शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

खरिप उत्पादनात भारी घट, बळीराजा झाला कंगाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:35 IST

शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा : भविष्यातील तरतुदीचा प्रश्न कायम

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात यंदाच्या खरिपात सुमारे १ लाख ८१ हजार हेक्टरवर धानाची लागवड झाली; परंतु प्रारंभापासून निसर्गाने शेतकऱ्यांची साथ सोडली. पूरपरिस्थिती व अतिवृष्टीने शेतीतील पिकांचे कंबरडे मोडले. उरली कसर कीड व रोगांच्या आक्रमणांनी पूर्ण केली. परिणामी धानाचा उतारा कमालीने घटला आहे. शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. कमी उत्पन्नातून झालेला खर्च कसा काढावा आणि भविष्याची तरतूद कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. 

जिल्ह्यात खरीप हंगाम आता अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांची धान कापणी व मळणीही जोमात सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मळणी आटोपल्या आहेत, त्यांचा धानाचा उतारा पायाखालची जमीन सरकविणारा ठरला आहे. एक एकरातून किमान १६ ते २५ पोती धानाचा उतारा यायला हवा होता. पण, यावर्षी केवळ ७, ८ व ९ पोती धानाचा उतारा येत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

शेतकरी कंगाल, कर्ज परतफेडीचे संकट यंदाच्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी पुरता नागविला गेला आहे. आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला आहे. त्यामुळे शेतीचा हंगाम करताना उचल केलेले शासकीय तसेच खासगी कर्ज कसे फेडावे, याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. घरी कुटुंबाचे भरणपोषण करण्यासाठी धानाची पिसाई करावी की पूर्ण विकून पुढे मजुरी करावी, अशा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

लष्करी अळी व रोगांमुळे झाली वाताहात जिल्ह्यातील हलके, मध्यम प्रकारच्या धानाची कापणी आणि मळणी सुरु असताना भारी धानावर लष्करी अळीने थैमान घातले. परिपक्च अवस्थेतील भारी धानाच्या लोंबांचा सडा जमिनीवर पडला. उरली सुरली कसर तुडतुडा व अन्य रोगांनी पूर्ण केली.

एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर यावर्षी शेतकऱ्यांचा धानाचा उतारा कमालीने घटला आहे. आर्थिक संकटाने शेतकरी खचले आहेत. मशागतीपासून पहे भरणी ते रोवणी, निंदण, कापणी, बांधणी आणि मळणीपर्यंत शेतकऱ्यांना दर एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च झाला; मात्र एवढा खर्च करूनही उत्पन्न केवळ १० ते १५ हजारांचे हाती लागत आहे. एकूण खचपिक्षा उत्पन्न निम्म्यावर आल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

"यावर्षी एकरी २० पेक्षा अधिक धानाचे उत्पादन होणार, अशी स्थिती होती. मात्र, पीक परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी अळीने घात केला. त्यातच विविध रोगांच्या आक्रमणाने प्रत्यक्षात एकरी ८ ते १० पोतीच धान झाले. झालेला खर्चही यातून निघण्याची शक्यता नाही. मी आणि माझे कुटुंब चार महिने शेतात काम केले, त्याचा हिशेबच नाही." - गौरीशंकर राऊत, शेतकरी, पांजरा (बोरी)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा