शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
6
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
7
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
8
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
9
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
10
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
11
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
12
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
13
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
14
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
15
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
16
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
17
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
18
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
19
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
20
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची लूट आणखी किती दिवस चालणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

वरठी : थबकलेली रेल्वेची चाके धावायला लागली आहेत. पण सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास ...

वरठी : थबकलेली रेल्वेची चाके धावायला लागली आहेत. पण सर्वसाधारण प्रवाशांना प्रवासास मनाई आहे. विशेष रेल्वे गाड्यांच्या नावावर प्रवास तिकीट दुप्पट असल्याने साधारण प्रवाशांना घाम फुटत आहे. कोरोनासोबत जीवन जगायचे तंत्र नागरिकांना गवसले असले तरी रेल्वे विभागाकडून अजून किती दिवस लूट सुरू राहील, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जनजीवन हळूहळू रुळावर येत असताना वाढलेले तिकिटाचे दर सामान्य केव्हा होतील याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे.

भंडारा रोड रेल्वे स्थानक हे जिल्ह्याचे प्रवेशद्वार आहे. कमी खर्चात सुरक्षित प्रवास म्हणून रेल्वेची ख्याती होती. रेल्वे प्रवास म्हणजे सामान्य माणसाचे जीव की प्राण असल्यासारखे आहे. गत १८ महिन्यांपासून शेकडो प्रवासी रेल्वे प्रवासापासून मुकले आहेत. मागील काळात अनेक महिने रेल्वे गाड्या बंद होत्या. दीर्घ काळानंतर रेल्वेची थांबलेली चाके पुन्हा रुळावरून धावू लागली. पण रेल्वेच्या आरामदायी व सुरक्षित प्रवासापासून नागरिक अजूनही प्रवासी दूरच आहेत.

रेल्वे प्रवास करण्याकरिता निर्बंध असून मुंबई हावडा मार्गावर धावणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेने प्रवास करण्याकरिता सामान्य तिकीट विक्री बंद आहेत. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास आरक्षण केल्याशिवाय शक्य नाही. यासाठी नियमित दराच्या दुप्पट रोखीने तिकीट उपलब्ध आहेत. रेल्वे प्रवास परवडणारा नाही.

मुंबई-हावडा मार्गावर उप-डाऊन धावणाऱ्या ३४ रेल्वे गाड्या सुरू आहेत. यात ३ साप्ताहिक गाड्यांचा समावेश आहे. गोंदिया-इतवारी मार्गावर एकमेव सर्वसाधारण लोकल गाडी धावते. लोकल गाडीने प्रवास करण्यास निर्बंध नाहीत. पण कार्यालयीन किंवा व्यावसायिक दृष्टीने प्रवास करण्यास सदर रेल्वे गाडी सोयीची नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या उर्वरित गाड्याने प्रवास करावयाचे असल्याचे आरक्षण असल्याशिवाय प्रवेश मिळत नाही. रेल्वेचे प्रवासी भाडे नियमित दराच्या दुप्पट असल्याने परवडणारे नाही.

तिकीट किमती दुपटीपेक्षा जास्त

सध्या स्थितीत रेल्वे आकारात असलेले प्रवासी भाडे दुप्पटीपेक्षा जास्त असल्याची माहिती मानसिंग हिरापुरे यांनी दिली. ते तिरोडा तालुक्यातील एका खेडेगावातून वरठी सॅनफ्लॅग कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून कामावर आहेत. कोरोना प्रादुर्भावाच्या पूर्वी त्याना प्रवास करण्याकरिता लोकल तिकीट १० रुपये लागायची. सध्या त्यांना ३० रुपये मोजावे लागत आहेत. एकंदरीत सर्व ठिकाणच्या प्रवासी तिकिटात सारखीच वाढ आकारल्या जात असल्याचे कळते.

आरक्षण बंद करण्याची गरज

रेल्वे विभागाकडून आरक्षणाच्या नावावर होणारी पिळवणूक बंद करण्याची मागणी येथील व्यापारी सुधीर बागडे यांनी केली आहे. सुधीर बागडे यांचे जनरल दुकान असल्याने त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा नागपूर व गोंदिया येथे खरेदीला जावे लागते. कधी कधी जाणे ठरावीक नसते. ग्राहकाच्या मागणीनुसार धावतपळत खरेदीला जावे लागते. पण आरक्षणाचे निर्बंध असल्याने व्यवसायात नुकसानाला सामोरे जावे लागते. कोविडमुळे व्यवसाय डबघाईस आले असताना एखादी संधी मिळाली तरी रेल्वेच्या आरक्षण निर्बंधाने लाभ घेता येत नाही.

सामान्य प्रवास सुरू करण्याची गरज

रेल्वे प्रवास सुरक्षित व आर्थिक बाबतीत परवडणारे आहे. प्रवास करण्याकरिता असलेले निर्बंध हे नागरिकांच्या हिताचे आहे. कठीण काळ बघता सरकारने प्रवासबंदीच्या नियमात शिथिलता आणून सामान्य प्रवासाकरिता प्रवास निर्बंध विरहित करून जनजीवनाची घडी रुळावर येण्यास मदत करण्याचे मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश हिंगे यांनी केले.