शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
2
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
3
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
4
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
5
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
6
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
7
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
8
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
9
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
10
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
11
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
12
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
13
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
14
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
15
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
16
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
17
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
18
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
19
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
20
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!

समाधान शिबिराच्या धरतीवर आनंद मेळावा

By admin | Updated: July 19, 2016 00:33 IST

राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले.

काशीवार यांचा पुढाकार : लाखांदूर पहिला मेळावा संजय साठवणे  साकोलीराज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सरळ घेता यावा यासाठी महसूल विभागाने समाधान शिबिराचे आयोजन केले. याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या योजनांचा थेट लाभ नागरिकांना मिळावा यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी आनंद मेळावा या नवीन उपक्रमाचे आयोजन सुरू केले आहे. याचा पहिला प्रयोग भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे करण्यात आला. महसूल विभागामार्फत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या शिबिरात जसे लाभार्थ्यांना राशन कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, आरोग्य सेवा यासह विविध योजनांचा लाभ थेट समाधान शिबिरात देण्यात येतो. या शिबिरात प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात या शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला. मात्र या समाधान शिबिरात जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरील बऱ्याच योजना लाभार्थ्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी व सामान्य माणसांना वारंवार पंचायत समिती व जिल्हा परिषद येथे चकरा माराव्या लागतात. परिणामी लोकांची कामे खोळंबली व भ्रष्टाचार फोफावत आहे. यावर आळा बसावा, शासनाच्या विविध योजना लोकापर्यंत पोहोचाव्यात यासाठी आ.बाळा काशीवार यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्यांदा आनंद मेळाव्याचे आयोजन केले. याचा पहिला प्रयोग लाखांदूर येथे करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळवून दिला.असा आहे आनंद मेळावाया आनंद मेळाव्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाची उपस्थिती राहणार असून यात घरकुल योजना, शौचालय बांधकाम, शेतकऱ्यांना शेतीसाठी अनुदानावर मिळणारे साहित्य वाटप, सोवर कंदील, मुलींना सायकल वाटप यासह अन्य योजनांचा लाभ या आनंद मेळाव्यात मिळणार आहे.भ्रष्टाचाराला आळा बसेलबरेचदा लाभार्थी यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये चकरा माराव्या लागतात. संबंधित कर्मचारी चिरीमीरी घेऊन लाभार्थ्यांना लाभ देतात. यामुळे भ्रष्टाचार होऊन खरा लाभार्थी हा योजनेपासून वंचित राहतो. शासनाचा हेतु साध्य होत नाही.कामात पारदर्शकता येईलशासनाच्या विविध योजना लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत. मात्र अधिकारी व कर्मचारी यामुळे या योजना खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे गरीब हा गरीबच राहतो व श्रीमंत हा अधिक श्रीमंत होतो. त्यामुळे आपण हा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू केला असून शासनाच्या सर्व योजनाचा लाभ आता लाभार्थ्यांना मिळणार असून हे आनंद मेळावे प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रात घ्यायचे आहेत. त्यामुळे नागरिकांनी या आनंद मेळाव्याचा लाभ घ्यावा.- बाळा काशीवार, आमदार साकोली.