शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका

By admin | Updated: March 24, 2015 00:21 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात.

पालांदूर : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. पिके लवकर वाढावीत, लवकर उत्पन्न मिळावेत त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशांतील अनेक कंपन्यात चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले. त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहेत. यासाठी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे कारले, भेंडी, वांगी, पालेभाजी, टमाटर आदी पिके विषयुक्त होत आहेत. सर्व पिकांवर उत्पादनांच्या दृष्टीने फवारणी करा असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशके मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत. देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणालाच गरज वाटत नाही. काही कालावधीत आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळाले. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या जाहिराती वाढल्या आहेत. यात व्यापारी वर्गाचा मोठा फायदा आहे. त्यांना कीटकनाशकांचे फायदे तोटे चांगले माहित आहे. तरी देखील जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्यासाठी लोकांच्या जीवनाशी खेळले जात आहे. ज्यांना याविषयी माहिती आहे अशांनी आपल्या परसबागेत खाण्यापुरते पालेभाज्यांची झाडे लावून बिगर कीटकनाशकांच्या वापराची पिके घेत आहेत. घरीच सेंद्रीय खत तयार करून झाडांना देत आहे. रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. पूर्वी घरोघरी जनावरांचे कळप असायचे. त्यांच्या मलमुत्रामुळे होणारे सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात तयार होत होते. सेंद्रीय खतामुळे पिकांची पौष्टीकता वाढत होती. गोहत्येमुळे सेंद्रीय खत मिळणे कमी झाले आहे. (वार्ताहर)