शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

गोसेखुर्द कालव्याची कामे संथगतीने

By admin | Updated: May 3, 2015 00:41 IST

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या ...

शेतकरी संकटात : पाणी मिळण्याची आशा मावळलीआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामाची कामे संथ गतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.१९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटींच्या वर गेली आहे. दोन तपे व मुळ धरण्याच्या किमतीत २० पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांपर्यंत या धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेताला पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडी ज्या प्रमाणे शिजावी, त्याप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती होत आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोटी टी.एम.सी. पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला अजिबात होताना दिसत नाही. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमिटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावात जमा होणार आहे. यात १२० दशलक्ष घनमिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून ६४ हजार ३६२ हेक्टर शेतीचे सिंचन होण्याची शक्यता आहे. परंतु या कालव्याचे काम अजून पूर्णत्वाकडे गेलेले नसल्याने सिंचनाचा फायदा होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच आसोला मेंढा तलावातील पाण्याच्या साठ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावाचे पुनर्वसनाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कालव्यातून पाणी इतक्यात वाहून नेणे शक्य नाही. असेच दिसत आहे.दुसऱ्या महत्वाच्या डावा कालव्याचे बांधकामच वादाच्या व भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. हा कालवा गोसे पासून लाखांदूरपर्यंत जात आहे. या कामाची लांबी २२.९३ किलोमिटर आहे. तर सिंचन क्षमता ४० हजार २०६ हेक्टरची आहे. या कालव्याचे काम उच्च प्रतिचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम सिंचन महामंडळाने सुरु केले आहे.नव्याने बांधकाम लागत असल्याने आतापर्यंत या कामावर झालेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या कालव्याची ४४१ कोटी अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र एवढे होऊनही शेतकऱ्यांना या कालव्याचा शेतकऱ्यांसाठी सिंचन उपयोग होताना दिसत नाही. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)