शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम

By admin | Updated: December 3, 2015 01:04 IST

भंडारा विधानसभा मतदारसंघात गोसेखुर्दचे अपूर्ण कालवे व प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी सुविधा, नाग नदीच्या पाण्यामुळे दूषित झालेले वैनगंगेचे पाणी,....

गोसेखुर्दचे कालवे अपूर्ण सिंचनाचा प्रश्न कायम दुर्लक्षित मतदारसंघ : भंडारा मतदारसंघाला विकासाची प्रतीक्षाअशोक पारधी पवनीभंडारा विधानसभा मतदारसंघात गोसेखुर्दचे अपूर्ण कालवे व प्रकल्पबाधीतांचे पुनर्वसन, उच्च व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी सुविधा, नाग नदीच्या पाण्यामुळे दूषित झालेले वैनगंगेचे पाणी, वन व कृषी पर्यटन, पर्यटकांसाठी सोयी सुविधा, निलज-कारधा एकेरी वाहतुकीचा राज्यमार्ग, प्राचीन ठेव्याची दुर्दशा, पवनीतील पर्यटन संकुलाचे भिजत घोंगडे, आरोग्य सेवेतील कमतरता, नेरला उपसा सिंचन योजनेचे भिजत घोंगडे, शेतकऱ्यांचा पांदण रस्त्याचा प्रश्न, कृषी उत्पादनासाठी साठवणूक केंद्र, स्पर्धा परीक्षांचे शासकीय मार्गदर्शन केंद्र व व्यवसायाला चालना देण्यासाठी उपयोगी पडेल असा नागपूर-पवनी-नागभिड रेल्वेचा ब्राडगेजचा प्रश्न असे कित्येक प्रश्न आवासून कायम आहेत.गोसेखुर्दचे अपूर्ण कालवेगोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्यासाठी २७ वर्षाचा कालावधी लोटला. उजवा व डावा मुख्य कालवा जवळपास पूर्ण झाला परंतू शेतात पाणी पोहोचविण्यासाठी लागणारे लघू कालवे अपूर्ण आहेत. ते पूर्ण झाल्याशिवाय हरितक्रांतीचे स्वप्न पाहता येत नाही. चौरस भाग पूर्वी समृद्ध होता परंतू अलिकडे तेथील पाण्याची पातळी खोल गेली. विहीरी कोरड्या पडल्या. पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे राष्ट्रीय प्रकल्पाचा अभिमान बाळगणाऱ्या लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे व लघू कालवे करण्यासाठी शासनाकडे आर्थिक तरतुदीची मागणी केली तरच शेतकरी शेती करू शकेल. धरणात पाणी साठवावयाचा असेल तर प्रकल्प बाधीतांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला गेला पाहिजे. अद्यापही खापरी (रेहपाडे) गावाला पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध होऊ शकली नाही.नागपूर-पवनी रोड रेल्वेइंग्रजांनी व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून नागपूर-नागभिड-गोंदिया रेल्वे मार्ग निर्माण केलेला होता. गरजेनुसार नागभिड-गोंदिया मार्ग ब्राडगेज करण्यात आला परंतू नागपूर-नागभिड रेल्वेमार्ग ब्राडगेज करण्यात आलेला नाही. त्यामुळे पवनी तालुक्यातील जनतेला व्यावसायीक दृष्ट्या त्याचा फायदा होवू शकला नाही. केंद्र शासनाने ब्राडगेज प्रस्ताव मंजूर केला परंतू रक्कमेची तरतूद केलेली नाही. त्यामुळे रेल्वे मार्गाचे काम रखडलेले आहे. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेवून रेल्वे ब्राडगेजचा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे.