शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हेक्टरी २३ क्विंटल उत्पादन घेऊन शेतकऱ्यांसमोर बटाटा लागवडीचा आदर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST

तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील प्रकाश दुर्गे यांनी बटाटा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात एक एकर ...

तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा येथील प्रकाश दुर्गे यांनी बटाटा पिकाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या शेतात एक एकर बटाटा लागवड केली. मात्र, त्यानंतर बियाणाचा तुटवडा असल्यामुळे बाकी शेती पडीक ठेवली होती. अशातच भंडारा उपविभागीय कृषी, अधिकारी शांतीलाल गायधने, तुमसरचे तालुका कृषी अधिकारी विकास काळे, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायकांच्या भेटीदरम्यान प्रकाश दुर्गे यांना शेतजमीन पडीक ठेवण्यापेक्षा या हिरवळीच्या खतासाठी सोनबोरू लागवड करण्याचा आग्रह धरला. त्यानुसार कृषी विभागातर्फे त्यांना हिरवळीच्या खतासाठी सोनबोरू लागवडीसाठी ५० किलो बियाणे पुरवीत त्यांना वेळोवेळी भेटून मार्गदर्शन केले. यामुळे अवघ्या काही सोनबोरू जमिनीत गाडून काही महिन्यांतच पुन्हा बटाटा पिकाची लागवड केल्याने त्यांना त्याच अडीच एकरात २३ क्विंटल बटाट्याचे उत्पन्न मिळाले. यामध्ये दुर्गे यांना प्रतिक्विंटल सहा हजार रुपये दर मिळाला. त्यामुळे त्यांना एक लाख ३८ हजारांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये त्यांना जमीन तयार करण्यासाठी चार हजार रुपये, पाणी देणे, कापणी, मळणी यासाठी एकूण नऊ हजार रुपये, असा एकूण १३ हजार रुपये खर्च वजा करता त्यांना अडीच एकरात १ लाख २५ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला.

बॉक्स

शेतकऱ्यांनी धान पिकाची पीक पद्धत बदलावी

भंडारा जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखले जाते. मात्र, आता काळानुसार शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केल्यास कोणतेही पीक चांगले येऊ शकते, याचा आदर्शच प्रकाश दुर्गे यांनी एकरी ५० हजारांचा निव्वळ नफा मिळवून अडीच एकरात १ लाख २५ हजारांचे उत्पन्न निव्वळ नफा मिळवीत हे खरे करून दाखविले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरोना संसर्गाचे सावट असले तरीही पीक पद्धत बदलून ग्राहकांची असलेली गरज ओळखत अशा विविध पिकांची लागवड करण्याची गरज असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

कोट

मी बटाटा लागवडीचा निर्णय घेतला होता. मात्र, बियाणे उपलब्ध न झाल्याने जमीन पडीक ठेवली होती. मात्र, मला कृषी विभागाच्या मार्गदर्शनात सोनबोरू या हिरवळीच्या खत लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्यामुळेच आज मला हेक्टरी एक लाख पंचवीस हजारांचा बटाटा लागवडीतून निव्वळ नफा मिळाला. शेतजमीनही भुसभुशीत झाली आहे.

प्रकाश दुर्गे, शेतकरी, गर्रा बघेडा.

कोट

जिल्ह्यात सोनबोरूसह अन्य हिरवळीच्या खतांवर पीक चांगले येते. याचा शेतकऱ्यांना खर्चही कमी येतो आणि उत्पन्नही जास्त होते. यासोबतच शेतजमिनीचा पोत सुधारण्यासही चांगली मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक खताचा अतिरेक न करता हिरवळीची खते वापरून शेतजमिनीचा पोत सुधारण्याची आज गरज निर्माण झाली आहे. यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे.

शांतीलाल गायधने, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा.