शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

दोन लाख नागरिकांच्या हातात ‘विषाचा प्याला’

By admin | Updated: April 17, 2017 00:30 IST

नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांना पिण्यासाठी तसेच शेतीला सिंचनासाठी जलपुरवठा होतो. त्यामुळे नदीला जीवनदायीनी असे संबोधल्या जाते.

नागनदीच्या दूषित पाण्याचा पुरवठा : वैनगंगा नदीला आले गटाराचे स्वरुप, नागरिकांसह जनावरांचे आयुर्मान धोक्यातभंडारा : नदीच्या पाण्यामुळे अनेक गावांना पिण्यासाठी तसेच शेतीला सिंचनासाठी जलपुरवठा होतो. त्यामुळे नदीला जीवनदायीनी असे संबोधल्या जाते. मात्र, भंडाऱ्याची वैनगंगा नदी ही आता नागरिकांच्या आरोग्यावर उठली आहे. नागनदीचे लाखो लिटर दूषित पाणी वैनगंगेत सोडण्यात येत असल्याने ते दररोज सुमारे २ लाख नागरिक पितात. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जलवाहिनी असलेल्या वैनगंगा नदीच्या अथांग पात्रात पवनी तालुक्यात गोसीखुर्द धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणामुळे वैनगंगा नदीचे प्रवाहित पाणी सन २०१४-१५ पासून अडविण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था होत असली तरी अनेक नागरिकांना हेच धरण शाप ठरले आहे. वैनगंगा नदीकाठावर सुमारे २० ते २५ गावे वसलेली आहेत. यात गणेशपूर, पिंडकेपार, कोरंभी, सालेबर्डी, खैरी, साहुली, पिपरी, सावरी, जवाहरनगर, कोंढी, राजेदहेगाव, पेवठा, भंडारा, कारधा यासह अनेक गावांचा समावेश आहे. नागपूर येथील नाग नदीच्या प्रवाहातून वैनगंगा नदीला दररोज लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेवठा या गावाजवळ नाग नदी वैनगंगा नदीला मिळते. त्या माध्यमातूनच नागपूर येथील मलमुत्र, रासायनिक व जैविक घटकांचा समावेश असलेले व आरोग्यास अत्यंत हानीकारक असे दूषित पाणी वैनगंगा नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना चर्मरोगाच्या आजारासह अन्य रोगांची लागण होत असल्याचे आता वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.गोसे धरणाच्या बांधकामानंतर वैनगंगा नदीचे पाणी अडविण्यात आले असल्याने तेव्हापासून नाग नदीतून येणाऱ्या दूषित पाण्याच्या साठ्यामुळे ही नदी आता गटाराचे स्वरुप धारण करीत आहे. अत्यंत दूषित असलेल्या या पाण्याचा जनावरेही पिण्यासाठी वापर करीत नाही. असे घाण पाणी नदीकाठावरील गावातील पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून नळजोडणीधारक नागरिकांना वाटप करण्यात येत आहे. यामुळे दररोज लाखो लिटर दूषित पाणी सुमारे दोन लाखांच्या वरील नागरिकांच्या पोटात जात असल्यामुळे हा ‘विषाचा प्याला’ प्रत्येक घरात, प्रत्येक नागरिकांच्या हातात दिसून येतो. दूषित पाण्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावरे व जंगली प्राणीही प्रभावित झाली आहे. नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे आवाज उठविला. मात्र नाग नदीच्या दूषित पाण्याचा प्रवाह बंद करण्यास प्रशासनाने अद्याप सहकार्य केलेले नाही. (शहर प्रतिनिधी)जलशुद्धीकरण यंत्राची आवश्यकतावैनगंगा नदीकाठावर अनेक गावे वसलेली असून येथील नागरिकांना होणारा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा थेट गावाच्या पाण्याच्या टाकीतून पोहचतो. तेथून सरळ नळजोडणीधारकांना पुरवठा होत आहे. मात्र ज्या गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्र नसल्याने नागरिकांना ते दूषित रासायनिक व मलमुत्रयुक्त पाणी मागील अनेक वर्षांपासून नाईलाजाने प्यावे लागत आहे. या पाण्यामुळे भविष्यात अनेक व्याध्यांना नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याचा वैद्यकीय अहवाल आहे. प्रशासनाची भूमिका संशयास्पदएकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नदींचे पुनरूज्जीवन व सफाईवर भर दिला आहे. असे असताना भंडारा जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीत लाखो लिटर दूषित पाण्याचा विसर्ग होत असताना प्रशासन अद्यापही निद्रीस्त आहे. लाखो लोकांचे जीवन यामुळे धोक्यात आले असताना प्रशासनाने याबाबत कुठलेही ठोस पावले उचलण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.