शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

पाच वर्षांपासून गोडावून भाडे मिळालेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST

भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. परंतु ज्याच्या भरोशावर आधार दिला जातो, त्याच कोठार ...

भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्र अंतर्गत शेतकऱ्यांना आधार दिला जातो. परंतु ज्याच्या भरोशावर आधार दिला जातो, त्याच कोठार मालकांना निराधार करण्याचा अजब प्रकार शासन व प्रशासनाने केलेला आहे. गत पाच वर्षांपासून शासन व प्रशासनाने भाड्याचा एक रुपया सुद्धा कोठार मालकाला दिलेला नाही. निश्चितच हे न्यायाला धरून नाही. व्यापारी दृष्टिकोनातून बघितले असता बँकांचे लाखो रुपयाचे कर्ज घेऊन कोठार बांधले गेले आहेत. त्यांचे व्याज नियमित सुरू आहेत. पाच वर्षाचे भाडे अजूनपर्यंत न मिळाल्याने बँकांचे कर्ज व्याजासह दुप्पट झालेले आहेत. मात्र निर्दयी शासन व प्रशासनाला कोठार मालकाच्या समस्येची दया अजूनपर्यंत आलेली नाही. निश्चितच हे भंडारा जिल्ह्यातील शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधींना सुद्धा न शोभणारे आहे.

कोठार दहा महिने वापरायचे व भाडे केवळ दोन महिन्याचे द्यायचे. अशा चुकीच्या धोरणाने कोठार मालकाची आर्थिक गळचेपी केली जात आहे. बांधकाम विभागाच्या वापरातील जागेच्या हिशाेबाने नियमानुसार भाडे अपेक्षित असताना केवळ खरेदी झालेल्या धानाच्या वजनाच्या हिशेबाने भाड्याचा हिशेब निर्धारित केला जातो. हे धोरण संपूर्ण चुकीचे असून वापर केलेल्या दिवसाचा भाडा यापूर्वी ज्या पद्धतीने दिला जायचा त्याच पद्धतीने देणे अगत्याचे आहे. मात्र असे न झाल्याने कोठार मालक सुमार समस्येत आले आहेत.

चौकट /डब्बा

पालांदूर येथील कोठार मालक लता कापसे यांचे पाच वर्षाचे ९, ३२,५७५.४० , मुरली कापसे यांचे ८,१५,८४९.०६ एवढे भाडे २०१५-१६ ते २०१९-२० पर्यंतचे शासन प्रशासनाकडे थकीत आहेत. शासनाच्या हिशाेबाने एवढी रक्कम गत पाच वर्षापासून थकलेली आहे. गोडावून बनविण्याकरिता बँक अंतर्गत कर्ज घेऊन बांधकाम केलेले आहे. कर्जाची रक्कम शिल्लक असल्याने व्याजावर व्याज चढत असून मुद्दलापेक्षा अधिक व्याजाची रक्कम होत आहे. तेव्हा जिल्हा मार्केटिंग कार्यालय भंडारा यांनी पुढाकार घेऊन कोठार मालकांना न्याय द्यावा अशी अपेक्षा पालांदूर येथील कापसे दाम्पत्यांनी मागणी केली आहे.

जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या कोठार भाड्याचे मागणी प्रस्ताव संस्थेकडून अजूनपर्यंत जिल्हा कार्यालयाला आलेली नाहीत. पालांदूर येथील संस्थेने पुरवलेली आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्यातील प्रस्ताव न आल्याने वरिष्ठ स्तरावर पाठविता आले नाही. त्यामुळे सदर कोठार मालकांचे भाडे पाच वर्षापासून शिल्लक आहेत.

गणेश खर्चे जिल्हा पणन अधिकारी भंडारा.