शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
2
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
4
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
5
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
6
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
7
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
8
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
9
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
10
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
11
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
12
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
13
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
14
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
15
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
16
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
17
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
18
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
19
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
20
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं

ग्रामीणांची भाकर, वाकळ झाली हद्दपार

By admin | Updated: May 12, 2015 00:31 IST

कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या ...

चपातीचा वाढला आस्वाद ज्वारीचे पीक जिल्ह्यातून गायब होण्याच्या मार्गावरतुमसर : कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या गरिबीचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या या दोन वस्तू आज ग्रामीण भागातून जवळजवळ हद्दपार झाल्या आहेत. आहारात स्वादिष्ट, पचायला हलकी असणारी गरिबांच्या आहारातील भाकरीने अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमात बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात एखाद्या कोपऱ्यात का होईना स्थान मिळविल्याचे दिसून येते. या भाकरीला अनादिकाळापासून सोबत करणारा झुणका (बेसन) याने मात्र तिची साथ सोडल्याचे दिसून येते. भाकरीची जागा गोल गुबगुबीत चपातीने (पोळीने) घेतलेली आहे. पण जिभेला मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळेच की काय आजही झुणक्यासोबत भाकर हे नाव जोडले जाते. महाराष्ट्रात मागील काही काळ सत्तेवर राहिलेल्या भाजप- सेना युती सरकारने मात्र त्यांचे एकीकरण केले. त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे पाच वर्षे याचे प्रेम विविध फलकावर झळकत राहिले. अशी ही भाकर आता नवीन पिढीसाठी इतिहासजमा झाली. भारतात हरितक्रांती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जायचे. कमीत- कमी पाणी या पिकाला लागत असे. तसेच ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकर्ऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जात असे. कालांतराने हायब्रिड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला आणि त्यामुळे मूळ ज्वारी पिकविणे बंद झाले. मुळात भूक या शब्दापासून भाकर हा शब्द तयार झाला असावा. सणासुदी व्यतिरिक्त दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येक घरी भाकर तयार केली जायची. जात्यावर दळलेले पीठ कोहपरात गरम पाण्याने (अंदन) भिजवून त्यापासून भाकर तयार केली जायची. साधारणत: तव्यात मावेल एवढया आकाराची भाकर तयार करण्यात त्या काळातील गृहीणींचा हातखंडा होता. आपल्या धन्याला तव्यावरून काढलेली, काळा पापुद्रा चढलेली भाकर खाऊ घालण्यात वेगळाच आनंद होत असे. याउलट अलीकडे फ्रिजमधून काढलेले थंडे अन्न नवऱ्याला खाऊ घालण्यास काही आधुनिक गृहिणी धन्य मानत असतात. कदाचित यामुळेच आजचे पतिराज एखादेवेळी जेवण करण्यात हॉटेलमध्ये गेल्यानंतर 'गरम रोटी लाओ' असे म्हणत असावेत.आजही ग्रामीण भागातील गावखेड्यात गेले असता बाहेर एखाद्या ठिकाणी ती वाकळ वाळत असल्याने तिचे दर्शन होते. एरव्ही ती शयनकक्षात मोठया गाद्यांच्या किंवा चादरीच्या खालच्या बाजुला दबलेली दिसून येते. जुन्या काळात माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिचा सहवास माणसासोबतच असायचा. मात्र सध्या भाकर व वाकळ ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)जुन्या वस्तूंचा होत असे पुनर्वापरवाकळ, गोधडी, देशमुख या विविध नावाने प्रचलित असणाऱ्या वाकळीची निमिर्ती उन्हाळ्याच्या काळात घरोघरी होत असे. जुने फाटलेले कपडे, जुने धोतर किंवा लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्याने शिवून ही वाकळ तयार केली जायची. साधारणत: एक वाकळ विणण्याकरिता ८ ते १0 दिवस लागत असत. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी उन्हाळ्यात गरम न होणारी ही वाकळ प्रत्येकाच्या घरी असायची. त्या काळात ब्लँकेट, चादर, रजई फार कमी दिसायची. परंतु आज या वाकळीची जागा वरील आधुनिक साहित्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे विशेष लक्ष नागरिक गरीब परिस्थितीमुळे देत असत. मात्र बदलत्या जीवनमानानुसार या सर्व पद्धती बंद होत आहेत.