शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

खरिप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:35 IST

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा : भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली; परंतु प्रारंभापासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. पूरपरिस्थिती व अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे कंबरडे मोडले. उरली कसर कीड व रोगांच्या आक्रमणांनी पूर्ण केली. परिणामी धानाचा उतारा कमालीने घटला आहे. शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कमी उत्पन्नातून झालेला खर्च कसा काढावा आणि भविष्याची तरतूद कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांची धान कापणी व मळणीही जोमात सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मळणी आटोपल्या आहेत, त्यांचा धानाचा उतारा पायाखालची जमीन सरकविणारा ठरला आहे. एक एकरातून किमान १६ ते २५ पोती धानाचा उतारा यायला हवा होता. पण, यावर्षी केवळ ७, ८ व ९ पोती धानाचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी कंगाल, कर्ज परतफेडीचे संकट यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी पुरता नागविला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम करताना उचल केलेले शासकीय तसेच खासगी कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. घरी कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी धानाची पिसाई करावी की पूर्ण विकून पुढे मजुरी करावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

लष्करी अळी व रोगांमुळे झाली वाताहात जिल्ह्यातील हलके, मध्यम प्रकारच्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना भारी धानावर लष्करी अळीने थैमान घातले. परिपक्च अवस्थेतील भारी धानाच्या लोंबांचा सडा जमिनीवर पडला. उरली सुरली कसर तुडतुडा व अन्य रोगांनी पूर्ण केली.

एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर यावर्षी शेतकऱ्यांचा धानाचा उतारा कमालीने घटला आहे. आर्थिक संकटाने शेतकरी खचले आहेत. मशागतीपासून पहे भरणी ते रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणीपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला; मात्र एवढा खर्च करूनही उत्पन्न केवळ १० ते १५ हजारांचे हाती लागत आहे. एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

"यावर्षी एकरी २० पेक्षा अधिक धानाचे उत्पादन होणार, अशी स्थिती होती. मात्र, पीक परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी अळीने घात केला. त्यातच विविध रोगांच्या आक्रमणाने प्रत्यक्षात एकरी ८ ते १० पोतीच धान झाले. झालेला खर्चही यातून निघण्याची शक्यता नाही. मी आणि माझे कुटुंब चार महिने शेतात काम केले, त्याचा हिशेबच नाही." - गौरीशंकर राऊत, शेतकरी, पांजरा (बोरी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा