शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाने माणूस घडला पाहिजे - काशिवार

By admin | Updated: January 22, 2017 00:35 IST

शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे.

लाखनी : शिक्षण केवळ पदव्या प्राप्त करण्यासाठी असून शिक्षणामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेला माणूस घडला पाहिजे. माणूस घडला तर आपला देश विकसीत राष्ट्र म्हणून उद्याला येण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन आमदार बाळा काशीवार यांनी व्यक्त केले.समर्थ विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वाधिक तरुणांना देश म्हणून भारत जगात महासत्ता म्हणून उदयाला येणार असून युवाशक्तीच्या जोरावर देशाचे भवितव्य घडवायचे आहे असे काशिवार पुढे म्हणाले. स्नेहसंमेलानाच्या उद्घाटीका भाग्यश्री गिलोरकर यांनी स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी विविध घटक एकत्रितपणे कार्य करतात. यामुळे एकोपा व संघ भावना वाढीस लागते असे प्रतिपादन केले. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी शारीरिक प्रात्यक्षिके, मनोरे, लेझीम नृत्य, योगासने सादर करण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्य उपस्थितांची दाद देवून गेली. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेली मनाचे श्लोक विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचे आपल्या जीवनात पालन करून देशभक्त नागरिक बनावे, असे मनोगत कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह न.ता. फरांडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी संकलीत केलेले उदय हस्तलिखीताचे प्रकाशन भाग्यश्री गिलोरकर यांनी केले. विद्यालयाच्या अहवाल वाचन विद्यार्थिनी प्रतिनिधी त्रिवेणी बिसेन हिने केले तर प्रास्ताविक प्राचार्य दिपक माने यांनी तर आभार संयोजक शालीकराम मडावी यांनी केले. कार्यक्रमास लाखनी पंचायत समितीच्या सभापती रजनीताई आत्राम, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, सदस्य बाळाजी रणदिवे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन अध्यापक अक्षय मासूरकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)