शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

लसीकरणात उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एकमेव उपाय असलेल्या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी एकमेव उपाय असलेल्या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करणाऱ्या जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतींचा १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ग्रामपंचायतींनी त्या-त्या तालुक्यात ४२ टक्क्यांच्यावर ग्रामस्थांचे लसीकरण केले आहे. ‘लस’च कोरोनाला हरविण्यासाठी रामबाण उपाय असून, नागरिकांनी लस अवश्य घ्यावी व आपले जीवन सुरक्षित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. लसीकरण मोहिमेत अन्य ग्रामपंचायतींनी या ग्रामपंचायतींचा आदर्श घ्यावा, असेही कदम यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या ग्रामपंचायतींचा सत्कार करण्यात आला. खासदार सुनील मेंढे, आमदार अभिजीत वंजारी, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधुरी माथूरकर व सरपंच यावेळी उपस्थित होते.

भंडारा तालुक्यातील गणेशपूर, मोहाडीमधील वरठी, तुमसरमधील तामसवाडी, लाखनीमधील खराशी, पवनीमधील सावली, साकोलीमधील महालगाव व लाखनी तालुक्यातील पिंपळगाव या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. सरपंच व ग्रामसेवक यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा सत्कार स्वीकारला. या ग्रामपंचायतींनी आपापल्या तालुक्यात लसीकरणाचे उत्कृष्ट नियोजन करुन तसेच ग्रामस्थांना प्रोत्साहित करुन मोठ्या प्रमाणात लसीकरण करुन घेतले आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित केल्यास मोठ्या प्रमाणात लसीकरण होईल व कोरोनापासून सुरक्षितता प्राप्त होईल.

· जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस घ्यावी व इतरांनाही लस घेण्यासाठी सांगावे. लस हेच कोरोनापासूनचे सुरक्षा कवच आहे. त्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घणे गरजेचे असून, सरपंच व ग्रामसेवकांनी गावातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करावे. लस सुरक्षित असून, त्यापासून कुठलाही धोका नाही. उलटपक्षी आरोग्य व जीवन रक्षाच होणार आहे, ही बाब नागरिकांना पटवून द्यावी, असे त्यांनी सांगितले.