शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
3
Stock Markets Today: आठवड्याच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरण; निफ्टी २५,००० च्या खाली, Wipro, Tata Motors, BEL मध्ये तेजी
4
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
5
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
6
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
7
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
8
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
9
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
10
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
11
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
12
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
13
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
14
'दूरस्थ'चे दोन महिन्यांत केवळ १०,१६९ प्रवेश; कोणत्या अभ्यासक्रमांना किती प्रवेश? जाणून घ्या
15
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
16
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
17
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
18
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
19
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
20
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे

चार महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे ...

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे नाही आले! तूच सांग बापू... आम्ही का खाऊन, न कसा जगून...!"६० ते ६५ वर्षांच्या थकलेल्या, डोळ्यातून आसवे येत असलेल्या एका वृद्ध आजीबाईंची होणारी परवड पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहणार नाहीत परंतु शासनाकडून मात्र हे वृद्ध चार महिन्यांपासून दुर्लक्षित आहेत त्यांच्या व्यथा या शासन दरबारी पाेहोचत नाहीत.

अनेक महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखनी तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार, अपंग ज्येष्ठ नागरिकांचे मानधन गत चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजाराहून अधिक नागरिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे.

तळागाळातील नागरिकांचा विचार करुन शासन वेगवेगळ्या योजना राबवत असल्याच्या घोषणा शासनस्तरावर होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. लाखनी तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृद्ध, दिव्यांग, अविवाहित, महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा दारिद्र्य रेषेखालील हजाराहून अधिक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. या योजनांचे तालुक्यात २१ हजार ९४० लाभार्थी असून, प्रती लाभार्थ्यांना मासिक एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत दिले जाते.

दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपासून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. शासनाकडूनच निधी न आल्याने वितरण करता आले नाही, असे सांगण्यात येत आहे. सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली. काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावरच अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन तेही महिनोमहिने मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण आहे.

कोट

"चार महिन्यांपासून मानधन न आल्याने वृद्ध, निराधार लोकांना मानधनाअभावी आपले जीवन कंठित करावे लागत आहे. याबाबत वृद्ध निराधार नागरिक वेळोवेळी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून याकडे मात्र महसूल प्रशासनातील कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर मानधन जमा करावे व त्यांची पिळवणूक थांबावी."

....धनंजय घाटबांधे, तालुकाध्यक्ष, भाजपा लाखनी.