शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

गणेशपूरच्या पोळ्यात महानायकाच्या ‘दरवाजा बंदची’ झलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:25 IST

२ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला.

ठळक मुद्देहागणदारीमुक्तीसाठी जनजागृती : बेटी बचाओ-बेटी पढाओ, आत्महत्या रोखण्याबाबतचा दिला शेतकºयांनी संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : २ आॅक्टोबर २०१४ ला सुरुवात करून स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम गावागावात रूजविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुद्द पुढाकार घेतला. या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन केले. त्याचाच प्रत्यय ठिकठिकाणी घेण्यात आलेल्या स्वच्छतेच्या सार्वजनिक कार्यक्रमात पाहायला मिळाला आहे.स्वच्छता हा मुद्दा सामान्य जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्याने गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत कार्यक्रमाला पाठबळ मिळाला आहे. पण यात जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मागे राहिलेला नाही, काल सोमवारी पार पडलेल्या बैलांच्या पोळा सणात शेतकºयांनी बैलांना आकर्षक पद्धतीने सजावट करून सहभाग दर्शविला. यात महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दरवाजा बंद’ तो बिमारी बंद या जनजागृती मोहिमेची झलक पहायला मिळाली. गणेशपूर ग्रामपंचायतच्या पुढाकाराने आयोजित बैलपोळ्यात सहभागी झालेल्या बैलजोडी मालकांनी यावेळी शासकीय विविध योजनांच्या जनजागृतीसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले.गणेशपूर ग्रामपंचायतच्यावतीने दरवर्षी मिशन हायस्कुलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पोळ्याचे आयोजन करण्यात येते. सोमवारला बैलांचा पोळा सण उत्साहात पार पडला. यावेळी गणेशपूरसह भंडारा येथील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.दरवर्षीच्या तुलनेत यावेळी पोळ्यात बैलांच्या जोड्यांची संख्या कमालीची कमी दिसून आली असली तरी ज्या बैलजोड्या पोळ्यात सहभागी झाल्या होत्या त्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या. जे शेतकरी बैलजोड्या घेऊन पोळ्यात सहभागी झाले होते त्यांच्या बैलजोड्या विविध आकर्षक पद्धतीने समजविण्यात आलेल्या होत्या. सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची माहिती सजावटीच्या माध्यमातून अधोरेखीत करण्यात आली होती.त्यामध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या शौचालयाच्या वापरासाठी दरवाजा बंद तो बिमारी बंद, बेटी बचाओ, बेटी पढाओ, जलयुक्त शिवार, शेतक२ी आत्महत्या रोखण्यासंदर्भात उपाय योजना, स्वदेशी अपनाओ देश बचाओ, व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासोबत देशाच्या सीमेवरील तणावाच्या स्थितीचे व सैनिकांचे मनोबल वाढविण्याबाबत दृश्य साकारण्यात आले होते. एकंदरीत शासकीय योजनांच्या जनजागृतीची झलक बैलांच्या पोळा सणात नागरिकांना अनुभवता आली. विविध सजावटीने लक्ष वेधून घेणाºया बैलजोड्यांना पहायला नागरिकांची चांगलीच रिघ लागली होती. अनेक जण बैलांवरीलसजावटीचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कॅमेराबद्ध करण्यासाठी चढाओढ लागली होती. तर अनेकांना सोशल मिडीयावर विविध चित्र पोस्ट करून जनजागृतीची व्याप्ती वाढवित असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून आले.सध्या संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त गावाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प झालेला आहे. बैलांच्या पोळा सणातून शेतकरी मोठ्या प्रमाणात हागणदारीमुक्त गाव प्रक्रियेची जागृती करून नागरिकांनी शौचालय बांधकाम करून वापर करावा व ज्यांनी बांधकाम केले आहे त्यांनी वापर व स्वच्छता पाळावी असा सामाजिक संदेश पोहचवून महाराष्ट्र हागदारीमुक्त करण्याच्या संकल्पनेला मजबूत करीत असल्याचे दिसून येत आहे.