शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

धानाचे चुकारे अन् बाेनस तुमच्याकडे, आम्ही जगायचे कसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:16 IST

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. ...

गत खरीप हंगामात विकलेल्या धानाच्या बाेनसची अर्धी रकम अद्यापही शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही. रब्बी हंगामातील धानाचे पैसेही मिळाले नाही. अशा स्थितीत खरीप हंगामात राेवणी झाली. महागडी बियाणे घेतले. मजुरीवर खर्च केला. पैसे नसतानाही तजबीज केली. आता सणासुदीचे दिवस ताेंडावर आहेत. कान्हाेबा अर्थात जन्माष्टमीचा महत्त्वाचा सण बिना पैशाने साजरा करावा लागला. मजुरांना द्यायला मजुरीचे पैसे नाही. सण साजरा करायला. एक सदामही हातात नाही. सकाळपासून राबराब राबावे आणि पैसांसाठी सावकाराच्या दारात उभा राहावे काय? असा प्रश्न विचारला जात आहे.

मे महिन्यापासून विक्री केलेल्या रब्बी हंगामातील धानाचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या हातात आले नाही. ४१८ काेटी रुपये शासनाने मंजूर केल्याचे सांगितले गेले. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात आले नाही. उधार उसनवार करून शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र शासन काेणताच ताेडगा काढायला तयार नाही.

बाॅक्स

१४ काेटीच मिळाले

पालांदूर सेवासहकारी संस्थेच्या आधारभूत केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंतचे चुकारे मिळाले. मात्र यात अत्यल्प शेतकऱ्यांचा समावेश आहे. गाेदामाची समस्या उभी असल्याने जुलै महिन्यातच सर्वाधिक धानाची खरेदी झाली. जिल्ह्याला मिळालेल्या सुमारे १३८ काेटींपैकी पालांदूर परिसराला केवळ १४ काेटी रुपयेच मिळाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे द्यावे, अशी मागणी आहे.