शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

शेती पाहिजे पण नवरा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:34 IST

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण ...

पूर्वी शेतीला प्रथम स्थान आणि नोकरीला किंवा व्यवसायाला दुय्यम स्थान दिले जायचे. त्यामुळे शेतकरी मुलांची लग्न होताना फारशी अडचण येत नव्हती. त्या वेळेला मुलगी म्हणजे कुटुंबावरचे ओझे ही मानसिकता तळागाळात रुजलेली होती. त्यामुळे लग्न करताना फारसा विचार मुलींच्या बाजूने केला जात नव्हता. त्यावेळी मुलांचा एक वेगळाच रुबाब होता. पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी लग्नाची परिभाषा बदलत गेली. मुली शिकू लागल्या, उच्च शिक्षण घेऊन नोकरी करू लागल्या. कुटुंबासाठी भार असणाऱ्या मुली कुटुंबाचा आधार होऊ लागल्या. बदललेल्या परिस्थितीमुळे आणि मानसिकतेमुळे त्यांच्या अपेक्षाही वाढल्या

नोकरी, शेती आणि चांगले घर असेल तर त्या मुलाच्या लग्नात अडचणी कमी येतात. पण ग्रामीण भागात आज अनेक युवक शेती करत आहेत. वडिलोपार्जित शेती करून चांगले उत्पन्न मिळवत असताना देखील शेतकरी मुलाला नकार घंटाच ऐकायला मिळत आहे. मुली शिकून नोकरी करत असल्यामुळे आपला जोडीदार आहे नोकरी करणारा असावा अशी त्यांची मानसिकता झालेली आहे. नोकरीवाला नवरा पाहिजे त्यातही त्याला सरकारी नोकरी पाहिजे या भूमिकेमुळे शेतकरी मुलांचे मात्र फार अवघड होत आहे. अनेक शेतकरी युवक लग्नासाठी हेलपाटे मारत आहेत.

बॉक्स

पूर्वी लग्न करताना मुलांच्या घरच्या मंडळींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असायच्या. किंबहुना त्यांचा निर्णय अखेरचा असायचा त्यामुळे लग्नामध्ये वर पक्षाची चलती पाहायला मिळायची. पण जसजसा काळ बदलत गेला तशी लग्नाची सूत्रे बदलत गेली. आज लग्न करायचे की नाही हे वधूपक्ष म्हणजे मुलींच्या बाजूवर अवलंबून आहे. त्यामुळे आता लग्नाच्या सर्व चाव्या मुलींकडे गेलेल्या आहेत.