धान्य साठवणूक केंद्रशेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेमधून साठवणूक केंद्र गोडावून उभे करण्याची योजना आहे परंतू तालुक्यात ते होवू शकले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान्य साठविण्यासाठी पुरेसे साठवणूक केंद्र नाहीत परिणामी विकायला नेलेले धान्य उघड्यावर ठेवले जाते. शेतकऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे साठवणूक केंद्राची गरज आहे. भंडारा विधानसभा मतदार संघात हरितक्रांती करण्यासाठी सिंचन क्षमता वाढविण्यासाठी गोसेखुर्द प्रकल्पावर आधारित लिफ्ट इरिगेशन लवकरात लवकर कार्यान्वीत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच गोसेखुर्दच्या जलसाठ्यात जलवाहतुकीद्वारे पर्यटन सुविधा उपलब्ध करून शासनाचा महसूल व तरूणांना काम देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार, भंडारा.शेतकऱ्यांचे धान्य साठविण्यासाठी गोडावून, धान्याचे आधारभूत किंमतीत वाढ व गोसेखुर्द धरणाचे कालव्याचे काम पूर्ण करून सिंचनाची सोय करावी. शेतीसाठी २४ तास विद्युत उपलब्ध करून द्यावी. - लोमेश वैद्य, सभापती, कृउबा समिती, पवनी.औद्योगिक विकासासाठी एमआयडीसी सुरू व्हावी, तर युवकांना रोजगार उपलब्ध होऊन क्षेत्राचा विकास होईल तसेच कृषी व तंत्रशिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी. - रजनी मोटघरे, अध्यक्ष, नगरपरिषद, पवनी.तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात शल्य चिकित्सक व महिला वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावे, तसेच रक्तपेढी असावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा परिपूर्ण भरून सामान्य लोकांना रुग्णसोयी पुरवाव्यात. - डॉ.प्रकाश देशकर, माजी नगराध्यक्ष, पवनी.वैनगंगा पवित्र नदी समजल्या जायची. शेकडो मैलावरून लोक पवित्र स्नानासाठी यायचे. तहान लागल्यास नदीचे पाणी ओंजळीने प्यायचे. परंतू गोसेखुर्द धरण झाले आणि पवनी तालुक्यातील जनतेला नागनदीचे साठवलेले दूषीत पाणी पिण्याची व शेताला वापरण्याची वेळ आलेली आहे. दूषित पाण्यामुळे कावीळसारखे आजार व पोटाचे आजार वाढत चालले आहेत. शेतात पिकाला दूषित पाणी दिल्या जात असल्याने शेतातील पिकसुद्धा किडीने नष्ट केल्याने शेतकऱ्यांचा खर्च वाढत आहे.नेरला उपसा सिंचन योजनागोसेखुर्द या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत नेरला उपसा सिंचन योजना अत्यंत महत्वाची योजना आहे. डाव्या कालव्याने जिथे सिंचन होवू शकत नाही त्या शेतीला या योजनेपासून पाणी मिळणार आहे परंतु विद्युत पुरवठा न झाल्यामुळे योजना बनून तयार असली तरी कार्यान्वित झालेली नाही. कालवेसुद्धा अपूर्ण आहेत. योजनेमुळे शेकडो हेक्टर शेतीला सिंचन उपलब्ध होणार आहे तरीही शासनाचे लक्ष नाही.वन व कृषी पर्यटनपवनी तालुक्यात उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा काही भाग आहे. मोठ्या प्रमाणात वनव्याप्त जमीन आहे. चौरास भागात प्रयोगशिल शेतकरी आहेत. त्यामुळे वन व कृषी पर्यटनासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ पवनी तालुक्याला मिळाल्यास विकास शक्य आहे. मात्र याठिकाणी विकासासाठी अद्याप पुढाकार घेतलेला नाही.एमआयडीसीचे भिजतघोंगडेअड्याळचे तत्कालीन आमदार विलासराव शृंगारपवार यांनी एमआयडीसी स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आमदार बंडूभाऊ सावरबांधे यांनी जागेचा प्रश्न मार्गी लावला. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एमआयडीसीचे भूमिपूजन केले. आता विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे यांनी युती शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.