शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
6
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
7
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
8
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
9
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
10
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
11
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
12
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
13
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
14
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
15
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
16
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
17
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
18
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
19
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
20
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...

‘स्वच्छ भारत’ कसा होईल?

By admin | Updated: January 31, 2015 00:36 IST

देशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना एसटी महामंडळाने अद्याप ती राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो.

देवानंद नंदेश्वर / प्रशांत देसाई भंडारादेशात सर्वत्र ‘स्वच्छ भारत’ मोहीम राबविली जात असताना एसटी महामंडळाने अद्याप ती राबविली की नाही, असा प्रश्न बसेसमधील अस्वच्छता पाहून पडतो. बसेसमध्ये अस्वच्छता, सीट फाटलेल्या, खुलेआम धूम्रपान केले जात असल्याने प्रवाशांचा जीव गुदमरतो. परंतु, त्यानंतरही स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. एकीकडे खासगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना हव्या त्या सुविधा देत असताना एसटी महामंडळ मात्र आहे ती स्थिती सुधारण्यास तयार नसल्याने महामंडळाला तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. 'शहर असो वा गावखेडे' तेथे जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे महामंडळाच्या गाड्यांवरच प्रवासाचे गणित अवलंबून आहे. तिकिटाचे दर वाढले म्हणून कुरकुर करणारा सर्वसामान्य माणूस नेहमीच प्रवास करण्यासाठी एसटी बसला प्राधान्य देतो. मात्र बरेचदा त्याचाही येथील गैरसोयीमूळे नाईलाज होत असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात अवैध वाहतूक फोफावली अशी ओरड सर्वच स्तरातून केली जाते. याला बऱ्याच अंशी एसटी महामंडळाचा कारभारच जबाबदार असल्याचे दिसते. ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी बसकडे कोणाचे लक्ष नाही. या बसमधून प्रवास करताना अनेक असुविधा दिसून येतात. ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसची नियमित स्वच्छताच केली जात नाही. गाडीमध्ये साचलेल्या घाणीमुळे अगदी जीव नकोसा होतो. अनेकांना तर ही दुर्गंधी सहन होत नसल्याने सातत्याने उलट्या होतात. बसमध्ये चढताक्षणीच दाराचा कोपरा पानांच्या पिचकाऱ्यांनी रंगलेला दिसतो. तेथून घाणीला सुरुवात होते. खिडक्या या उलटीने माखलेल्या असतात. वेफर्स, चिप्स खाऊन त्याचे पॅकेट संपूर्ण बसमध्ये उडत असतात. बसमध्ये मोठ्याप्रमाणात माती साचलेली असते. एखादी व्यक्ती चालू गाडीतच मनसोक्त धुम्रपान करता दिसतो. गर्दीने खचाखच भरलेल्या गाडीमध्ये हा धूर कोंडल्याने सर्वांनाच धूम्रपान घडते. हा प्रकार थांबविण्याची तसदी गाडीतील वाहक कधीच घेत नाही. सार्वजनिक ठिकाणी थुंकणेही कायद्याने निषिध्द आहे. मात्र याकडे लक्ष देण्यास कोणालाच वेळ नाही. बसमध्ये बसून धूम्रपान केले अथवा थुंकले, कचरा टाकला म्हणून कोणालाही आजपर्यंत दंड झाला नाही. त्यामुळे प्रत्येक जण बेफामपणे कोणाचीही पर्वा न करता एसटी बस रंगविण्याचे काम प्रवासादरम्यान करतो. कर्तव्यावर असलेल्या वाहकाने पुढाकार घेऊन अशा प्रवाशांची तक्रार केल्यास त्यांच्यावर कायद्यानुसार करवाई करण्याची तरतूद आहे. मात्र, वाहक अशी तक्रार करण्यास धजावत नाही. त्यामुळेच लोकवाहिनी असलेली एसटीबस आज घाणीच्या विळख्यात सापडली आहे. शिवाय बसच्या तुटक्या सीट, फुटलेल्या खिडक्या ही तर नित्याचीच बाब झाली आहे. आज सर्वत्र स्वच्छतेचा नारा दिला जात असताना एसटी महामंडळाला अजून तरी जाग आलेली दिसत नाही. एसटीसाठीसुद्धा स्वतंत्र स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. बसेसच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महामंडळाप्रमाणेच प्रवाशांवरही अवलंबून आहे. नियमित स्वच्छता झाल्यास प्रवासीसुद्धा बस अस्वच्छ करण्यास मागेपुढे पाहील. त्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.