शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

किसान ॲपचे वरातीमागून घोडे, वादळवारे येऊन गेल्यानंतर अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:39 IST

बॉक्स अपडेट वेळेत मिळावेत १) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे. २) आजच्या तुलनेत ...

बॉक्स

अपडेट वेळेत मिळावेत

१) तंत्रज्ञानाचे युग असल्याने शेतकऱ्यांनाही विविध माहिती वेळेत उपलब्ध होण्याची गरज आहे.

२) आजच्या तुलनेत पूर्वीच्या काळी मोबाईलसह इतर साधने कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घ्याव्या लागत होत्या. मात्र, आता साधनांमुळे माहिती तंत्रज्ञान अपडेट होणे गरजेचे आहे.

३) वारा, वादळ याविषयी माहिती उपलब्ध होण्यास तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बाजारपेठेचीही माहिती उपलब्ध होते. ही माहिती नेहमी अपडेट असावी.

बॉक्स

किसान ॲपवर काय काय माहिती मिळते

१) किसान ॲपवर शेतकऱ्यांना शेतीशी आवश्यक संपूर्ण माहिती मिळते.

२) हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती तसेच या ॲपद्वारे उपलब्ध होत असल्याने हवामानातील विविध बदलांनुसार शेतकऱ्यांना कामे करता येतात.

३) पीकपाणी, पिकांवरील रोगाविषयीदेखील माहिती मिळत असल्याने पिकांचे संरक्षण होऊन नुकसान टाळता येते.

४) हवामान, पिकावरील रोग राहिल्यास व अन्य आवश्यक माहिती मिळत असल्याने शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होतो.

बॉक्स

कृषी विज्ञान केंद्राबद्दल नाराजी

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत व्हावे तसेच त्यांची शेती व्यवसायात प्रगती व्हावी यासाठी शासनाने जिल्ह्यात साकोली येथे कृषी विज्ञान केंद्राची उभारणी केली. मात्र, शेतकऱ्यांना कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्रशुद्ध मार्गदर्शन होत नसल्याची अनेक शेतकऱ्यांची ओरड आहे. शासन लाखो रुपये कृषी शास्त्रज्ञांसह कृषी विज्ञान केंद्रांवर खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात याचा काहीच उपयोग होत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे

कोट

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. आज प्रत्येक शेतकरीही तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी आवश्यक सर्व माहिती कृषी ॲपद्वारे मिळते. मात्र, यात अनेकदा अडचणी येतात. त्या दूर व्हाव्यात.

किशोर ठवकर, शेतकरी.

कोट

किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणारे संदेश महत्त्वाचे आहेत. मात्र, अनेकदा तांत्रिक समस्येमुळे हे संदेश उशिराने मिळतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते.

देवानंद लांजेवार, शेतकरी

कोट

जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र आहे. मात्र, या कृषी केंद्रातर्फे शेतकऱ्यांना म्हणावी त्या तुलनेत जनजागृती करताना दिसून येत नाही. तसेच कोणते वाण चांगले व कोणते घेऊ नये याचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन कृषी केंद्रातर्फे होताना दिसत नाही.

संदीप गोस्वामी, शेतकरी