शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
4
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
5
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
6
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
7
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
8
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
9
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
10
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
11
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
12
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
13
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
14
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
15
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
16
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
17
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
18
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
19
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत मुसक्या आवळल्या
20
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...

ग्रामीणांची भाकर, वाकळ झाली हद्दपार

By admin | Updated: May 12, 2015 00:31 IST

कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या ...

चपातीचा वाढला आस्वाद ज्वारीचे पीक जिल्ह्यातून गायब होण्याच्या मार्गावरतुमसर : कधीकाळी ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात आहारात भाकर आणि अंथरूणात वाकळ या दोन गोष्टी हमखास असायच्या गरिबीचे प्रतीक म्हणून समजल्या जाणाऱ्या या दोन वस्तू आज ग्रामीण भागातून जवळजवळ हद्दपार झाल्या आहेत. आहारात स्वादिष्ट, पचायला हलकी असणारी गरिबांच्या आहारातील भाकरीने अलिकडे श्रीमंतांच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमात बुफे नावाच्या आधुनिक प्रकारात एखाद्या कोपऱ्यात का होईना स्थान मिळविल्याचे दिसून येते. या भाकरीला अनादिकाळापासून सोबत करणारा झुणका (बेसन) याने मात्र तिची साथ सोडल्याचे दिसून येते. भाकरीची जागा गोल गुबगुबीत चपातीने (पोळीने) घेतलेली आहे. पण जिभेला मात्र ते सहन झाले नाही. त्यामुळेच की काय आजही झुणक्यासोबत भाकर हे नाव जोडले जाते. महाराष्ट्रात मागील काही काळ सत्तेवर राहिलेल्या भाजप- सेना युती सरकारने मात्र त्यांचे एकीकरण केले. त्यामुळे महाराष्ट्रात सुमारे पाच वर्षे याचे प्रेम विविध फलकावर झळकत राहिले. अशी ही भाकर आता नवीन पिढीसाठी इतिहासजमा झाली. भारतात हरितक्रांती होण्याअगोदर बऱ्याच राज्यात ज्वारीचे पीक मोठया प्रमाणात घेतल्या जायचे. कमीत- कमी पाणी या पिकाला लागत असे. तसेच ज्वारी काढल्यानंतर राहिलेले कुटार, कडबा शेतकर्ऱ्यांच्या पाळीव जनावरांना खाद्य म्हणून वापरल्या जात असे. कालांतराने हायब्रिड ज्वारी नावाचा प्रकार जन्माला आला आणि त्यामुळे मूळ ज्वारी पिकविणे बंद झाले. मुळात भूक या शब्दापासून भाकर हा शब्द तयार झाला असावा. सणासुदी व्यतिरिक्त दोन्ही वेळच्या जेवणात प्रत्येक घरी भाकर तयार केली जायची. जात्यावर दळलेले पीठ कोहपरात गरम पाण्याने (अंदन) भिजवून त्यापासून भाकर तयार केली जायची. साधारणत: तव्यात मावेल एवढया आकाराची भाकर तयार करण्यात त्या काळातील गृहीणींचा हातखंडा होता. आपल्या धन्याला तव्यावरून काढलेली, काळा पापुद्रा चढलेली भाकर खाऊ घालण्यात वेगळाच आनंद होत असे. याउलट अलीकडे फ्रिजमधून काढलेले थंडे अन्न नवऱ्याला खाऊ घालण्यास काही आधुनिक गृहिणी धन्य मानत असतात. कदाचित यामुळेच आजचे पतिराज एखादेवेळी जेवण करण्यात हॉटेलमध्ये गेल्यानंतर 'गरम रोटी लाओ' असे म्हणत असावेत.आजही ग्रामीण भागातील गावखेड्यात गेले असता बाहेर एखाद्या ठिकाणी ती वाकळ वाळत असल्याने तिचे दर्शन होते. एरव्ही ती शयनकक्षात मोठया गाद्यांच्या किंवा चादरीच्या खालच्या बाजुला दबलेली दिसून येते. जुन्या काळात माणसाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत तिचा सहवास माणसासोबतच असायचा. मात्र सध्या भाकर व वाकळ ग्रामीण भागातून हद्दपार झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)जुन्या वस्तूंचा होत असे पुनर्वापरवाकळ, गोधडी, देशमुख या विविध नावाने प्रचलित असणाऱ्या वाकळीची निमिर्ती उन्हाळ्याच्या काळात घरोघरी होत असे. जुने फाटलेले कपडे, जुने धोतर किंवा लुगड्यांवर अंथरून त्याला सुई- धाग्याने शिवून ही वाकळ तयार केली जायची. साधारणत: एक वाकळ विणण्याकरिता ८ ते १0 दिवस लागत असत. हिवाळ्यात शरीराला ऊब देणारी उन्हाळ्यात गरम न होणारी ही वाकळ प्रत्येकाच्या घरी असायची. त्या काळात ब्लँकेट, चादर, रजई फार कमी दिसायची. परंतु आज या वाकळीची जागा वरील आधुनिक साहित्यांनी घेतली आहे. ग्रामीण भागात जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याकडे विशेष लक्ष नागरिक गरीब परिस्थितीमुळे देत असत. मात्र बदलत्या जीवनमानानुसार या सर्व पद्धती बंद होत आहेत.