भंडारा : महाराष्ट्र राज्यातील ग्रामसेवक संवर्गावर सातत्याने महाराष्ट्र शासन अन्याय करीत आहे. लोकसभा निवडणूक अगोदर आंदोलन चालू असताना आचारसंहितेमुळे काही निवडक मागण्याचे आंदोलन स्थगित केले होते. याबाबत निर्णय व धोरण ठरविण्याकरिता राज्य कार्यकारिणी सभा नुकतीच घेण्यात आली. राज्यात ग्रामसेवक संवर्गावर प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी वेतन दूर करणे, नरेगाकरिता स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे, बदल्यांबाबत धोरण बदल करणे, कंत्राटी ग्रामसेवकाच्या सेवा नियमित व सेवानिवृत्ती लाभ देणे, विस्तार अधिकारी संख्या वाढ करणे, ग्रामसेवकांना प्रवास भत्ता दरमहा तीन हजार रुपये मिळणे, ग्रामसेवकांची सेवाज्येष्ठता यादीचा प्रश्न मार्गी लावणे आदी मागण्यांबाबत निर्णय घेण्यात यावे, या मागण्यांसाठी ग्रामसेवक युनियन आक्रमक आहेत. १ जुलैपासून आंदोलनात्मक पवित्रा घेऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्णय घेण्यात आली माहिती अतुल वर्मा यांनी दिली. (नगर प्रतिनिधी)
ग्रामसेवक आक्रमक
By admin | Updated: June 21, 2014 23:51 IST