शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

आरोग्याबाबत जागरूक पण साेशल मीडिया वापरात बेफिकीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:36 IST

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला ...

काेराेना संसर्ग हाेण्यापूर्वीचा काळ आणि आता यात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. आधी तेलकट, तुपकट पदार्थांचे सेवन करून कोलेस्टेरॉल वाढविला जात हाेता. कुठेही चमचमीत पदार्थ दिसले की त्यावर ताव मारला जात हाेता. परंतु आता अगदी साध्या जेवणाकडे सर्वांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. तेलकट पदार्थांऐवजी फळांचा वापर जेवणात वाढला आहे. हिरव्या पालेभाज्यांकडे अनेकजण वळले असून हाॅटेलपेक्षा घरीच जेवणाकडे कल वाढला आहे. राेगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वजण प्रयत्न करीत आहेत. पहाटे फिरायला जाणे, व्यायाम हाही आता अनेकांच्या दैनंदिनीचा भाग झाला आहे.

काेराेना संसर्गामुळे अनेकांची मन:स्थिती बिघडली आहे. काेराेनाच्या संकटाने अनेकांच्या नाेकऱ्या गेल्या. व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येत आहे. कुटुंबात विसंवाद वाढत आहे. सतत माेबाईलवर राहत असल्याने डाेळ्याचे आजार जडले असून अनेकांची झाेप उडाली आहे. अशा व्यक्तींचे समुपदेशन करण्याची गरज आहे. मानसाेपचारतज्ज्ञ डाॅ. रत्नाकर बांडेबुचे म्हणाले, सकारात्मक विचार हा यावरचा प्रभावी उपाय आहे. आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा, डाेक्यात आलेले विचार तणावपूर्ण असतील ते इतरांशी शेअर करावे, एखादा छंद जाेपासावा, माेबाईल व इंटरनेटचा वापर गरजेपुरता करावा, असे त्यांनी सांगितले.

काेराेना संकटाने अनेकांना माेबाईलचे व्यसन जडले आहे. माेबाईलवर येणारा प्रत्येक संदेश खरा मानणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. अलीकडे काेराेनाबाबतच्या विविध माहितींचा खच साेशल मीडियातून पडत आहे. यातील नेमके खरे काेणते आणि खाेटे काय, हे कळायला मार्ग नसताे. मात्र अनेकजण त्यावर येणारी माहिती खरी मानत आहेत. काेराेनावर विविध उपाय सांगून दिशाभूल करणारे मॅसेजही साेशल मीडियातून फिरत असतात. मात्र अशा मॅसेजबाबत कुणी तक्रार करीत नाही की कारवाईही केली जात नाही. जे साेशल मीडियात आले ते खरे मानून अनेकजण पॅनिक हाेत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. यासाठी प्रत्येकाने सदसदविवेक बुध्दीचा वापर करावा. काेणताही उपचार करण्यापूर्वीचा डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

तर सायबर कायद्यांतर्गत हाेऊ शकते कारवाई

n अफवा पसरविणे हा कायद्याने गुन्हा आहे. साेशल मीडियाच्या माध्यमातून आराेग्य असाे की इतर काेणत्याही बाबतीत अफवा पसरविणे गुन्हाच आहे. कुणी याबाबत तक्रार दाखल केली तर त्यांच्यावर सायबर कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते, असे भंडाराचे अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी सांगितले. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याचे अकाऊंट थांबविण्यापासून माेबाईल, कॉम्प्युटर व इतर डिव्हाईस जप्त करण्याची कारवाई करता येते. फेक आयडी असणाऱ्यांचाही शाेध घेतला जाताे. यासाठी तक्रारीची गरज असल्याचे भारती यांनी सांगितले.