शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना ग्रामसभेचा विसर

By admin | Updated: January 28, 2015 23:10 IST

पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती.

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील पालोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कारभारामुळे जनता त्रस्त झाली आहे. २६ जानेवारीची ग्रामसभा दुपारी १२ वाजता ठेवण्यात आली होती. काही ग्रामस्थानी आपली समस्या घेवून ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित झाले. सरपंच व तीन सदस्यांची उपस्थिती पाहून ग्रामस्थ चकीत झाले. एक तास होवून सदस्य उपस्थित झाले नव्हते. ग्रामपंचायत सदस्यांनाच ग्रामसभेचे महत्व माहित नसतील तर गावकऱ्यांना ग्रामसभेचे महत्व कोण सांगणार असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे. ९ सदस्यासह ग्रामपंचायतचा कारभार सुरू आहे. मागील अनेक महिन्यापासून ग्रामपंचायत सदस्यामध्ये आपसी मतभेद पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावाचा विकास खुंटलेला आहे. गावात समस्येला उधान आले आहे. येथे महिला सरपंच संगीता गिऱ्हेपुंजे गावाचा कारभार सांभाळत आहेत. गावात प्रवेश करण्यापुर्वी नाकाला रूमाल बांधावी लागते. आबादी येथे पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. घाणीमुळे नाल्या भरलेल्या आहेत. लक्षावधी रूपये खर्च करून बांधलेली पाण्याची टाकी धुळ खात आहेत. प्रशासनाकडून वर्षाला चार ग्रामसभा घेतल्या जातात. मात्र ग्रामस्थाच्या अल्प उपस्थितीमुळे ग्रामसभा तहकूब होत आहेत. भविष्यात अशा ग्रामसभा बंद होण्याचे चिन्ह पाहायला मिळत आहेत. ग्रामसभा ही जनतेच्या गावाच्या विकासात्मक कामासाठी असते. मात्र ही जाणीव जनतेमध्ये दिसत नाही. पदाधिकाऱ्यांच्या आपसी मतभेदामुळे जनता विकासापासून कोसो दूर आहे. (वार्ताहर)