शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

धानाचे चुकारे अन् बाेनस तुमच्याकडे, आम्ही जगायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. ...

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. अशा स्थितीत खरीप हंगामात राेवणी झाली. महागडी बियाणे घेतले. मजुरीवर खर्च केला. पैसे नसतानाही तजबीज केली. आता सणासुदीचे दिवस ताेंडावर आहेत. कान्हाेबा अर्थात जन्माष्टमीचा महत्त्वाचा सण बिना पैशाने साजरा करावा लागला. मजुरांना द्यायला मजुरीचे पैसे नाही. सण साजरा करायला. एक सदामही हातात नाही. सकाळपासून राबराब राबावे आणि पैसांसाठी सावकाराच्या दारात उभा राहावे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

मे महिन्यापासून विक्री केलेल्या रब्बी हंगामातील धानाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या हातात आले नाही. ४१८ काेटी रुपये शासनाने मंजूर केल्याचे सांगितले गेले. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. उधार उसनवार करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र शासन काेणताच ताेडगा काढायला तयार नाही.

बाॅक्स

१४ काेटीच मिळाले

पालांदूर सेवासहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंतचे चुकारे मिळाले. मात्र यात अत्यल्प शेतकऱ्यांचा समावेश आहे. गाेदामाची समस्या उभी असल्याने जुलै महिन्यातच सर्वाधिक धानाची खरेदी झाली. जिल्ह्याला मिळालेल्या सुमारे १३८ काेटींपैकी पालांदूर परिसराला केवळ १४ काेटी रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे द्यावे, अशी मागणी आहे.