शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

गोसेखुर्द कालव्याची कामे संथगतीने

By admin | Updated: May 3, 2015 00:41 IST

विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या ...

शेतकरी संकटात : पाणी मिळण्याची आशा मावळलीआसगाव (चौ.) : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गाजावाजा होत असलेल्या गोसेखुर्द इंदिरा सागर धरणाच्या डाव्या कालव्याच्या बांधकामाची कामे संथ गतीने होत आहे. प्रत्यक्ष पुढच्या हंगामासाठी व शेतीला सिंचन करण्यासाठी आणखी काही वर्षे प्रतिक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.१९८३ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या या प्रकल्पाची किंमत ३७२ कोटी रुपये होती. आता ३० वर्षानंतर या प्रकल्पाची किंमत सात हजार कोटींच्या वर गेली आहे. दोन तपे व मुळ धरण्याच्या किमतीत २० पटीने वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांपर्यंत या धरणातील पाणी शेतकऱ्यांच्या शेताला पोहचणार नसेल तर याला काय म्हणावे. बिरबलाची खिचडी ज्या प्रमाणे शिजावी, त्याप्रमाणे या धरणाच्या कामाची प्रगती होत आहे. या धरणाचे काम पाहता आता पूर्णत्वाकडे पोहचलेले असले तरी या धरणातील कोटी टी.एम.सी. पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला अजिबात होताना दिसत नाही. आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. या धरणातील पाण्याचे वितरण करण्यासाठी दोन कालवे तयार करण्यात आले आहेत. उजवा कालवा व डावा कालवा अशी दोन कालव्याची नावे आहेत. उजव्या कालव्याची लांबी १०३ किलोमिटर एवढी आहे. या कालव्यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील आसोला मेंढा तलावात जमा होणार आहे. यात १२० दशलक्ष घनमिटर पाण्याचा साठा उपलब्ध होणार असून ६४ हजार ३६२ हेक्टर शेतीचे सिंचन होण्याची शक्यता आहे. परंतु या कालव्याचे काम अजून पूर्णत्वाकडे गेलेले नसल्याने सिंचनाचा फायदा होणार नसल्याची शंका व्यक्त केली जात आहे. तसेच आसोला मेंढा तलावातील पाण्याच्या साठ्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावाचे पुनर्वसनाची प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या कालव्यातून पाणी इतक्यात वाहून नेणे शक्य नाही. असेच दिसत आहे.दुसऱ्या महत्वाच्या डावा कालव्याचे बांधकामच वादाच्या व भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात सापडलेले आहे. हा कालवा गोसे पासून लाखांदूरपर्यंत जात आहे. या कामाची लांबी २२.९३ किलोमिटर आहे. तर सिंचन क्षमता ४० हजार २०६ हेक्टरची आहे. या कालव्याचे काम उच्च प्रतिचे झाले नसल्याने हा कालवा पुन्हा बांधण्याचे काम सिंचन महामंडळाने सुरु केले आहे.नव्याने बांधकाम लागत असल्याने आतापर्यंत या कामावर झालेला संपूर्ण खर्च वाया गेला आहे. या कालव्याची ४४१ कोटी अंदाजित किंमत असली तरी आतापर्यंत हजारो कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज आहे. मात्र एवढे होऊनही शेतकऱ्यांना या कालव्याचा शेतकऱ्यांसाठी सिंचन उपयोग होताना दिसत नाही. आणखी किती दिवस शेतकऱ्यांनी प्रतिक्षा करावी हा आता खरा प्रश्न आहे. (वार्ताहर)