शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

रुग्णालय तपासणीत उच्च रक्तदाबाचे आढळले १४,६०७ रुग्ण

By admin | Updated: May 14, 2015 00:33 IST

मधुमेह, हृदयविकाराच्या जोडीला वाढता रक्तदाब ताप देत असल्याच्या तक्रारी भंडारेकरांमध्ये वाढलेल्या आहेत.

भंडारा : मधुमेह, हृदयविकाराच्या जोडीला वाढता रक्तदाब ताप देत असल्याच्या तक्रारी भंडारेकरांमध्ये वाढलेल्या आहेत. पूर्वी चाळीशीत भेडसावणारा रक्तदाबाचा त्रास आता वयाच्या तिशीतही डोकेवर काढू लागला आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सन २०१४-१५ मध्ये ३ लाख १८ हजार ५११ जणांनी तपासणी केली. यात ३० हजार २८५ जणांना संशयित तर १४ हजार ६०७ जणांना उच्च रक्तदाब असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ मध्ये उच्च रक्तदाबाचे १५ हजार ७७१ रुग्ण आढळून आले होते.मधुमेहाइतकाच रक्तदाबाचा त्रास वाढण्याचे कारण म्हणजे ताणतणाव हे आहे. मागील काही वर्षात बदलेली जीवनशैली होय. संगणकासमोर तासनतास बसून राहिल्याने शरीराची हालचाल मंदावते. व्यायाम नसल्याने शरीराला अशक्तपणा वाढत जातो. याचा परिणाम स्थूलपणा येणे, विघटनशील द्र्रव्ये शरीरात साचत जाणे, त्यामुळे रक्तदाबाची पातळी वाढते. तेव्हा रक्तदाबाच्या व्याधीकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मानसिक ताण, व्यायामाचा अभाव, स्थूलपणा, आहारात स्निग्ध पदार्थांचा अतिरेक, तंबाखूसारखे व्यसन हे उच्च रक्तदाब वाढण्यास मदत करतात. कामचा वाढता ताण, अपुरी झोप यामुळे रक्तदाबावर परिणाम होत असतो. या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी या गोष्टी टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सोबत व्यायाम गरजेचा आहे. उच्च रक्तदाबाचे दुष्परिणाम लोकांच्या लक्षात आणून देऊन त्यांना रक्तदाबाची मोजणी नियमितपणे करण्यासाठी प्रवृत्त करावे, या उद्देशाने 'जागतिक उच्च रक्तदाब दिन' साजरा करीत असते. असे असताना उच्च रक्तदाबाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भंडारा जिल्ह्यात २०१२-१३ मध्ये १० हजार ९५२, २०१३-१४ मध्ये १५ हजार ७७१, तर २०१४-१५ मध्ये १४ हजार ६६० रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळून आले. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी एक हजार १६४ रुग्णांमध्ये घट झाली आहे तर सन २०१२-१३ च्या तुलनेत सन २०१४-१५ मध्ये तीन हजार ६५५ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक आढळून आले. (नगर प्रतिनिधी)उच्च रक्तदाब म्हणजे काय?आपल्या रक्तवाहिन्यामधून वेगाने रक्त पुढे जाताना रक्तवाहिन्यांच्या आवरणावर पडणारा दाब म्हणजे रक्तदाब होय. सर्वसाधारणपणे रक्तदाब दिवसभरात कमी-जास्त होत असतो. परंतु काहीजणांसाठी तो नेहमीच उच्च असतो. अशा लोकांना उच्च रक्तदाब पीडित संबोधले जाते. उच्च रक्तदाबामुळे हृदय, डोळे आणि मूत्रपिंडावर परिणामकारक प्रभावाचा संभव असतो. यामुळे हृदयक्रिया बंद पडणे, डोळ्यांचे आजार, हृदयरोग होण्याचा संभव असतो.रक्तदाब असल्याची लक्षणे दिसून आल्यास त्यांनी नजिकच्या रुग्णालयात जावून तपासणी करावी. उच्च रक्तदाब असल्यास औषधांचे नियमित सेवन करावे. यावर नियमित व्यायाम हा उपाय असून तसे करता येत नसेल तर किमान अर्धा तास दररोज चालावे. - आर. डब्ल्यू. कामडे,कार्यक्रम अधिकारी, असंसर्गजन्य आजार सामान्य रुग्णालय भंडारा.