शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

चार महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे ...

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे नाही आले! तूच सांग बापू... आम्ही का खाऊन, न कसा जगून...!"६० ते ६५ वर्षांच्या थकलेल्या, डोळ्यातून आसवे येत असलेल्या एका वृद्ध आजीबाईंची होणारी परवड पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहणार नाहीत परंतु शासनाकडून मात्र हे वृद्ध चार महिन्यांपासून दुर्लक्षित आहेत त्यांच्या व्यथा या शासन दरबारी पाेहोचत नाहीत.

अनेक महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखनी तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार, अपंग ज्येष्ठ नागरिकांचे मानधन गत चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजाराहून अधिक नागरिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे.

तळागाळातील नागरिकांचा विचार करुन शासन वेगवेगळ्या योजना राबवत असल्याच्या घोषणा शासनस्तरावर होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. लाखनी तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृद्ध, दिव्यांग, अविवाहित, महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा दारिद्र्य रेषेखालील हजाराहून अधिक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. या योजनांचे तालुक्यात २१ हजार ९४० लाभार्थी असून, प्रती लाभार्थ्यांना मासिक एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत दिले जाते.

दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपासून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. शासनाकडूनच निधी न आल्याने वितरण करता आले नाही, असे सांगण्यात येत आहे. सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली. काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावरच अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन तेही महिनोमहिने मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण आहे.

कोट

"चार महिन्यांपासून मानधन न आल्याने वृद्ध, निराधार लोकांना मानधनाअभावी आपले जीवन कंठित करावे लागत आहे. याबाबत वृद्ध निराधार नागरिक वेळोवेळी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून याकडे मात्र महसूल प्रशासनातील कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर मानधन जमा करावे व त्यांची पिळवणूक थांबावी."

....धनंजय घाटबांधे, तालुकाध्यक्ष, भाजपा लाखनी.