शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
5
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
7
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
8
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
9
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
10
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
11
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
12
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
13
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
14
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
15
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
16
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
17
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
18
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
19
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
20
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

पालांदूर परिसरात समस्यांचा डोंगर

By admin | Updated: July 17, 2015 00:38 IST

परिसरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जनतेला अधिकारी, कर्मचारी दाद देत नाही. सामान्यमाणूस विकासाच्या व अधिकाराच्या कोसो दूर जात आहे.

पालांदूर : परिसरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. जनतेला अधिकारी, कर्मचारी दाद देत नाही. सामान्यमाणूस विकासाच्या व अधिकाराच्या कोसो दूर जात आहे. सेवेची हमी देणारा नेता व अधिकारी मनमर्जीचा झाल्याने पालांदूर परिसरातील जनता रोष व्यक्त करित आहे. राष्ट्रीय बँकेत, ग्रामीण बँकेत कर्जाचे पुर्नगठण करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. बचतखाते उघडायला येरझऱ्या घालाव्या लागतात. अधिकारी, कर्मचारी साधे बोलायला तयार नाही. वीज कार्यालयात एक ना अनेक समस्या जुन्याच आहेत, काळ बदलला पण पालांदूरचे कार्यालय मात्र समस्यांचे माहेरघरच आहे. विद्युत केंद्राची क्षमता वाढविणे, नविन वीज जोडणी देणे, खांब पुरविणे, कर्मचारी वाढविणे, दुहेरी पुरवठ्याची सोय करणे, उत्कृष्ठ दर्जाची साधने उपलब्ध करणे, अत्यंत महत्वाचे आहे. नायब तहसीलदार कार्यालय ओस पडले आहे. अधिकारी येत नाही, विद्यार्थी वर्ग सत्ताधाऱ्यांवर नाराज आहे. तालुक्याला तहसीलदार कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता ही बाब जुनीच असून निवडणूकीत मिळालेले आश्वासन फोल ठरत आहे.पालांदूर-लाखनी-भंडारा-नागपूर, पालांदूर-किटाडी-विरली, पालांदूर-मुरमाडी-पिंपळगाव आदी रस्त्यावर बसेसचा वाणवा आहे. खासगी वाहने जनावरे सारखे कोंबून अधिक पैशाच्या लालसेने प्रवाश्यांच्या जीवाशी खेळतात. वाहतुक पोलीस, ठाणेदार चिरीमिरीत जाम खुश आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत खुलेआम दारुचा महापूर वाहतो. पालांदूर शैक्षणिक नगरी असल्याने कित्येक विद्यार्थी शिक्षणाकरिता इथे येतात. त्यांच्यावर अश्या गोष्टीचा नकारात्मक परिणाम व्हायला वेळ लागत नाही. तळीरामांची सकाळपासून भररस्त्यावर आणि वस्तीत धिंगाणा घालतात. यामुळे गावाची प्रतिमा मलिन होत आहे. गांधी चौक, बाजार चौकात शालेय वेळेत वाहुक पोलिसांची नितांत गरज असतांना डोळेझाक केले जाते. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षेमतेवर प्रश्नचिन्ह उमटत आहेत. कायदयाचा धाक उरला नसल्याने गुन्हेगार प्रवृत्ती बळावत आहे.शैक्षणिक संस्था अनुदानीत असुनही प्रवेशाच्या नावावर मोठी रक्कम घेतली जाते. शाळेचा विद्यार्थी असुनही त्याला २००० रुपयाच्यावर रक्कम घेतली जाते. हे न्यायाला धरुन आहे का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. ग्रामीण रुग्णालयात वेळेत उपचार होत नाही. कर्तव्यात कसुर करुन खासगीत सेवा विकली जाते. दोन वेळेत रुग्ण तपासणी होत नाही. रुग्णकल्याण समिती कागदावरच लटकली आहे. आमदार महोदयांना वेळेच नाही. अश्यावेळी आम्ही जगायचे कसे असे भावनिक उद्गार परिसरातील जनता बोलत आहे. पशुवैद्य दवाखाान्यालाही कर्मचाऱ्यांचे जुनेच आजार असून कंपाऊडरच डॉक्टर म्हणून सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे.पशुपालक संकटात असून खासगीतली सेवा महाग झाली आहे. किराणा दुकानातून वजनमापातून सामान्य ग्राहकांची लूट सुरुच आहे. हमी भाव केंद्रातून धान विकून महिन्याच्या वर कालावधी लोटला परंतू निधी (हूंडी) आलीच नाही. शेतकरी पुरता गरीबीत आला असून त्याच्या कैवारी दिसेनाशा झाला आहे. फक्त अधिवेश आणि अधिवेशनातच अधिक वेळ वाया जातांना जाणवतो. (वार्ताहर)