शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

कंत्राटी नर्सेसच्या आंदोलनाकडे शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:42 IST

०६ लोक १२ के भंडारा : कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा ...

०६ लोक १२ के

भंडारा : कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन महिने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सेवा करणाऱ्या व १३ जुलैपासून कामावरून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी नर्सेस (आरोग्य सेविका) यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी २५ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

आंदोलनाचे नेतृत्व कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व भंडारा जिल्हा आयटकचे सचिव हिवराज उके, लोकशाही आघाडीचे अचल मेश्राम व युनियनच्या सचिव मनीषा तीतिरमारे करीत आहेत. आंदोलनाचा आज १३वा दिवस आहे. वारंवार निवेदने देऊनही शासन प्रशासन निवेदनाचा पाठपुरावा करण्यापलीकडे काहीच करीत नाही. आमदार व खासदार आंदोलनाची पूर्वसूचना देऊनही आंदोलनाच्या पेंडालला साधी भेट देण्याचे सौजन्य दाखवत नाही ही आश्चर्याचीच बाब आहे.

कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने निधी देणे बंद केल्याने राज्य सरकार सुमारे पंधरा हजार लोकांना कामावरून कमी करत आहे, तर राज्यात सुमारे तीन लाख पदे रिक्त असून, ती पदे शासन स्तरावर भरण्यापेक्षा हे सर्व पदे आउटसोर्सिंग ने खासगी कंपन्यांमार्फत भरणार असल्याचे जाहीर केले. तसेच निविदादेखील काढण्यात आल्या आहेत.

शासनाचा वरील निर्णय हा बेरोजगारी वाढवणारा व आत्मघातकी असल्याने त्याचा निषेध करण्यात येत आहे. कंत्राटी नर्सेससोबतच इतर सर्व कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे. शासनाने राज्यातील आरोग्य खात्यात रिक्त असलेल्या जागेची पदभरती करून व कोरोनाचा संभाव्य वाढता धोका व प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी सर्व कंत्राटी नर्सेस व आरोग्य कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी असे हिवराज उके यांनी कळविले आहे.