शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीचा आरोग्याला धोका

By admin | Updated: March 24, 2015 00:21 IST

कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात.

पालांदूर : कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची लागवड शेतकरी करीत असताना दिसतात. पिके लवकर वाढावीत, लवकर उत्पन्न मिळावेत त्याचप्रमाणे रोगप्रतिबंधात्मक उपाय म्हणून पिकांवर मोठ्या प्रमाणात शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करतात. त्यामुळे मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांची मागणी वाढत गेल्याने देशातील व परदेशांतील अनेक कंपन्यात चढाओढ निर्माण झाली. नवीन वाण बाजारात आले. त्यांचे उत्पादन विक्रम करीत आहेत. यासाठी कीटकनाशकांची फवारणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे शेतातून येणारे कारले, भेंडी, वांगी, पालेभाजी, टमाटर आदी पिके विषयुक्त होत आहेत. सर्व पिकांवर उत्पादनांच्या दृष्टीने फवारणी करा असा प्रचार करणारे वैज्ञानिकही आता पिकांवर वापरले जाणारे कीटकनाशके मानवासाठी नुकसानदायक असल्याचे सांगत आहेत. देशात कृषी संशोधनावर कोट्यवधी रुपये खर्च होतो. मात्र यातून होणारे फायदे तोटे सांगायची कुणालाच गरज वाटत नाही. काही कालावधीत आधुनिक शेतीमुळे भरघोस उत्पादन मिळाले. आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीचा कस कमी झाला आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे. पिकांवर फवारल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या जाहिराती वाढल्या आहेत. यात व्यापारी वर्गाचा मोठा फायदा आहे. त्यांना कीटकनाशकांचे फायदे तोटे चांगले माहित आहे. तरी देखील जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळविण्यासाठी लोकांच्या जीवनाशी खेळले जात आहे. ज्यांना याविषयी माहिती आहे अशांनी आपल्या परसबागेत खाण्यापुरते पालेभाज्यांची झाडे लावून बिगर कीटकनाशकांच्या वापराची पिके घेत आहेत. घरीच सेंद्रीय खत तयार करून झाडांना देत आहे. रसायनांचे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर सेंद्रीय शेतीची संकल्पना समोर आली आहे. पूर्वी घरोघरी जनावरांचे कळप असायचे. त्यांच्या मलमुत्रामुळे होणारे सेंद्रीय खत मोठ्या प्रमाणात तयार होत होते. सेंद्रीय खतामुळे पिकांची पौष्टीकता वाढत होती. गोहत्येमुळे सेंद्रीय खत मिळणे कमी झाले आहे. (वार्ताहर)