शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

चार महिन्यांपासून निराधार वृद्धांकडे शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे ...

लाखनी : " बापू चार महिने झाले ... पुस्तकात पैसे नाही आले... बँकेचे साहेब म्हणतेत, बुढे..! घरी जा.. पैसे नाही आले! तूच सांग बापू... आम्ही का खाऊन, न कसा जगून...!"६० ते ६५ वर्षांच्या थकलेल्या, डोळ्यातून आसवे येत असलेल्या एका वृद्ध आजीबाईंची होणारी परवड पाहून कोणाच्याही डोळ्यात अश्रू आल्यावाचून राहणार नाहीत परंतु शासनाकडून मात्र हे वृद्ध चार महिन्यांपासून दुर्लक्षित आहेत त्यांच्या व्यथा या शासन दरबारी पाेहोचत नाहीत.

अनेक महिन्यांपासून निराधार योजनेचे पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लाखनी तालुक्यातील वृद्ध तसेच निराधार, अपंग ज्येष्ठ नागरिकांचे मानधन गत चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजाराहून अधिक नागरिकांवर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पन्नाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे.

तळागाळातील नागरिकांचा विचार करुन शासन वेगवेगळ्या योजना राबवत असल्याच्या घोषणा शासनस्तरावर होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत. लाखनी तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी निराधार, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत वृद्ध, दिव्यांग, अविवाहित, महिला, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार अशा दारिद्र्य रेषेखालील हजाराहून अधिक लाभार्थ्यांचे अनुदान गत चार महिन्यांपासून त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. या योजनांचे तालुक्यात २१ हजार ९४० लाभार्थी असून, प्रती लाभार्थ्यांना मासिक एक हजार रुपयांप्रमाणे अनुदान तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत दिले जाते.

दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपासून संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थ्यांचे पैसे मिळाले नाहीत. शासनाकडूनच निधी न आल्याने वितरण करता आले नाही, असे सांगण्यात येत आहे. सण उत्सवाच्या काळात लाभार्थ्यांच्या पदरी निराशाच आली. काही लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या या मानधनावरच अवलंबून असल्याने त्यांची दमछाक होत आहे. शासनाकडून आधीच तुटपुंजे अनुदान अन तेही महिनोमहिने मिळत नाही. त्यामुळे या लाभार्थ्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण आहे.

कोट

"चार महिन्यांपासून मानधन न आल्याने वृद्ध, निराधार लोकांना मानधनाअभावी आपले जीवन कंठित करावे लागत आहे. याबाबत वृद्ध निराधार नागरिक वेळोवेळी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत असून याकडे मात्र महसूल प्रशासनातील कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या खात्यात लवकरात लवकर मानधन जमा करावे व त्यांची पिळवणूक थांबावी."

....धनंजय घाटबांधे, तालुकाध्यक्ष, भाजपा लाखनी.