शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराने ग्रामीण वातावरण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

भंडारा : लोकशाहीचा उत्सव असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला खऱ्या अर्थाने मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, १४८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू ...

भंडारा : लोकशाहीचा उत्सव असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीला खऱ्या अर्थाने मंगळवारपासून प्रारंभ झाला असून, १४८ ग्रामपंचायतींमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. वैयक्तिक भेटीगाठींवर भर देत आपल्या गटाला निवडणुकीत यश मिळविण्यासाठी गावपुढारी कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायत अविरोध झाली नसून, आता १२३६ जागांसाठी २७४५ उमेदवार रिंगणात आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा झाल्यापासून गावागावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कोरोना संसर्गाच्या चर्चांची जागा आता ग्रामपंचायत निवडणुकीने घेतली. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा केली. त्यात तुमसर तालुक्यातील १८, मोहाडी तालुक्यातील १७, भंडारा तालुक्यातील ३५, पवनी २७, लाखनी आणि साकोली प्रत्येकी २० तर लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक जण इच्छुक असून, तब्बल ३,११७ व्यक्तींनी आपले नामांकन दाखल केले होते. उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३७१ जणांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता १२३६ जागांसाठी २७४५ उमेदवार रिंगणात आहेत. सोमवारी चिन्ह वाटप झाल्यानंतर मंगळवारपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ झाला आहे.

अनेक गावात या निवडणुकीवरून दोन गट निर्माण झाले आहेत. आपल्या गटाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. गावाची मतदारसंख्या कमी असल्याने एकूणएक मत मिळविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू आहेत.

प्रत्येक गावात लाॅकडाऊनच्या काळात कोरोना हा चर्चेचा विषय होता. मात्र आता कोरोनाची जागा ग्रामपंचायत निवडणुकीने घेतली आहे. निवडणुकीत उभे असलेल्यांसोबतच प्रत्येकाचा चर्चेचा विषय ग्रामपंचायत निवडणूक आहे. तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींसोबतच लहान गावांमध्येही प्रचंड चुरस दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोहरा येथील प्रभाग ५ मधील सर्व उमेदवारांनी माघार घेत असल्याचे पत्र लाखनीचे तहसीलदार मल्लिक वीराणी यांना दिले आहे. मेंढा व गडपेंढरी ग्रामपंचायतीची स्वतंत्र निर्मिती करावी, मूलभूत सुविधा द्याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. पोहराच्या प्रभाग ५ मध्ये मेंढा व गडपेंढरी गावाचा समावेश आहे.

आता बाहेरगावी असणाऱ्यांची मनधरणी

कोरोना संकटकाळात रोजमजुरीसाठी आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळी गावात परत आली होती. त्यावेळी त्यांना गावबंदी करण्यात आली होती. अनेक गावात महानगरातून येणाऱ्या आपल्याच गावातील नागरिकांना १५ ते २० दिवस क्वारंटाईन राहावे लागले होते. आता निवडणुकीच्या काळात मात्र बाहेरगावी गेलेल्यांचे मत मिळावे यासाठी मनधरणी केली जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत एकेका मताला महत्त्व असते. त्यामुळे बाहेरगावी असलेल्या आपल्या गटाच्या व्यक्तीला मतदानासाठी गावात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. सुरुवातीला गावबंदी करणारे आता बाहेरगावी असणाऱ्यांसाठी पायघड्या घालत आहे.