शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

ग्रामसेवकांचा मोर्चा

By admin | Updated: July 1, 2014 01:18 IST

ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : ११ जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशाराभंडारा : ग्रामसेवकांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून आश्वासनाची पूर्तता केली जात नसल्यामुळे महाराष्ट्र ग्रामसेवक संघटनेच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दि.११ जुलैपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद चौकातून मोर्च्याला प्रारंभ झाला. या मोर्च्यात शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले होते. मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथे मोर्च्याचे रूपांतर सभेत झाले. सभेला संघटनचे राज्य सरचिटणीस अतुल वर्मा, जिल्हाध्यक्ष शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विलास खोब्रागडे आदींनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेची अंमलबजावणी ग्रामसेवकांनी केली. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न शासन दरबारी वारंवार मांडूनही सुटले नाही. सहनशिलतेचा अंत झाला आहे. ग्रामसेवक गावात ग्रामसभा घेतो, वार्षिक सभा घेतो, दुष्काळ पडल्याच्यानंतर अतिशय प्रभाविपणे काम करीत असतो. ग्रामपंचायती आॅनलॉईन करणे, ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे शासनाच्या योजना गावापर्यंत पोहचविणे आदी विविध अभियानात ग्रामसेवकांनी नाविन्यपुर्ण कामे केली आहेत. परंतु ग्रामसेवकांचे प्रश्न सुटत नाही. उलट कामाचा ताण आणि व्याप वाढला आहे. शासनाने आतातरी ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची वेतनतृटी दुर करावी, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ कंत्राटी शिक्षकाप्रमाणे सेवेत लागलेल्या तारखेपासून धरावे, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, प्रवास भत्ता वेतनासोबत तीन हजार रूपये करण्यात यावे आदी मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा दि.११ जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.शिष्टमंडळाने निवासी जिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले मागण्यांचे निवेदन सोपविले. मोर्च्यात शिवपाल भाजीपाले, प्रमोद तिडके, राजू महंत, श्याम बिलवणे, विवेक भरणे, पी.आर. भुयार, एन.एस. घोडीचोर, जे.एम. वेदी, अनिल धमगाये, एम.एस. शेंडे, अशोक ब्राम्हणकर, प्रदीप लांजेवार, एन.सी. बिसेन, अमित चुटे, एन.एच. जिरितकर, गोकुळा सानप, वाय.डी. उपरीकर, मंगला डहारे, विलास खोब्रागडे यांच्यासह शेकडो ग्रामसेवक सहभागी झाले. (नगर प्रतिनिधी)