शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

पावसात घर पडले तरी घरकूल मिळाले नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 22:26 IST

चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले.

ठळक मुद्देचार वर्षांपासून प्रतीक्षा : ढोलसर येथील चौधरी परिवाराची व्यथा, प्रशासनाचे दुर्लक्ष

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : चार वर्षांपासून घरकुलासाठी ग्रामपंचायतीचे उंबरठे झिजवूनही घरकुल तर मिळाले नाही उलट गत तीन दिवसांपासून सुरु असलेल्या धो-धो पावसात राहते घरच कोसळले. यामुळे लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथील चौधरी परिवारावर उघड्यावर राहण्याची वेळ आली. विशेष म्हणजे भिंत कोसळल्याने पत्नीसह दोन मुले जखमी झाले. आता तरी ग्रामपंचायत घरकुलासाठी पुढाकार घेईल काय? असा सवाल पडलेल्या घराकडे शून्य नजरेने पाहत बिसन चौधरी करीत आहेत.ढोलसर गावात गत तीस वर्षांपासून बिसन चौधरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. भूमीहीन असलेला बिसनचा परिवार मोलमजुरीवर चालतो. मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा गाढा ओढताना घर बांधण्यासाठी त्यांच्याकडे दमडीही शिल्लक राहत नाही. मजुरीवर घर बांधणे जमले नाही. त्यातच शासनाच्या घरकुलाची योजना आली. चार वर्षापासून बिसन घरकुलाची मागणी करीत आहेत. परंतु त्याला अद्यापही घरकुल मिळाले नाही. गतवर्षी ग्रामपंचायतीने घरकुल मंजूर झाले असे सांगत बँकेत खाते उघडण्यास सांगितले. ग्रामीण बँकेत खाते काढले तर ग्रामीण बँकेचा खाते क्रमांक चालत नाही म्हणून पुन्हा बँक आॅफ इंडियाच्या शाखेत खाते उघडायला लावले. त्यानंतरही पुन्हा स्टेट बँक आॅफ इंडियात खाते उघडण्यास भाग पाडले. असा मानसिक त्रास सहन करीत चौधरी आपल्या मोडक्या घरात राहत आहेत. तीन दिवसांपासून लाखांदूर तालुक्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसात मंगळवारी सकाळी त्यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे पत्नी मीराबाई, मुलगा छगन व गुणीराम जखमी झाले.घर कोसळल्याची माहिती ग्रामपंचायतीला होताच पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली. प्रकरण आपल्यावर येईल म्हणून घरकुलासाठी धावपळ करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले.एका कुटुंबाचा प्रशासनाने असा छळ मांडल्याने गावात संताप व्यक्त होत आहे.दोषींवर कारवाई करण्याची मागणीघरकुलापासून वंचित ठेवणाऱ्या ग्रामपंचायत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बिसन चौधरी यांनी केली आहे. तसेच तात्काळ घरकुल मंजूर करून आपल्याला घरकुल द्यावे अशीही मागणी आहे. आता बिसनला घर केव्हा मिळते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.