शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
6
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
7
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
8
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
9
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
10
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
11
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
12
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
13
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
14
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
15
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
16
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
17
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
18
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
19
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
20
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात

दोन लाख नागरिकांच्या हातात ‘विषाचा प्याला’

By admin | Updated: April 17, 2017 00:30 IST

नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांना पिण्यासाठी तसेच शेतीला सिंचनासाठी जलपुरवठा होतो. त्यामुळे नदीला जीवनदायीनी असे संबोधल्या जाते.

नागनदीच्या दूषित पाण्याचा पुरवठा : वैनगंगा नदीला आले गटाराचे स्वरुप, नागरिकांसह जनावरांचे आयुर्मान धोक्यातभंडारा : नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांना पिण्यासाठी तसेच शेतीला सिंचनासाठी जलपुरवठा होतो. त्यामुळे नदीला जीवनदायीनी असे संबोधल्या जाते. मात्र, भंडाऱ्याची वैनगंगा नदी ही आता नागरिकांच्या आरोग्यावर उठली आहे. नागनदीचे लाखो लिटर दूषित पाणी वैनगंगेत सोडण्यात येत असल्याने ते दररोज सुमारे २ लाख नागरिक पितात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात पवनी तालुक्यात गोसीखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणामुळे वैनगंगा नदीचे प्रवाहित पाणी सन २०१४-१५ पासून अडविण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था होत असली तरी अनेक नागरिकांना हेच धरण शाप ठरले आहे. वैनगंगा नदीकाठावर सुमारे २० ते २५ गावे वसलेली आहेत. यात गणेशपूर, पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, साहुली, पिपरी, सावरी, जवाहरनगर, कोंढी, राजेदहेगाव, पेवठा, भंडारा, कारधा यासह अनेक गावांचा समावेश आहे. नागपूर येथील नाग नदीच्या प्रवाहातून वैनगंगा नदीला दररोज लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेवठा या गावाजवळ नाग नदी वैनगंगा नदीला मिळते. त्या माध्यमातूनच नागपूर येथील मलमुत्र, रासायनिक व जैविक घटकांचा समावेश असलेले व आरोग्यास अत्यंत हानीकारक असे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना चर्मरोगाच्या आजारासह अन्य रोगांची लागण होत असल्याचे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.गोसे धरणाच्या बांधकामानंतर वैनगंगा नदीचे पाणी अडविण्यात आले असल्याने तेव्हापासून नाग नदीतून येणाऱ्या दूषित पाण्याच्या साठ्यामुळे ही नदी आता गटाराचे स्वरुप धारण करीत आहे. अत्यंत दूषित असलेल्या या पाण्याचा जनावरेही पिण्यासाठी वापर करीत नाही. असे घाण पाणी नदीकाठावरील गावातील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळजोडणीधारक नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. यामुळे दररोज लाखो लिटर दूषित पाणी सुमारे दोन लाखांच्या वरील नागरिकांच्या पोटात जात असल्यामुळे हा ‘विषाचा प्याला’ प्रत्येक घरात, प्रत्येक नागरिकांच्या हातात दिसून येतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावरे व जंगली प्राणीही प्रभावित झाली आहे. नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे आवाज उठविला. मात्र नाग नदीच्या दूषित पाण्याचा प्रवाह बंद करण्यास प्रशासनाने अद्याप सहकार्य केलेले नाही. (शहर प्रतिनिधी)जलशुद्धीकरण यंत्राची आवश्यकतावैनगंगा नदीकाठावर अनेक गावे वसलेली असून येथील नागरिकांना होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा थेट गावाच्या पाण्याच्या टाकीतून पोहचतो. तेथून सरळ नळजोडणीधारकांना पुरवठा होत आहे. मात्र ज्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने नागरिकांना ते दूषित रासायनिक व मलमुत्रयुक्त पाणी मागील अनेक वर्षांपासून नाईलाजाने प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे भविष्यात अनेक व्याध्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. प्रशासनाची भूमिका संशयास्पदएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदींचे पुनरूज्जीवन व सफाईवर भर दिला आहे. असे असताना भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीत लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग होत असताना प्रशासन अद्यापही निद्रीस्त आहे. लाखो लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले असताना प्रशासनाने याबाबत कुठलेही ठोस पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.