शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पॉलिथीनमुक्त शहरासाठी सरसावणार ‘हात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 00:31 IST

शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात.

ग्रीन हेरिटेज संस्थेचा पुढाकार : जिल्हाधिकारी व पालिका प्रशासनाला दिले निवेदनभंडारा : शहरातील प्रत्येक दुकानात खरेदीदाराला विक्रेत्यांकडून साहित्यासाठी पॉलिथीन दिली जाते. त्याचा वापर झाल्यानंतर त्या इतरत्र फेकण्यात येतात. त्यामुळे प्रदूषण तथा पर्यावरणाला धोका पोहचत आहे. यासाठी शहर पॉलिथीनमुक्त करण्यासाठी ग्रीन हेरिटेज संस्थेने पुढाकार घेतला असून जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे. पॉलिथीन वापराच्या अतिरेकामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. टूथपेस्ट, मिनरल वॉटरच्या बॉटल्स, शॉम्पू, गुटखा, तंबाखू व अन्य पदार्थांसाठी पिशव्यांचा मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. वापरानंतर त्या शहरात इतरत्र बेवारस फेकण्यात येतात. त्यामुळे अनेकदा नाल्यांमध्ये त्या तुंबलेल्या असतात. त्यामुळे नाल्यांमधील पाणी वाहून जाण्याचा मार्ग बंद होत असल्याने पर्यायाने तिथे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे नागरिकांचे आरोग्य तथा पर्यावरणाला धोका वाढला आहे. ही बाब लक्षात घेऊन ग्रीन हेरिटेज संस्थेने शहराला पॉलीथीनमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.याबाबत संस्थेचे अध्यक्ष सईद शेख, चंदा मुरकुटे, डॉ.यशवंती गायधने, विलास केजरकर, संध्या किरोलीकर, इंद्रायणी वासनिक, शैलेंद्र श्रीवास्तव, नितीन कुथे, नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, भाजीपाला फेडरेशनचे सुधीर धकाते आदींनी नगराध्यक्ष बाबू बागडे व मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व शहराला पॉलिथीनमुक्त करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. दरम्यान यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. शहर पॉलिथीनमुक्त होण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)१ एप्रिलपासून शहरात पॉलिथीन बंदीपर्यावरण व मनुष्याच्या आरोग्याला पोहचत असलेल्या प्लास्टिक वापराच्या धोक्यातून शहराला मुक्त करण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट व शहर स्वच्छतेकरिता व्यापारी, दुकानदार व भाजीपाला विक्रेता यांची सभा घेण्यात आली. यावेळी १ एप्रिलपासून भंडारा शहरात पॉलिथीन बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.