शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
2
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
3
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
4
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
5
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
6
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
7
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
8
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
9
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
10
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
11
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
12
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
13
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
14
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
15
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
16
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
17
Aaditya Thackeray : “गेल्यावेळी ६६ नगरसेवक, तरी इनकमिंग का?”; आदित्य ठाकरेंचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
18
भारतात रॉल्स रॉयसचा 'मेगा प्लॅन'! देशाला तिसरे 'होम मार्केट' बनवण्याची घोषणा; 'या' क्षेत्रात करणार गुंतवणूक
19
“दोन गुजराती गिळायला निघालेत, पण आमच्यापासून मुंबई कोणीही हिसकावू शकत नाही”: उद्धव ठाकरे
20
धक्कादायक! ज्या मंदिरात २२ दिवसांपूर्वी लग्न केलं, तिथेच स्वत:ला संपवलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेती पाहिजे पण नवरा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण ...

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण येत नव्हती. त्या वेळेला मुलगी म्हणजे कुटुंबावरचे ओझे ही मानसिकता तळागाळात रुजलेली होती. त्यामुळे लग्न करताना फारसा विचार मुलींच्या बाजूने केला जात नव्हता. त्यावेळी मुलांचा एक वेगळाच रुबाब होता. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली. मुली शिकू लागल्या, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबासाठी भार असणाऱ्या मुली कुटुंबाचा आधार होऊ लागल्या. बदललेल्या परिस्थितीमुळे आणि मानसिकतेमुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या

नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात. पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करत आहेत. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवत असताना देखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदार आहे नोकरी करणारा असावा अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे या भूमिकेमुळे शेतकरी मुलांचे मात्र फार अवघड होत आहे. अनेक शेतकरी युवक लग्नासाठी हेलपाटे मारत आहेत.

बॉक्स

पूर्वी लग्न करताना मुलांच्या घरच्या मंडळींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असायच्या. किंबहुना त्यांचा निर्णय अखेरचा असायचा त्यामुळे लग्नामध्ये वर पक्षाची चलती पाहायला मिळायची. पण जसजसा काळ बदलत गेला तशी लग्नाची सूत्रे बदलत गेली. आज लग्न करायचे की नाही हे वधूपक्ष म्हणजे मुलींच्या बाजूवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लग्नाच्या सर्व चाव्या मुलींकडे गेलेल्या आहेत.