शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

आरोग्याबाबत जागरूक पण साेशल मीडिया वापरात बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला ...

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला जात हाेता. कुठेही चमचमीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारला जात हाेता. परंतु आता अगदी साध्या जेवणाकडे सर्वांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. तेलकट पदार्थांऐवजी फळांचा वापर जेवणात वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यांकडे अनेकजण वळले असून हाॅटेलपेक्षा घरीच जेवणाकडे कल वाढला आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पहाटे फिरायला जाणे, व्यायाम हाही आता अनेकांच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे.

काेराेना संसर्गामुळे अनेकांची मन:स्थिती बिघडली आहे. काेराेनाच्या संकटाने अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येत आहे. कुटुंबात विसंवाद वाढत आहे. सतत माेबाईलवर राहत असल्याने डाेळ्याचे आजार जडले असून अनेकांची झाेप उडाली आहे. अशा व्यक्तींचे समुपदेशन करण्याची गरज आहे. मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. रत्नाकर बांडेबुचे म्हणाले, सकारात्मक विचार हा यावरचा प्रभावी उपाय आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, डाेक्यात आलेले विचार तणावपूर्ण असतील ते इतरांशी शेअर करावे, एखादा छंद जाेपासावा, माेबाईल व इंटरनेटचा वापर गरजेपुरता करावा, असे त्यांनी सांगितले.

काेराेना संकटाने अनेकांना माेबाईलचे व्यसन जडले आहे. माेबाईलवर येणारा प्रत्येक संदेश खरा मानणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अलीकडे काेराेनाबाबतच्या विविध माहितींचा खच साेशल मीडियातून पडत आहे. यातील नेमके खरे काेणते आणि खाेटे काय, हे कळायला मार्ग नसताे. मात्र अनेकजण त्यावर येणारी माहिती खरी मानत आहेत. काेराेनावर विविध उपाय सांगून दिशाभूल करणारे मॅसेजही साेशल मीडियातून फिरत असतात. मात्र अशा मॅसेजबाबत कुणी तक्रार करीत नाही की कारवाईही केली जात नाही. जे साेशल मीडियात आले ते खरे मानून अनेकजण पॅनिक हाेत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. यासाठी प्रत्येकाने सदसदविवेक बुध्दीचा वापर करावा. काेणताही उपचार करण्यापूर्वीचा डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तर सायबर कायद्यांतर्गत हाेऊ शकते कारवाई

n अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून आराेग्य असाे की इतर काेणत्याही बाबतीत अफवा पसरविणे गुन्हाच आहे. कुणी याबाबत तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असे भंडाराचे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याचे अकाऊंट थांबविण्यापासून माेबाईल, कॉम्प्युटर व इतर डिव्हाईस जप्त करण्याची कारवाई करता येते. फेक आयडी असणाऱ्यांचाही शाेध घेतला जाताे. यासाठी तक्रारीची गरज असल्याचे भारती यांनी सांगितले.