शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

धुळ कणांमुळे आरोग्याला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 22:12 IST

देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्यावर जळजळ होते. रासायनिक राख असल्याने प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे.देव्हाडी येथे मुंबई- हावडा रेल्वे फाटकावर उडाणपूलाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. फाटकाच्या दोन्ही बाजूला ‘अप्रोच’ उडाणपूलाचे कामात अदानी वीज कारखान्यातील राखेचा भराव करण्यात आला. पावसाळ्यात उडाणपूलातून पाण्यासह राख पर्यायी रस्त्यावर जमा होत आहे. पाऊस थांबल्यानंतर ही राख रस्त्यावर पडून ती वाळते. त्यानंतर वाहनाच्या रहादारीमुळे ती उडते. वाहने गेल्यावर वातावरणात राखेचा पांढरा थर सर्वत्र दिसतो. समोरची वाहने दिसत नाही.राख श्वास घेतानी नाकात गेल्यावर खोकला येतो, श्वास घेण्यास त्रास होतो. डोळ्यात गेल्यावर मोठी जळजळ होते. लहान मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. पर्यायी रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. या मार्गाने लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची वर्दळ आहे, परंतु सर्वच निमूटपणे येथून जात आहेत. वीज कारखान्यातील राख मानवी शरीरास घातक असल्याचे समजते. उडाणपूलाच्या बांधकामाकडे जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.उडाणपूलाच्या भरावात मुरुमाचा वापर करण्यात आलानाही येथे रासायनिक राखेचा वापर करण्यात आला. उडाणपूलाच्या दोन्ही बाजूला सिमेंट दगडातून लिकेजमुळे पाणी बाहेर निघत आहे. बांधकामात सदोष स्थिती आहे काय? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. किमान दगडाजवळ मुरुमाचा थर देण्याची येथे गरज होती. १७ ते २० कोटींचे हे बांधकाम आहे. मुरुम उपलब्ध हो तनाही, म्हणून अदानी वीज कारखान्यातील राखेचा उपयोग भरावात करण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या मदतीने हा उडाणपूल तयार होत आहे. उडाणपूलावर नागपूर येथील बांधकाम खात्याचे नियंत्रणात कामे सुरु आहेत.परिसरातील नागरिकांना त्रास, डोळ्याचे आजार बळावले आहे. प्रशासन लक्ष देण्यास तयार नाही. अनेक तक्रारी केली, पंरतु कारवाई मात्र शुन्य आहे.अदानीची राख रासायनिक आहे. या राखेमुळे मानवी जिवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. पूलात राखेचा भराव करण्याची मंजूरी होती काय? याची चौकशी करण्याची गरज आहे. सतत राखेचा तवंग परिसरात राहणे धोकादायक आहे.- डॉ. पंकज कारेमोरेयुवा काँग्रेस नेते तुमसर