शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

हरभऱ्याला फुटले कोंब गहू होतोय काळसर

By admin | Updated: March 18, 2015 00:48 IST

सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली.

भंडारा : सलग चार दिवस अधून मधून पडत असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिकांची चांगली हानी झाली. गहू, हरभरा, तूर यासह भाजी पिकांचीही नासाडी झाली. तालुक्यातील बहुतांश शेतातील हरभऱ्याला कोंब फुटले असून काही शेतातील गहू काळा पडायला सुरूवात झाली.खरीप हंगामात धान व इतर पिकांची झालेली नासाडी अजूनही शेतकरी विसरले नाहीत. शासनाच्या मदतीच्या नावावर मिळणारी तुटपुंजी रक्कम अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. महिनाभरापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाहीत. खरीप हंगाम हातचा गेला रब्बी पिकाकडून आस लावून बसलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा जीव बदलते हवामान पाहून टांगणीला लागत आहे. तालुका गारपिटीतून बचावला असला तरी ढग मात्र कायम आहेत. रबी पिकाचेही नुकसान करायचे असे जणू निसर्गाने ठरविले असावे. या भितीने शेतकऱ्यांचा जीव कासाविस होत आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा व गव्हाची शेती फुरविली. त्यांचे या तीन चार दिवसांच्या अवकाळी पावसाने कंबरडे मोडले. पाऊस अधूनमधून पडत आहे. ज्या शेतकऱ्यांनी हरभरा सोंगून गंज लावले त्यांच्या पदरी आता घुंगऱ्या पडत आहे. गंजी लावलेला हरभरा काळाशार पडत आहे. गेल्या वर्षी झालेल्या नापिकीची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. सर्वेक्षण केले जात आहे. त्यातच घोळावर घोळ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत असल्याने कुणाला लाभ तर कुणाला भोपळा, अशी स्थिती गेल्या दोन वर्षात झाल्याने नुकसान भरपाई मागायची कुणाला, अशा मन:स्थितीत शेतकरी आला आहे. (प्रतिनिधी)