शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

-तर विद्यार्थी घडणार कसे?

By admin | Updated: May 15, 2015 00:26 IST

ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे, हा उद्देश ठेऊन शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु केले.

लोकमत विशेषलाखांदूर : ग्रामीण भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे, हा उद्देश ठेऊन शासनाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु केले. मात्र हौसेने शिकण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे आल्यापावली परतावे लागत आहे. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था सकाळी कार्यालयीन वेळेत उघडत नाही. प्राध्यापक तसेच कर्मचारी संस्थेत उपस्थित राहत नाहीत. प्रशिक्षणार्थ्यांचे वर्ग घेतले जात नाही. ही संस्था केवळ नावापूरती ठरली असल्याचा आरोप ‘लोकमत’शी बोलताना विद्यार्थ्यांनी केला. येथील प्राचार्याकडे पवनी व लाखांदूर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार असल्याचे कळले. त्यामुळे हे प्राचार्य अनेक दिवस येथे भेट देत नाहीत. परिणामी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे काम मनमर्जीने सुरु आहे.विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्यामुळे सदर प्रतिनिधीने आयटीआयला भेट दिली असता उपस्थित एका कर्मचाऱ्याला प्राचार्य व कर्मचाऱ्याबाबत माहिती विचारली असता मला माहित नाही, असे म्हणत कार्यालयात कशासाठी आले, असा उलटप्रश्न केला. त्यानंतर फेरफटका मारला असता बहुतांश ट्रेडच्या वर्गखोल्या प्रशिक्षणार्थ्यांनी स्वत: कुलूप उघडून स्वच्छ करताना दिसले. वेल्डर आणि फिटर ट्रेडच्या विभागात ११ वाजूनही प्रशिक्षणार्थी नव्हते. या विभागाचे प्राध्यापकही अनुपस्थित होते. अशीच स्थिती मोटार मेकॅनिकल, ड्रेस मेकींग या विभागात दिसून आली. इलेक्ट्रानिक्स मेकॅनिकल या विभागाचे दार प्राध्यापक न आल्यामुळे बंद होते.त्यानंतर काही विद्यार्थ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, वर्ग भरत नाही, प्राध्यापक दिवसभर वर्गात येत नाहीत, दररोज शिकविले जात नाही. विद्यार्थी एवढ्यावरच थांबले नाही तर या संस्थेत कुणाचाही कुणावर वचक नसल्याचे सांगितले. शासनाने कोट्यावधी रुपये खर्चून याठिकाणी ईमारत बांधली. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. शासनाकडून संस्थेसाठी पुरविण्यात आलेल्या साहित्याचा काळजी घेतली जात नाही. परिणामी या साहित्याची दुर्दशा झाली आहे.सकाळी ११ वाजता एकूण २१ कर्मचाऱ्यापैकी केवळ आठ कर्मचारी उपस्थित दिसून आले. प्रवेशद्वारावर ठेवण्यात आलेल्या रजिस्टरवर त्यांच्या येण्याची नोंद दिसून आली असली तरी हे आठ कर्मचारी आपआपल्या विभागात न जाता वैयक्तिक कामात व्यस्त दिसून आले. परिणामी विद्यार्थी गप्पांमध्ये गुंतले होते. (तालुका प्रतिनिधी)आयटीआयमधून निघणारा विद्यार्थी हा कुशल कारागीर असतो. त्याची देशाला गरज आहे, हे लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्किल इंडिया’ साठी आयटीआयचा उल्लेख केला होता. असे असताना लाखांदूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणच मिळत नसल्यामुळे हे विद्यार्थी ‘स्किल इंडिया’साठी कसे पात्र ठरतील, हा विषय चिंतनाचा ठरला आहे.विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यासाठी महागड्या साहित्याचा पुरवठा केला जातो. पंरतु प्रशिक्षण दिल्या जात नसल्यामुळे अनेक महागडे साहित्य गहाळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. साहित्याच्या नोंदी किंवा आॅडिट होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. या साहित्याचे आॅडिट झाल्यास साहित्य चोरीचे घबाड उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.कर्मचारी संस्थेत वेळेवर उपस्थित होत नसल्यामुळे प्रशिक्षणासाठी आलेले प्रशिक्षणार्थी वेळेत उपस्थित होऊन वर्गखोल्यांच्या चाव्या कार्यालयातून घेतात. त्यानंतर कुलूप उघडून वर्गखोली स्वच्छ करतात. त्यानंतर वर्गात बसतात. मात्र प्राध्यापक वर्ग दिवसभर गायब राहत असल्यामुळे शिकण्यासाठी आलेले प्रशिक्षणार्थी काही वेळ वाट पाहून घराकडे निघून जातात.प्रत्येक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असते. तशीच व्यवस्था येथील प्रशिक्षणार्थ्यांसाठी करण्यात आलेली आहे. मात्र ज्याठिकाणी पिण्याच्या पाण्याची मशिन आहे, तिथे अस्वच्छता असल्यामुळे विद्यार्थी समोरच्या पानटपरीवर जावून तहान भागवितात. प्रसाधनगृहाची साफसफाई होत नसल्यामुळे कर्मचारी व प्रशिक्षणार्थी संस्थेच्या परिसरात लघुशंका करतात.