यावर्षी या नक्षत्रात पाऊस कोसळतो त्यावेळी उत्पन्न चांगले होते. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला तर उत्पन्न दुप्पट होवू शकते, असे शेतकरी सांगत आहे. परंतु पाऊस आला नाही तर आमच्या हाती केवळ तणीसही असे शेतकºयांनी सांगितले.सध्या भात पीक गर्भावस्थेत आणि निसवण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम १० ते २० टक्के उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीत पिकांवर कोणत्याही किडीने आक्रमण केले नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी