शहरं
Join us  
Trending Stories
1
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
2
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
3
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
4
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
5
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
6
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
7
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
8
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
9
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
10
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
11
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
12
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
13
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
14
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
15
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
16
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
17
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
18
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
19
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
20
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!

चार दिवसात पाऊस झाला नाही तर हाती तणस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा स्थितीत आठ दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणस राहण्याची भीती आहे.भंडारा ...

ठळक मुद्दे२० दिवसांपासून दडी : भात पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड, परतीच्या पावसाकडे शेतकऱ्यांचा नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाने साथ दिल्याने धानाचे पीक सुरूवातीच्या काळात जोमाने वाढले. मात्र गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. निसवलेला आणि गरर्भार अवस्थेतील भात पिकाला पावसाची नितांत गरज आहे. अशा स्थितीत आठ दिवसात पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणस राहण्याची भीती आहे.भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळले जाते. यावर्षी जिल्ह्यात एक लाख ७४ हजार हेक्टरवर धान पीकाची रोवणी झाली. ६ जूनपासून पऱ्हे फेकण्यात आले. त्यानंतर १४ ते ३० जूनपर्यंत ७५ टक्के रोवणीची कामे आटोपली. यानंतर पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने रोवणी रखडली होती. परंतु आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. शेतशिवार हिरवेकंच झाले. पीक शेतात डौलाने वाढू लागले. सध्या उच्च प्रतिचे पीक गर्भार अवस्थेत आणि निम्न जातीचे पीक निसवले आहे. या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्यकता आहे. परंतु गत २६ आॅगस्टपासून म्हणजेच तब्बल २० दिवसांपासून पाऊस बरसला नाही.दररोज कडक उन्ह तापत आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या असून धानपीक कोमोजून जात आहे. येत्या चार दिवसात पाऊस आला नाही तर निसवलेला धान भरणार नाही. आणि गर्भार अवस्थेतील धान लोंब्या फेकणार नाही. पावसाने असाच ताण दिल्यास शेतकºयांच्या हाती केवळ तणीस येण्याची शक्यता आहे. वाढत्या तापमानामुळे भात पिकावर रसशोसक किडींचा प्रादूर्भाव वाढत आहे. यातूनही उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत आहेत. मात्र भारनियमनामुळे ओलीत करणे शक्य होत नाही.भंडारा येथील रहिवासी रोशन उरकुडे यांची भिलेवाडा आणि लाखनी तालुक्याच्या परसोडी येथे शेती आहे. या शेतात भात पीक जोमदार आहे. उरकुडे म्हणाले, येत्या आठ दिवसात पाऊस आला नाही तर पीक हातचे जाऊ शकते. आमच्याकडे सिंचनाची सोय आहे परंतु रात्री वीज पुरवठा होत असल्याने ओलीत करणे कठीण जात आहे. अशा स्थितीत दिवसा वीज पुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.वाढत्या इंधनाचा सिंचनावर परिणामभारनियमनामुळे अनेक शेतकरी डिझेल इंजिन लावून ओलीत करीत आहे. मात्र गत काही दिवसांपासून डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. त्यामुळे डिझेल इंजिनचे भावही वाढले आहे.सध्या एका तासाला ३०० रूपये मोजावे लागतात. यातून केवळ १० गुंठे सिंचन होते. एकीकडे उत्पन्नाची हमी नाही आणि दुसरीकडे सिंचनावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.उत्तरा नक्षत्राकडून आशाउत्तरा नक्षत्रात आलेला पाऊस भात पिकासाठी लाभदायक मानला जातो. ज्यावर्षी या नक्षत्रात पाऊस कोसळतो त्यावेळी उत्पन्न चांगले होते. येत्या चार-पाच दिवसात पाऊस आला तर उत्पन्न दुप्पट होवू शकते, असे शेतकरी सांगत आहे. परंतु पाऊस आला नाही तर आमच्या हाती केवळ तणीसही असे शेतकºयांनी सांगितले.सध्या भात पीक गर्भावस्थेत आणि निसवण्याच्या अवस्थेत आहे. पाऊस लांबल्याचा परिणाम १० ते २० टक्के उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीत पिकांवर कोणत्याही किडीने आक्रमण केले नाही.-हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी