शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

गणेशपूरच्या पोळ्यात महानायकाच्या ‘दरवाजा बंदची’ झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:25 IST

२ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला.

ठळक मुद्देहागणदारीमुक्तीसाठी जनजागृती : बेटी बचाओ-बेटी पढाओ, आत्महत्या रोखण्याबाबतचा दिला शेतकºयांनी संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला. या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले. त्याचाच प्रत्यय ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या स्वच्छतेच्या सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे.स्वच्छता हा मुद्दा सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कार्यक्रमाला पाठबळ मिळाला आहे. पण यात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मागे राहिलेला नाही, काल सोमवारी पार पडलेल्या बैलांच्या पोळा सणात शेतकºयांनी बैलांना आकर्षक पद्धतीने सजावट करून सहभाग दर्शविला. यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दरवाजा बंद’ तो बिमारी बंद या जनजागृती मोहिमेची झलक पहायला मिळाली. गणेशपूर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आयोजित बैलपोळ्यात सहभागी झालेल्या बैलजोडी मालकांनी यावेळी शासकीय विविध योजनांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.गणेशपूर ग्रामपंचायतच्यावतीने दरवर्षी मिशन हायस्कुलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पोळ्याचे आयोजन करण्यात येते. सोमवारला बैलांचा पोळा सण उत्साहात पार पडला. यावेळी गणेशपूरसह भंडारा येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.दरवर्षीच्या तुलनेत यावेळी पोळ्यात बैलांच्या जोड्यांची संख्या कमालीची कमी दिसून आली असली तरी ज्या बैलजोड्या पोळ्यात सहभागी झाल्या होत्या त्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. जे शेतकरी बैलजोड्या घेऊन पोळ्यात सहभागी झाले होते त्यांच्या बैलजोड्या विविध आकर्षक पद्धतीने समजविण्यात आलेल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची माहिती सजावटीच्या माध्यमातून अधोरेखीत करण्यात आली होती.त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या शौचालयाच्या वापरासाठी दरवाजा बंद तो बिमारी बंद, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, शेतक२ी आत्महत्या रोखण्यासंदर्भात उपाय योजना, स्वदेशी अपनाओ देश बचाओ, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासोबत देशाच्या सीमेवरील तणावाच्या स्थितीचे व सैनिकांचे मनोबल वाढविण्याबाबत दृश्य साकारण्यात आले होते. एकंदरीत शासकीय योजनांच्या जनजागृतीची झलक बैलांच्या पोळा सणात नागरिकांना अनुभवता आली. विविध सजावटीने लक्ष वेधून घेणाºया बैलजोड्यांना पहायला नागरिकांची चांगलीच रिघ लागली होती. अनेक जण बैलांवरीलसजावटीचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध करण्यासाठी चढाओढ लागली होती. तर अनेकांना सोशल मिडीयावर विविध चित्र पोस्ट करून जनजागृतीची व्याप्ती वाढवित असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.सध्या संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प झालेला आहे. बैलांच्या पोळा सणातून शेतकरी मोठ्या प्रमाणात हागणदारीमुक्त गाव प्रक्रियेची जागृती करून नागरिकांनी शौचालय बांधकाम करून वापर करावा व ज्यांनी बांधकाम केले आहे त्यांनी वापर व स्वच्छता पाळावी असा सामाजिक संदेश पोहचवून महाराष्ट्र हागदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेला मजबूत करीत असल्याचे दिसून येत आहे.