शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

गावाजवळच्या नदी-नाल्यांतून रेती उपलब्ध करून देण्याचे शासन निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने ...

गोंदिया : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र वाळू उपलब्ध होत नसल्याने घरकुलांचे बांधकाम मंद गतीने होत आहे. एवढेच नव्हे तर न परवडणाऱ्या किमतीमध्येही रेती उपलब्ध होत असल्याने लाभार्थी अडचणीत येऊ लागले आहेत. त्यातल्या त्यात राज्य शासनाने घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रास रेतीची सवलत दिली आहे. मात्र, ती रेतीदेखील दूरच्या घाटातून आणणे न परवडणारे आहे. ही बाब आमदार विनोद अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निदर्शनास आणून दिली होती. दरम्यान, महसूल विभागाने गृहनिर्माण प्रयोजनासाठी पाच ब्रास रेती पर्यावरण नियमांच्या अधीन राहून स्थानिक तहसीलदारांच्या परवानगीने जवळील घाटातून उपसा करता येईल, असे आदेश दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे घरकुलांचे बांधकाम मंजूर झाले आहे. अतिदुर्बल घटकांतील लाभार्थी असल्याने त्यांना रेती उपलब्ध होत नाही. किंबहुना न परवडणाऱ्या किमतीमध्ये रेती उपलब्ध होत असल्याने घरांचे बांधकाम करणे कठीण झाले आहे. पर्यायाने घरकुल बांधकाम रखडलेले आहे. अनेक गावांत रेतीघाट नसल्याने अशा गावांना दुसऱ्या तालुक्याशी जोडण्यात आले आहे. तेथून रेतीची वाहतूक करणे परवडणारे नाही. लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली होती. यानुरूप पाच ब्रास रेती उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. मात्र, अनेक लाभार्थ्यांच्या गाव व ठिकाणापासून दूर अंतरावर रेतीघाट असल्याने तेथून रेती उपलब्ध करणे लाभार्थ्यांना कठीण जात आहे.

ही बाब आमदार अग्रवाल यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यामुळे महसूलमंत्र्यांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या व्यक्तीस तहसीलदारांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी वाळू उत्खननासाठी पर्यावरण अनुमती घेऊन लिलावासाठी निश्चित केलेल्या मात्र यशस्वी बोली न झालेल्या वाळूघाटांपैकी किंवा या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांकडून, विशेषत: राखीव ठेवण्यात आलेल्या वाळूघाटांपैकी गृहनिर्माणच्या प्रयोजनासाठी लाभार्थ्यांना स्वत:च्या बांधकामाकरिता पाच ब्रास रेती काढण्याची परवानगी देता येईल, अशी तरतूद करण्याची सूचना केली.

त्यामुळे आता घरकुल लाभार्थ्यांना गावशिवारालगतच्या घाटातून तहसीलदारांच्या परवानगीने पाच ब्रास रेती उपलब्ध करून घेता येणार आहे. एकंदरीत, आमदार अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.