शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेती पाहिजे पण नवरा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण ...

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण येत नव्हती. त्या वेळेला मुलगी म्हणजे कुटुंबावरचे ओझे ही मानसिकता तळागाळात रुजलेली होती. त्यामुळे लग्न करताना फारसा विचार मुलींच्या बाजूने केला जात नव्हता. त्यावेळी मुलांचा एक वेगळाच रुबाब होता. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली. मुली शिकू लागल्या, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबासाठी भार असणाऱ्या मुली कुटुंबाचा आधार होऊ लागल्या. बदललेल्या परिस्थितीमुळे आणि मानसिकतेमुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या

नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात. पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करत आहेत. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवत असताना देखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदार आहे नोकरी करणारा असावा अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे या भूमिकेमुळे शेतकरी मुलांचे मात्र फार अवघड होत आहे. अनेक शेतकरी युवक लग्नासाठी हेलपाटे मारत आहेत.

बॉक्स

पूर्वी लग्न करताना मुलांच्या घरच्या मंडळींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असायच्या. किंबहुना त्यांचा निर्णय अखेरचा असायचा त्यामुळे लग्नामध्ये वर पक्षाची चलती पाहायला मिळायची. पण जसजसा काळ बदलत गेला तशी लग्नाची सूत्रे बदलत गेली. आज लग्न करायचे की नाही हे वधूपक्ष म्हणजे मुलींच्या बाजूवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लग्नाच्या सर्व चाव्या मुलींकडे गेलेल्या आहेत.