शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

गावाजवळच्या नदी-नाल्यांतून रेती उपलब्ध करून देण्याचे शासन निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने ...

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने होत आहे. एवढेच नव्हे तर न परवडणाऱ्या किमतीमध्येही रेती उपलब्ध होत असल्याने लाभार्थी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यातल्या त्यात राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेतीची सवलत दिली आहे. मात्र, ती रेतीदेखील दूरच्या घाटातून आणणे न परवडणारे आहे. ही बाब आमदार विनोद अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, महसूल विभागाने गृहनिर्माण प्रयोजनासाठी पाच ब्रास रेती पर्यावरण नियमांच्या अधीन राहून स्थानिक तहसीलदारांच्या परवानगीने जवळील घाटातून उपसा करता येईल, असे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहे. अतिदुर्बल घटकांतील लाभार्थी असल्याने त्यांना रेती उपलब्ध होत नाही. किंबहुना न परवडणाऱ्या किमतीमध्ये रेती उपलब्ध होत असल्याने घरांचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. पर्यायाने घरकुल बांधकाम रखडलेले आहे. अनेक गावांत रेतीघाट नसल्याने अशा गावांना दुसऱ्या तालुक्याशी जोडण्यात आले आहे. तेथून रेतीची वाहतूक करणे परवडणारे नाही. लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली होती. यानुरूप पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या गाव व ठिकाणापासून दूर अंतरावर रेतीघाट असल्याने तेथून रेती उपलब्ध करणे लाभार्थ्यांना कठीण जात आहे.

ही बाब आमदार अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे महसूलमंत्र्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीस तहसीलदारांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू उत्खननासाठी पर्यावरण अनुमती घेऊन लिलावासाठी निश्चित केलेल्या मात्र यशस्वी बोली न झालेल्या वाळूघाटांपैकी किंवा या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडून, विशेषत: राखीव ठेवण्यात आलेल्या वाळूघाटांपैकी गृहनिर्माणच्या प्रयोजनासाठी लाभार्थ्यांना स्वत:च्या बांधकामाकरिता पाच ब्रास रेती काढण्याची परवानगी देता येईल, अशी तरतूद करण्याची सूचना केली.

त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांना गावशिवारालगतच्या घाटातून तहसीलदारांच्या परवानगीने पाच ब्रास रेती उपलब्ध करून घेता येणार आहे. एकंदरीत, आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.